Homeचिट चॅटश्री स्वामी समर्थ...

श्री स्वामी समर्थ मंदिरात तुलसी विवाह संपन्न!

मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात तुलसी विवाह शनिवारी पारंपरिक पद्धतीने मंगलअष्टकाच्या सुरात, भक्त आणि नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. महेश नाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरातील पुजाऱ्यांनी धार्मिक विधी पार पाडले.

मंदिरावर रंगबेरंगी दिव्यांच्या आकर्षक रोषणाईबरोबर एक भव्य रांगोळी मंदिराच्या प्रांगणात घालण्यात आली होती. ती सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. तुलसी विवाह म्हणजे तुळशीच्या रोपाचे विष्णू किंवा त्यांचा अवतार श्रीकृष्णाशी विवाह प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची पूजोत्सव प्रथा आहे. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात, तेव्हा तुळशीशी लग्न लावतात. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला “प्रबोध” उत्सव असे म्हणतात.भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत, तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते.

तुलसी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे. हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फल मिळते. शिवाय तुलसी विवाह केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. तसेच धनलाभही होतो, असेही मानले जाते.

दिवाळी संपली की, सर्वांना वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे… शुभंकर पावलांनी येणारी दिवाळी सुखाचा रेशीम धागा जगण्याला जोडून देते. प्रत्येकाची जगण्यासाठी रोजची धावपळ सुरूच असते. मग त्यात चिंता, व्यथा या तर नेहमीच्याच असतात. दिनक्रमामधील धावपळ, दगदग, ताणतणाव यांनी व्यापलेल्या आयुष्यात हे सण मनाला उभारी देतात. त्यात दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव मनातील अंधार दूर करून प्रकाशाकडे वाटचाल करा, असा संदेश देणारा आणि मग ती संपली की लगबग सुरू होते ती तुळशीच्या लग्नाची… कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुलसी विवाह प्रारंभ होऊन कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा विधी चालतो. या वर्षी मंगळवारपर्यंत तुळशी विवाह साजरा केला जाईल. तुलसी विवाह महाराष्ट्राच्या बरोबरीने शेजारील गोव्यातदेखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content