Homeडेली पल्सपंकजाताईंनी घेतले रामदास...

पंकजाताईंनी घेतले रामदास आठवलेंचे आशीर्वाद

भारतीय जनता पक्षाच्या बीडच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मुंबईत भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. रिपब्लिकन पक्षाचा त्यांना पूर्ण पाठिंबा राहील, असे आश्वासन देताना आठवले यांनी बीडमधील केज विधानसभा पुढच्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला सोडावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आणि पुत्र जीत उपस्थित होते.

भाई संगारे यांना वाहिली आदरांजली

त्याआधी शहीद भाई संगारे यांना रामदास आठवले यांनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली वाहिली.

ज्यांच्या शब्दाशब्दांत असायचे अंगारे,

ते होते भाई संगारे..

अशी काव्यमय सुरुवात करून तरुणांच्या मानत क्रांतीची ज्योत पटविणारे शहीद भाई संगारे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाड क्रांतीभूमीत त्यांचे स्मारक उभारण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करुया. शहीद भाई संगारे यांच्या 25व्या स्मृतिदिनी आज सर्व जुने पँथर एकत्र आले आहेत. आपले आता पक्ष वेगवेगळे असले तरी समाज म्हणून आपण नेहमी एकत्र असले पाहिजे, अशी सामाजिक ऐक्याची साद घालत आठवले यांनी संगारे यांना श्रद्धांजली वाहिली.

मुंबईत भायखळा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह येथे संगारे यांच्या 25व्या स्मृतिदिनी आयोजित श्रद्धांजली सभेत आठवले बोलत होते. यावेळी विचारमंचावर दलित पँथर चळवळीतील जुने नेते उपस्थित होते. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरसुद्धा उपस्थित होते. त्यांनी शहीद भाई संगारे यांना श्रद्धांजली वाहणारे भाषण सभेच्या प्रारंभीच केले. यावेळी ज्येष्ठ पँथर तानसेन ननावरे यांनी शहीद संगारे यांचे क्रांती भूमी, महाड येथे स्मारक करावे अशी मागणी केली. यावेळी सर्वच वक्त्यांनी या मागणीला पाठिंबा दिला.

यावेळी सभागृहात अनेक आंबेडकरी चळवळीतील पँथर कार्यकर्ते उपस्थित होते. दलित पँथर आणि नंतर भारतीय दलित पँथरच्या चळवळीतील अनेक आठवणींना यावेळी उजाळा मिळाला.

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content