Sunday, September 8, 2024
Homeडेली पल्सबोगस विमा अधिकाऱ्यांचे...

बोगस विमा अधिकाऱ्यांचे 372 मोबाईल ब्लॉक!

बनावट एलआयसी अधिकारी आणि विमा कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगून तसेच एसबीआयची बक्षिसे मिळवण्याबाबतच्या बनावट एसएमएसद्वारे लोकांना फसवले जात होते. 14 मोबाईल क्रमांकांवरून अशी फसवणूक झाल्याचे नागरिकांनी 19 मे रोजी दूरसंचार विभागाच्या निदर्शनास आणले. दूरसंचार विभागाने 24 तासांच्या आत या प्रकरणांचे विश्लेषण केले आणि संबंधित मोबाईल क्रमांकाचे सर्व दुवे शोधून काढले. त्यानंतर त्याअनुषंगाने 21 मे रोजी संपूर्ण भारतात या मोबाईल क्रमांकाशी जोडलेले 372 मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्यात आले. 906 मोबाईल जोडण्या निलंबित करण्यात आल्या आणि त्यांना पुन्हा पडताळणीसाठी चिन्हांकित करण्यात आले.

नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच ‘चक्षु – रिपोर्ट संशयित फसवणूक संवाद’ या संचार साथी पोर्टलच्या (www.sancharsaathi.gov.in/sfc) सुविधेवर अशा फसवणुकीची तक्रार नोंदवावी, असे आवाहन विभागाने केले आहे. अशा प्रकारचे सक्रीय अहवाल, दूरसंचार संसाधनांचा सायबर-गुन्हेगारी, आर्थिक

फसवणूक इत्यादींसाठी होणारा गैरवापर रोखण्यामध्ये दूरसंचार विभागाला सहाय्य करतात. दूरसंचार विभाग / भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाची तोतयागिरी करणाऱ्या बनावट सूचना, संशयित फसवणूक करणारे संवाद आणि प्रेस, एसएमएस आणि सोशल मीडियाद्वारे फसवणूक अथवा दिशाभूल करणारे कॉल, याबाबत जनजागृती करण्यासाठी नियमितपणे सूचना जारी करते.

नागरिकांची सावध नजर आणि जलद कृती, केवळ त्यांचे नव्हे, तर इतर असंख्य लोकांचे घोटाळे, फिशिंग, अर्थात संवेदनशील माहिती चोरण्याचा प्रयत्न आणि फसव्या उपक्रमांना बळी पडण्यापासून संरक्षण करतात. संशयास्पद संदेश, कॉल आणि तोतयागिरीचे प्रयत्न, याबाबत तक्रार करून, हे नागरिक सायबर गुन्हेगारांपासून आपले संरक्षण करणारी पहिली फळी म्हणून काम करते. नागरिकांचा हा तत्पर दृष्टीकोन दूरसंचार विभागाला (DoT) सायबर गुन्ह्यांचा सामना आणि त्याचा प्रतिबंध करण्यासाठी उपयोगी ठरतो.

Continue reading

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राची बाजी!

गेले दोन वर्षं सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1वर असलेल्या महाराष्ट्रात 2024-2025, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतसुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. थोडक्यात सांगायचे...

उद्यापासून श्री गणेशोत्सव!

उद्यापासून गणेशोत्सव! गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या वातावरणामुळे भाविकांमध्ये आंनद आणि उत्साह संचारतो. श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या...

अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट अर्पण!

गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोककाव्याची स्वरभेट लोकप्रिय ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिरात मंगळवारी सकाळी श्रींच्या चरणी अर्पण केली. श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर,...
error: Content is protected !!
Skip to content