Homeन्यूज अँड व्ह्यूजराज्यपालांच्या माजी प्रधान...

राज्यपालांच्या माजी प्रधान सचिवांना 20 लाखांचा दंड!

महाराष्ट्राच्या राज्यपालांचे माजी प्रधान सचिव संतोष कुमार यांनी त्यांची बदली झाल्यानंतरही तीन महिने मुंबईतल्या राजभवन परिसरातील राजभवनातील जलदर्शन बंगल्यात राहत होते. त्यामुळे राजभवनाने त्यांना 20 लाखांचा दंड भरण्यासाठी नोटीस काढल्याचे नुकतेच दिसून आले आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती देण्यात आली आहे. आपल्यावर झालेल्या दंडात्मक कारवाईपोटी देय असलेली रक्कम माफ करावी, अशी विनंती संतोष कुमार यांनी केली असून त्यावर कार्यवाही सुरू असल्याचे राज्यपालांच्या परिवार प्रबंधक कार्यालयाच्या कार्यालयीन अधिक्षिका प्रांजली आंब्रे यांनी गलगली यांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

प्रधान सचिव

राज्यपालाचे प्रधान सचिव असलेले संतोष कुमार यांना 12 फेब्रुवारी आणि 23 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यपालांच्या परिवार प्रबंधकांनी बजावण्यात आलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, तुम्ही राज्यपालांचे प्रधान सचिव असताना तुम्हाला राजभवनमधील जलदर्शन येथे सरकारी निवासस्थान देण्यात आले होते. परंतु हा बंगला पदभार सोडल्यानंतर 3 महिन्यांच्या अनुज्ञेय कालावधीनंतरही रिकामा करण्यात आलेला नाही. राजभवन (निवासाचे वाटप नियम), 2010 च्या नियम 11(फ) नुसार 3 महिन्यांच्या अनुज्ञेय कालावधीनंतर निवासस्थान रिकामे करणे बंधनकारक आहे. सध्या संतोष कुमार प्रधान सचिव आणि ओएसडी (अपील), महसूल आणि वन विभाग या पदावर कार्यरत आहेत. अनुज्ञेय कालावधीनंतरही निवासस्थान रिक्त न केल्याने शासन निर्णयानुसार रु 150 प्रति चौरस फूट या दराने 20, 52, 325 रुपये त्यांना लागू होत आहेत.

अनेकदा शासकीय निवासस्थान मुदतीत न सोडणारे अधिकारी दंडात्मक असलेले अनुज्ञप्ति शुल्क अदा करत नाही. नंतर त्यांच्या विनंतीचा विचार करत मुख्यमंत्री त्यांचा दंड आपल्या अधिकारात माफ करतात. संतोष कुमार यांच्याबाबतीतही हेच होणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Continue reading

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...

फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी सीबीआयचे ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’!

आंतरराष्ट्रीय पातळीवर फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी तसेच जगभरातील पोलीस दलांसोबत रिअल-टाइममध्ये समन्वय साधण्याकरीता सीबीआयने नुकतेच ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’ स्थापन केले आहे. फरारी गुन्हेगारांचा मुद्दा केवळ देशाचे सार्वभौमत्व, आर्थिक स्थैर्य आणि कायदा आणि सुव्यवस्थेशीच नव्हे तर देशाच्या सुरक्षेशीदेखील संबंधित आहे. परदेशात...

धनत्रयोदशीच्या दिवशी ‘अशुभ’ दक्षिणेलाच का लावतात दिवा?

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो...
Skip to content