Homeचिट चॅटअमिताभसोबत काम करताना...

अमिताभसोबत काम करताना कधी भीती वाटली नाही!

मराठीतील दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले असल्यामुळे अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करताना भीती वाटली नाही, असे उद्गार सीआयडीफेम प्रसिद्ध अभिनेते शिवाजी साटम यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या “वार्तालाप” कार्यक्रमात नुकतेच काढले.

भायखळा येथील चाळीतील बालनाटकांतून सुरू झालेला प्रवास, गुन्हेगारी जगतावर आधारित एकशून्यशून्य मराठी मालिका ते आज अनेक चित्रपट, टीव्ही मालिका या सर्व आठवणींना उजाळा देत आज वयाच्या ७४ वर्षांच्या प्रवासातील घटनाक्रम त्यांनी यावेळी उलगडला. लवचिक काठीच्या तलवारीला नारळाच्या करवंटीची मूठ तयार करून शूर शिवाजी पात्राचा अभिनय ते  सीआयडीपर्यंत बंदुकीची गोळी व त्याचा शोध या सर्व पार्श्वभूमीवर बदललेले तंत्रज्ञान त्यांनी सांगितले.

अभिनेता ते नेता अशी संधी आली तर? या थेट प्रश्नाला उत्तर देताना साटम म्हणाले की, नाही.. आता आहे ते ठिक आहे. नको ते राजकारण. “नेता” मी अभिनय करत चित्रपटात साकारला आहे.. तेवढे पुरे.

मुंबई दूरदर्शनवर प्रथम मला कॅमेरा पाहता आला. एकशून्यशून्य या गुन्हे मालिकेने जो अनुभव दिला तो सीआयडीसाठी मोलाचा ठरला. अभिनयाची कारकीर्द आनंदाने पार पाडली व आनंदाने पार पाडणार. मागे न पाहता पुढे पाहत हसतखेळत सर्वांनी राहिले पाहिजे तरच जीवनाचा आनंद घेता येतो. दिग्दर्शक हा चित्रकार असतो. कलाकार त्यातील एक रंग असतो. त्याला आनंद झाला की मला आनंद होतो, असे अनेक किस्से त्यांनी सांगितले.

यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे म्हणाले की, शिवाजी साटम यांचे पाय जमिनीवर आहेत. त्यांच्या अभिनयाचे कौतुक जगभर होत असते. एकदा ट्रॅफिक पोलिसांनी माझी कार अडवली. यावेळी माझ्या मोटारीत पोलिसांनी शिवाजी साटम यांना पाहिले आणि त्यांना सलाम ठोकला.

कार्यवाह संदीप चव्हाण यांनी शिवाजी साटम यांच्या सीआयडी मालिकेतील भूमिकेबद्दल भरभरून कौतुक केले. त्यांच्या या मालिकेमुळे कोणी गुन्हेगारीकडे वळले असे झाले नाही, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content