Homeकल्चर +सुनिधि चौहानच्या ‘मन...

सुनिधि चौहानच्या ‘मन हे गुंतले..’ला भरभरून प्रतिसाद!

नुकताच आलेल्या “आटा पिटा” गाण्याने महाराष्ट्रात धुरळा उडवला होता. त्या गाण्याला आपले मधुर स्वर देणारी आणि आपल्या इतर अनेक गीतांमधून रसिकांचं मन नेहमी जिंकणारी गायिका सुनिधि चौहान हिच्या आवाजतलं ‘छापा काटा’ चित्रपटातील गाणं ‘मन हे गुंतले’ २९ नोव्हेंबर २०२३ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाले आहे. गाणं रसिकांच्या मनावर हळवा प्रभाव पाडत असून गाण्याला संपूर्ण महाराष्ट्रातून अविश्वसनीय प्रतिसाद येत आहे.

‘मन हे गुंतले’ गाणं सुनिधि चौहान यांनी गायलं असून गौरव चाटी यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे आणि शिवम बरपंडे यांनी लिहिलं आहे. ‘छापा काटा’ चित्रपटाची निर्मिती सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली असून संदीप मनोहर नवरे यांनी दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी प्रमुख भूमिकेत दिसणार असून मोहन जोशी, अरुण नलावडे, ऋतुराज फडके, पंकज विष्णु, सुश्रृत मंकणी, रीना अग्रवाल आणि विजय पाटकर हे सुप्रसिद्ध अभिनेते झळकणार आहेत.

संगीत म्हटलं की मन अगदी उल्हासित होऊन जातं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक रसिकाच्या मनाला उल्हासित करण्यासाठी सुनिधि चौहान हिच्या सुरेल आवाजातलं गाणं सादर करत असताना आमचा आनंद गगनात न मावणारा आहे. असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content