Homeचिट चॅटपरत आली एसबीआय...

परत आली एसबीआय ग्रीन मॅरेथॉन!

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), या देशातल्या सर्वात मोठी बँकेने ‘एसबीआय ग्रीन मॅरेथॉन’ हा प्रमुख कार्यक्रम पुन्हा सुरू केला आहे. या मॅरेथॉनमध्ये 5000हून अधिक लोक यात सहभागी झाले होते. रविवारी सकाळी मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सी. एस. सेठी आणि उप व्यवस्थापकीय संचालक (एचआर) आणि विनोद कुमार मिश्रा यांनी मॅरेथॉनला हिरवी झेंडी दाखवली.

स्टेट बँकेच्या मॅरेथॉनची ही चौथी आवृत्ती आहे. कोविड-19च्या महामारीनंतर प्रथमच ही मॅरेथॉन होत आहे. साथीच्या आजारापूर्वी, बँकेने या मॅरेथॉनचे आयोजन मानवी पद्धतींमुळे इकोसिस्टमचा ऱ्हास होत

असलेल्या विसंगतीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी केला होता. मॅरेथॉन उत्साही धावपटूंना पर्यावरणीय शाश्वततेला चालना देण्यासाठी एकत्र आणते आणि ‘उत्तम उद्याची निर्मिती करण्यासाठी आजचे निरोगी जीवन’ हा विश्वास जागृत करते. यामध्ये सहभागी शाश्वत पद्धतींबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि प्रयत्न करण्यासाठी धावतात.

ही मॅरेथॉन 21 किमी, 10 किमी आणि 5 किमी अशा 3 प्रकारांसाठी आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमासह बँकेने प्रत्येक भारतीयासाठी ‘एसबीआय ग्रीन मॅरेथॉन’द्वारे पर्यावरणाचे रक्षण करण्याची वैयक्तिक जबाबदारीही असल्याचे यातून अधोरेखित केले जाते. 

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content