Homeचिट चॅटपरत आली एसबीआय...

परत आली एसबीआय ग्रीन मॅरेथॉन!

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), या देशातल्या सर्वात मोठी बँकेने ‘एसबीआय ग्रीन मॅरेथॉन’ हा प्रमुख कार्यक्रम पुन्हा सुरू केला आहे. या मॅरेथॉनमध्ये 5000हून अधिक लोक यात सहभागी झाले होते. रविवारी सकाळी मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सी. एस. सेठी आणि उप व्यवस्थापकीय संचालक (एचआर) आणि विनोद कुमार मिश्रा यांनी मॅरेथॉनला हिरवी झेंडी दाखवली.

स्टेट बँकेच्या मॅरेथॉनची ही चौथी आवृत्ती आहे. कोविड-19च्या महामारीनंतर प्रथमच ही मॅरेथॉन होत आहे. साथीच्या आजारापूर्वी, बँकेने या मॅरेथॉनचे आयोजन मानवी पद्धतींमुळे इकोसिस्टमचा ऱ्हास होत

असलेल्या विसंगतीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी केला होता. मॅरेथॉन उत्साही धावपटूंना पर्यावरणीय शाश्वततेला चालना देण्यासाठी एकत्र आणते आणि ‘उत्तम उद्याची निर्मिती करण्यासाठी आजचे निरोगी जीवन’ हा विश्वास जागृत करते. यामध्ये सहभागी शाश्वत पद्धतींबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि प्रयत्न करण्यासाठी धावतात.

ही मॅरेथॉन 21 किमी, 10 किमी आणि 5 किमी अशा 3 प्रकारांसाठी आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमासह बँकेने प्रत्येक भारतीयासाठी ‘एसबीआय ग्रीन मॅरेथॉन’द्वारे पर्यावरणाचे रक्षण करण्याची वैयक्तिक जबाबदारीही असल्याचे यातून अधोरेखित केले जाते. 

Continue reading

मुंबई महापालिकेकडून ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर

मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हा निर्णय घोषित केला. या सानुग्रह अनुदानाचा तपशील पुढीलप्रमाणेः १. महापालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये ३१,०००/- २. अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळा...

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...
Skip to content