Homeचिट चॅटबेस्टने स्वतःच्या मालकीच्या...

बेस्टने स्वतःच्या मालकीच्या बसेस घ्याव्यात!

मुंबई महापालिकेचा उपक्रम असलेल्या बेस्ट प्रशासनाने कंत्राटी बसेस घेण्याऐवजी स्वतःच्या मालकीच्या बसेस घ्याव्यात, अशी मागणी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन केली.

बेस्टची बससेवा अधिक लोकाभिमुख कशी करता येईल याविषयी चर्चा करण्यासाठी कामगार सेनेच्या प्रतिनिधी मंडळाने आमदार ठाकरे यांची खास भेट मातोश्री मुक्कामी घेतली होती. कंत्राटी बसेसमुळे कंत्राटदारांचा फायदा होतो. बेस्ट मात्र तोट्यात जात आहे, ही बाब निदर्शनास आणून अध्यक्ष सामंत यांनी बेस्ट उपक्रमाने सुमारे 3050 बसेस तातडीने खरेदी करण्याची गरज असल्याचे सांगितले. अर्थात ही खरेदी टप्याटप्याने केली जावी तसेच यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने भरीव मदत करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

बेस्ट

केंद्र सरकारच्या शहर वाहतुकीसाठीच्या विविध योजनांचा मुंबई शहरालाही लाभ मिळाला पाहिजे. याबरोबरच कायम कर्मचाऱ्यांची भरती, रखडलेली पदोन्नतीची कामे, वेतन कराराची थकबाकी तसेच ग्रॅज्युइटीसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत आदित्य ठाकरे यांनी महापालिका प्रशासन व राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणीही प्रतिनिधी मंडळाने केली. यात संघटनेचे माजी अध्यक्ष आशिष चेंबूरकर, उमेश सारंग, गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

बेस्ट वाचली पाहिजे आणि ही सेवा अधिक उत्तम करता यावी म्हणून जे जे करावे लागेल ते मी जरूर करेन, असे आश्वासन आमदार आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले.

Continue reading

एलआयसीची ग्राहक आणि एजंटसाठी दोन स्वतंत्र मोबाईल ॲप लॉन्च!

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागराजू यांनी काल मुंबईत एलआयसीचे नवीन ग्राहक ॲप (मायएलआयसी) आणि विक्री मध्यस्थांसाठीचे (एजंट) मोबाईल ॲप (सुपर सेल्स साथी) यांचे अनावरण केले. 26 कोटींहून अधिक पॉलिसी आणि भारतातील सर्वात व्यापक विमा पदचिन्हासह...

‘पेड दर्शन’साठी मंदिरे, पैशांसाठी थाटलेली दुकाने आहेत का?

पैशांअभावी दर्शन नाकारले जाणे हा त्यांच्या श्रद्धेचा अपमान आहे आणि संविधानाने दिलेल्या मूलभूत घटनात्मक धार्मिक अधिकारावर आणलेली गदा आहे. केवळ उत्पन्नवाढीचा विचार करण्यासाठी मंदिर हे एखादे व्यावसायिक आस्थापन वा दुकान आहे का?, असा सवाल करत मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक...

‘संगीत शांतीब्रह्म’ने जिंकली रसिक प्रेक्षकांची मने!

संगीत रंगभूमीच्या वैभवशाली कालखंडाची आठवण करून देणारा संगीतनाट्य महोत्सव मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात नुकताच साजरा झाला. रसिकांच्या गर्दीने हा संगीतनाट्य महोत्सव विशेष रंगत गेला. ही संस्था गेली अनेक वर्षे संगीतनाटकांना पुनश्च वैभव प्राप्त करून देण्यासाठी हा महोत्सव आयोजित करत...
Skip to content