Homeटॉप स्टोरीदेशात समान नागरी...

देशात समान नागरी कायदा व वन नेशन, वन इलेक्शन…

भारतीय जनता पार्टीचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयात पक्षाच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. या जाहीरनाम्याला भाजपाने संकल्पपत्र असे नाव दिले असून त्यात सत्तेवर आल्यानंतर देशात समान नागरी कायदा लागू करण्याची तसेच देशात लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका एकाचवेळी घेण्याची ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची घोषणा केली.

समान नागरी

भाजपाच्या संकल्पपत्रातले महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे-

  1. मुद्रा योजनेतील कर्जांची लिमिट 10 लाखांवरुन 20 लाख.
  2. लखपती दीदी योजनेचा विस्तार करून 3 कोटी महिलांना लखपती बनवणार.
  3. आयुष्मान भारत योजना सर्व वर्गातील 70 वर्षे वयावरील नागरिकांना लागू करणार.
  4. पीएम आवास योजनेत नवीन 3 कोटी घरे बनवणार.
  5. एकलव्य शाळांची संख्या वाढवणार.
  6. तमिळ भाषा जगातील सर्वात प्राचीन भाषा आहे. तिचा विस्तार करणार.
  7. महिलांना अनेक क्षेत्रात कौशल्यविकास प्रशिक्षण देणार.
  8. टूरिझम क्षेत्राला बळ देणार. रोजगार वाढणार. अनेक क्षेत्राना संधी.
  9. इको टूरिजममध्ये आदिवासींना संधी.
  10. सोशल इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणार.
  11. फिजिकल व डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणार.
  12. इंडस्ट्री 4.0साठी अनेक उपाय.
  13. नवीन रोजगार संधी उपलब्ध करुन देणार.
  14. वंदे भारत- 3 प्रकार स्लीपर, चेअर, मेट्रो.
  15. बुलेट ट्रेन- उत्तर, दक्षिण, पूर्व भारतात करणार.
  16. देशाला प्रत्येक क्षेत्रात आत्मनिभर करणार. एनर्जी, खाद्यतेल प्राधान्य.
  17. सूर्यघर योजनेचा विकास.
  18. ग्रीन एनर्जी हब, फार्मा हब, इलेक्ट्रॉनिक हब, सरंक्षण आयुधे हब.
  19. विश्वबंधू भारत. सर्व जगातील मानवतेचं रक्षण ही भारताची जबाबदारी.
  20. वन नेशन, वन इलेक्शन.
  21. समान नागरी कायदा.
  22. भ्रष्टाचारविरोधी मोहीम चालूच राहणार.
  23. देशात ऑलिम्पिकचे आयोजन करणार.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content