Homeचिट चॅटअमिताभसोबत काम करताना...

अमिताभसोबत काम करताना कधी भीती वाटली नाही!

मराठीतील दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले असल्यामुळे अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करताना भीती वाटली नाही, असे उद्गार सीआयडीफेम प्रसिद्ध अभिनेते शिवाजी साटम यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या “वार्तालाप” कार्यक्रमात नुकतेच काढले.

भायखळा येथील चाळीतील बालनाटकांतून सुरू झालेला प्रवास, गुन्हेगारी जगतावर आधारित एकशून्यशून्य मराठी मालिका ते आज अनेक चित्रपट, टीव्ही मालिका या सर्व आठवणींना उजाळा देत आज वयाच्या ७४ वर्षांच्या प्रवासातील घटनाक्रम त्यांनी यावेळी उलगडला. लवचिक काठीच्या तलवारीला नारळाच्या करवंटीची मूठ तयार करून शूर शिवाजी पात्राचा अभिनय ते  सीआयडीपर्यंत बंदुकीची गोळी व त्याचा शोध या सर्व पार्श्वभूमीवर बदललेले तंत्रज्ञान त्यांनी सांगितले.

अभिनेता ते नेता अशी संधी आली तर? या थेट प्रश्नाला उत्तर देताना साटम म्हणाले की, नाही.. आता आहे ते ठिक आहे. नको ते राजकारण. “नेता” मी अभिनय करत चित्रपटात साकारला आहे.. तेवढे पुरे.

मुंबई दूरदर्शनवर प्रथम मला कॅमेरा पाहता आला. एकशून्यशून्य या गुन्हे मालिकेने जो अनुभव दिला तो सीआयडीसाठी मोलाचा ठरला. अभिनयाची कारकीर्द आनंदाने पार पाडली व आनंदाने पार पाडणार. मागे न पाहता पुढे पाहत हसतखेळत सर्वांनी राहिले पाहिजे तरच जीवनाचा आनंद घेता येतो. दिग्दर्शक हा चित्रकार असतो. कलाकार त्यातील एक रंग असतो. त्याला आनंद झाला की मला आनंद होतो, असे अनेक किस्से त्यांनी सांगितले.

यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे म्हणाले की, शिवाजी साटम यांचे पाय जमिनीवर आहेत. त्यांच्या अभिनयाचे कौतुक जगभर होत असते. एकदा ट्रॅफिक पोलिसांनी माझी कार अडवली. यावेळी माझ्या मोटारीत पोलिसांनी शिवाजी साटम यांना पाहिले आणि त्यांना सलाम ठोकला.

कार्यवाह संदीप चव्हाण यांनी शिवाजी साटम यांच्या सीआयडी मालिकेतील भूमिकेबद्दल भरभरून कौतुक केले. त्यांच्या या मालिकेमुळे कोणी गुन्हेगारीकडे वळले असे झाले नाही, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content