Homeचिट चॅट.. आणि जेव्हा...

.. आणि जेव्हा टँकरच विमानात सामावतो!

कोविड-19च्या दुसऱ्या लाटेविरुद्ध उभारलेल्या लढ्यात, कोविड रुग्णालये आणि सुविधा केंद्र स्थापन उभारण्यासाठी तसेच कार्यरत असलेली रुग्णालये आणि केंद्रांना पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेले ऑक्सिजन कंटेनर (टँकर), सिलेंडर, अत्यावश्यक औषधे, उपकरणे आदींचा पुरवठा करण्यासाठी भारतीय हवाई दल अतिशय तत्परतेने कार्यरत झाले आहे.

देशाच्या विविध भागातून हवाई मार्गाने ही सामग्री घेऊन निर्धारित ठिकाणी पोहोचवण्यासाठी हवाई दलाची विमाने उड्डाणे करत आहेत. यासाठी हवाई दलाच्या मालवाहतूक करणाऱ्या विमानांचा आणि हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. सी-17, सी-130 जे, आयएल-76, एन -32 आणि ऍवरो या मालवाहतूक करणाऱ्या विमानांचा त्यात समावेश आहे.

या कामासाठी चिनूक आणि एमआय-17 ही हेलिकॉप्टर राखीव ठेवण्यात आली आहेत. यामध्ये कोची, मुंबई, वायझॅग आणि बेंगळुरू येथील डॉक्टर आणि परिचारिकांना दिल्लीतील रुग्णालयात सेवेत दाखल होण्यासाठी हवाई मार्गे दिल्लीला पोहोचविण्याच्या कामाचाही समावेश आहे.

अतिशय गरजेच्या असलेल्या ऑक्सिजनचे वितरण वेगाने व्हावे यासाठी, भारतीय हवाई दलाच्या सी-17 आणि आयएल-76 या विमानांमधून मोठे रिकामे ऑक्सिजन टँकर त्यांच्या वापराच्या ठिकाणाहून देशभरातील ऑक्सिजन भरणा केंद्रांवर नेण्यात येत आहेत. याव्यतिरिक्त, लेह येथे अतिरिक्त कोविड चाचणी केंद्र उभारण्यासाठी सी-17 आणि आयएल-76 या विमानांनी बायोसॅफ्टी कॅबिनेट्स आणि ऑटोक्लेव्ह यंत्रांची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली आहे.

अतिशय तातडीने उड्डाण करण्यासाठी भारतीय हवाई दलाची मालवाहतूक विमाने आणि हेलिकॉप्टर सज्ज ठेवण्यात आली आहेत. 2020मध्ये कोविड-19च्या उद्रेकाच्या सुरुवातीच्या काळात, भारतीय हवाई दलाने कोरोना विषाणू साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी हवाईमार्गे आवश्यक औषधे, वैद्यकीय आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला तसेच परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणले होते.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content