Homeटॉप स्टोरीदेशात समान नागरी...

देशात समान नागरी कायदा व वन नेशन, वन इलेक्शन…

भारतीय जनता पार्टीचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयात पक्षाच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. या जाहीरनाम्याला भाजपाने संकल्पपत्र असे नाव दिले असून त्यात सत्तेवर आल्यानंतर देशात समान नागरी कायदा लागू करण्याची तसेच देशात लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका एकाचवेळी घेण्याची ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची घोषणा केली.

समान नागरी

भाजपाच्या संकल्पपत्रातले महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे-

  1. मुद्रा योजनेतील कर्जांची लिमिट 10 लाखांवरुन 20 लाख.
  2. लखपती दीदी योजनेचा विस्तार करून 3 कोटी महिलांना लखपती बनवणार.
  3. आयुष्मान भारत योजना सर्व वर्गातील 70 वर्षे वयावरील नागरिकांना लागू करणार.
  4. पीएम आवास योजनेत नवीन 3 कोटी घरे बनवणार.
  5. एकलव्य शाळांची संख्या वाढवणार.
  6. तमिळ भाषा जगातील सर्वात प्राचीन भाषा आहे. तिचा विस्तार करणार.
  7. महिलांना अनेक क्षेत्रात कौशल्यविकास प्रशिक्षण देणार.
  8. टूरिझम क्षेत्राला बळ देणार. रोजगार वाढणार. अनेक क्षेत्राना संधी.
  9. इको टूरिजममध्ये आदिवासींना संधी.
  10. सोशल इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणार.
  11. फिजिकल व डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणार.
  12. इंडस्ट्री 4.0साठी अनेक उपाय.
  13. नवीन रोजगार संधी उपलब्ध करुन देणार.
  14. वंदे भारत- 3 प्रकार स्लीपर, चेअर, मेट्रो.
  15. बुलेट ट्रेन- उत्तर, दक्षिण, पूर्व भारतात करणार.
  16. देशाला प्रत्येक क्षेत्रात आत्मनिभर करणार. एनर्जी, खाद्यतेल प्राधान्य.
  17. सूर्यघर योजनेचा विकास.
  18. ग्रीन एनर्जी हब, फार्मा हब, इलेक्ट्रॉनिक हब, सरंक्षण आयुधे हब.
  19. विश्वबंधू भारत. सर्व जगातील मानवतेचं रक्षण ही भारताची जबाबदारी.
  20. वन नेशन, वन इलेक्शन.
  21. समान नागरी कायदा.
  22. भ्रष्टाचारविरोधी मोहीम चालूच राहणार.
  23. देशात ऑलिम्पिकचे आयोजन करणार.

Continue reading

जेन झेडच्या सहभागातून तयार होणार राज्याचे युवा धोरण

१३ ते ३५ वयोगटातील युवकांना (जेन झेड) जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलितपणे जोडण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, वैविध्यतेचे ज्ञान, नागरिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्य सरकार सुधारित युवा धोरण तयार करत आहे. युवा धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी युवकांना आपले...

आता रुग्णालयातल्या वस्त्रांची धुलाई होणार यांत्रिक पद्धतीने

राज्यातल्या ५९३ शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि निर्जंतुक सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने तेथील वस्त्रे यांत्रिक पद्धतीने धुण्याच्या प्रक्रियेला आता सुरूवात झाली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या वस्त्रधुलाई सेवेचा आज शुभारंभ झाला. मुंबईतल्या...

दिवाळीत आपत्कालीन स्थितीत संपर्क साधा १०१ व १९१६ क्रमांकांवर

दिवाळीत दीपोत्सव साजरा करताना मुंबईकरांनी पर्यावरणाचाही विचार करावा. फटाके उडविताना/फोडताना लहान मुलांची काळजी घ्यावी. फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायूप्रदूषण होणार नाही, याबाबत दक्ष राहवे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका आणि मुंबई अग्निशमन दलाने केले आहे. दुर्दैवाने आग किंवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास...
Skip to content