Homeटॉप स्टोरीपायऱ्यांवर निदर्शने तर...

पायऱ्यांवर निदर्शने तर सभागृहात सहकार्य!

विधानसभेचे हिवाळी अधिवेशन गुरुवारी सुरू झाल्यानंतर पहिले दोन दिवस शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी विधानसभेचे दिवसभराचे सर्व कामकाज बाजूला ठेवून या विषयावर चर्चा करावी, यासाठी आग्रही असलेल्या विरोधी पक्षांनी सोमवारी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली. कांदा निर्यातबंदी करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या राज्य सरकारचा निषेध असो, या घोषणांसह विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, विधानसभेचे कामकाज अकरा वाजता प्रश्नोत्तराच्या तासाने सुरू झाले तेव्हा मात्र विरोधी पक्षांनी कोणताही व्यत्यय आणला नाही आणि प्रश्नोत्तराचा तास शांतपणे सुरू झाला.

गुरुवारी आणि शुक्रवारी बाकी सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा विषय चर्चेला घ्यावा, हा आग्रह धरणाऱ्या विरोधी पक्षांनी सोमवारी प्रश्नोत्तराचा तास सुरळीतपणे होण्यासाठी सरकारला सहकार्य केले.

पायऱ्यांवर

पुण्यातील दहशतवाद्यांवरील कारवाईचे विधानसभेत पडसाद

महेश लांडगे यांनी पुण्यात दहशतवादी कारवायांबद्दलच्या बातम्यांबद्दलचा मुद्दा उपस्थित केला. मशिदीत छापा मारून केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. त्यात भूलतज्ज्ञ डॉक्टरचा समावेश आहे. तेथून चाळीस लोक ताब्यात घेतले आणि म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावता कामा नये, ही आमची मागणी आहे, असेही ते म्हणाले.

धारावीत दडपशाही सुरू असल्याचा आरोप

वर्षा गायकवाड यांनी शून्य प्रहरामध्ये औचित्याच्या मुद्द्याद्वारे निवृत्त एन्काउंटर स्पेशालिस्ट धारावी भागात फिरून दहशत निर्माण करत आहेत, अशी माहिती विधानसभेला दिली. धारावीमध्ये दडपशाही सुरू झाली असून प्रकल्पग्रस्तांना घाबरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रकल्पग्रस्तांचे सर्वेक्षण केलेले नाही आणि नागरिकांना नोटिसा देऊन दहशत माजवली जात आहे. अदानी ग्रुप आल्यापासून ही दहशत माजवण्याचे प्रकार सुरू झाले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

Continue reading

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....

वाटाणा वाटाणा पे लिखा है `खाने’वाले का…

वाटाण्यावाटाण्यात काय फरक असणार, असे कोणी विचारले तर हा प्रश्न निरर्थक मानू नका. हिरव्या आणि पांढऱ्या वाटाण्यात फरक असतो आणि या फरकातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही सरकारवर होऊ शकतो, हे मंगळवारी राज्याच्या विधानसभेत दिसून आले. आमदार कैलास घाडगे-पाटील...

मुनगंटीवार वन्स अगेन!

सरकारी काम म्हणजे सहा महिने थांब... असं कायम म्हटलं जातं आणि नेमका त्याचाच अनुभव राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आल्याचे गुरुवारी राज्याच्या विधानसभेत स्पष्ट झाले. सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांनी आपल्या वृद्ध पालकांची तसेच कुटुंबातील दिव्यांग व्यक्तींची जबाबदारी घ्यावी, याची...
Skip to content