Homeहेल्थ इज वेल्थलसीकरणामुळे स्तनदा मातांबरोबर...

लसीकरणामुळे स्तनदा मातांबरोबर बाळही सुरक्षित!

स्तनपान करणाऱ्या मातांनी (स्तनदा) कोणत्याही प्रकारचा संकोच किंवा भीती न बाळगता स्वत:चे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण केले पाहिजे. लसीकरणामुळे आईमध्ये विकसित झालेल्या अँटीबॉडीज स्तनपान देताना आपोआप बाळाकडे हस्तांतरित होतात आणि ते बाळासाठी उपयुक्त ठरू शकते, असे भारतीय वैद्यकीय परिषदेचे महामारी विज्ञान व संसर्गजन्य  रोग विभागाचे प्रमुख समीरण पांडा यांनी म्हटले आहे.

बऱ्याच लोकांना काळजी आहे की, आपल्याकडच्या लसी सार्स-सीओव्ही-2 विषाणूच्या (कोविड) नवीन प्रकाराविरूद्ध प्रभावी आहेत की नाही. पण, डॉ. पांडा यांच्या म्हणण्यानुसार, आता उपलब्ध असलेल्या लसी नवीन व्हेरिएन्टवर बऱ्यापैकी प्रभावी आहेत. त्यांनी स्पष्ट केले की,  लस संसर्ग प्रतिबंध करत नाही तर रोगात सुधारणा करतात. आयसीएमआरच्या प्रयोगांनी हे सिद्ध केले आहे की, भारतात सध्या उपलब्ध असलेल्या लस नव्या व्हेरिएन्टविरोधातदेखील  प्रभावी आहेत. मात्र परिणामकारकता वेगवेगळ्या स्ट्रेन्ससाठी भिन्न असू शकते.

लोकदेखील साशंक आहेत की, त्यांनी  घेतलेली लस काही काळानंतर प्रभावी ठरणार नाही. कारण विषाणू वेगाने बदलत आहे. मात्र, डॉ. पांडा म्हणतात की, विषाणू बदलतात तेव्हा सर्व विषाणूंत उत्परिवर्तन सामान्य असते. तज्ज्ञांनी असे सूचित केले आहे की, कोविड-19 विषाणूचे अस्तित्त्व काही काळानंतर इन्फ्लुएन्झाप्रमाणे कायम राहील (एंडेमिक) आणि  असुरक्षित लोकांना दरवर्षी लस घ्यावी लागू शकते.

100 वर्षांपूर्वी फ्लू म्हणून ओळखला जाणारा इन्फ्लुएंझाही महामारी होती. आता तो सर्वत्र आढळतो. त्याचप्रमाणे, कोविड-19च्या बाबतीत, आम्ही अशी अपेक्षा करतो की, हळूहळू तो महामारीच्या टप्प्यावरून एंडेमिक बनू शकेल. सध्या आम्ही वृद्धांना दरवर्षी फ्लूरोधक लस  घेण्याची शिफारस करतो. इन्फ्लूएंझा विषाणू बदलत असल्यामुळे आम्ही त्यानुसार लसीमध्ये छोटे बदल करत असतो. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.

अँटीबॉडी चाचण्या करून घेणे व्यर्थ

अँटीबॉडी चाचण्या करणे व्यर्थ आहे. कारण, रोगप्रतिकार शक्ती केवळ अँटीबॉडीजवर अवलंबून नाही. बाजारात उपलब्ध असणारी व्यावसायिक किट वापरुन केलेल्या तपासणीत आढळलेल्या अँटीबॉडीज कोविडपासून बचाव करू शकणाऱ्या अँटीबॉडीजच असतीलच असे नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीला लस दिली जाते तेव्हा दोन प्रकारची रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. एक अँटीबॉडी बचाव करणारी असते किंवा अँटीबॉडी मिडिएटेड प्रतिकारशक्ती म्हणून ओळखली जाते. दुसरी सेल मिडिएटेड प्रतिकारशक्ती आहे. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे इम्यून मेमरी. लसीकरणानंतर इम्यून मेमरी तयार होते आणि ती पेशींमध्ये असते आणि जेव्हा जेव्हा विषाणू शरीरात प्रवेश करतो तेव्हा ती सक्रिय होते, असेही डॉ. पांडा सांगितले.

लस पूर्णपणे सुरक्षित आहेत

दमा, धुळीची ऍलर्जी, परागकणांची ऍलर्जी इत्यादीसारख्या सामान्य ऍलर्जी असलेले लोकदेखील लस घेऊ शकतात. सहव्याधी रुग्ण स्थिर असल्यास लस घेऊ शकतात. मधुमेह आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांना लसीकरण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण, त्यांना जास्त धोका आहे. सध्या भारतात उपलब्ध असलेल्या सर्व लसी  क्लिनिकल चाचण्यांच्या तीन टप्प्यातून गेल्या आहेत. सुरक्षेची चाचणी पहिल्या टप्प्यातच केली जाते. नंतरच्या टप्प्यात रोगप्रतिकारशक्ती आणि परिणामकारकतेची चाचणी घेतली जाते. मी सर्वांना आश्वस्त करतो की या लस पूर्णपणे सुरक्षित आहेत. कोविड लसीकरणानंतर रक्ताच्या गुठळ्या होणे आणि एईएफआय (लसीकरणानंतरचा प्रतिकूल परिणाम) होण्याची शक्यता भारतात खूप कमी आहे, असेही ते म्हणाले.

जागतिक स्तरावर उपलब्ध असलेल्या लसी काही काळानंतर भारतात येतील. त्यामुळे त्या  लसींची वाट न पाहता आता देशात उपलब्ध असलेली लस घेणे हाच उत्तम पर्याय आहे. कृपया समजून घ्या की लोक इतर लसींची वाट पाहत आहेत ज्या त्यांना अधिक सोयीस्कर किंवा श्रेष्ठ वाटतात. मात्र, विषाणू थांबत नाही. देशात अजूनही हा विषाणू पसरत आहे. तुम्ही प्रतीक्षा करत असताना तुम्हाला संसर्ग झाल्यास तुम्ही काय कराल, असा सवालही त्यांनी केला.

डॉ. पांडा म्हणाले की, नवीन व्हेरिएन्टच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाय आणि कोविड-19च्या उपचारांमध्ये कोणताही बदल सुचवण्यात आलेला नाही. सर्व उत्परिवर्तन, मग ते विषाणूचे स्ट्रेन्स पसरवणारे असतील किंवा नवीन व्हेरिएन्टस असतील, प्रसाराचे माध्यम सारखेच आहे. मास्क  घालणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, हात स्वच्छ धुणे या विषाणूचा प्रसार नियंत्रित करण्याच्या अजूनही प्रभावी पद्धती आहेत.

संपूर्ण मुलाखत पुढच्या लिंकवर पाहा:

https://www.indiascience.in/videos/corona-ko-harana-hai-vaccination-special-with-dr-samiran-panda-head-division-of-epidemiology-and-communicable-diseases-icmr

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content