Homeपब्लिक फिगररिहानाला एका ट्विटसाठी...

रिहानाला एका ट्विटसाठी १८ कोटीची बिदागी?

शेतकरी आंदोलनावरुन भारताच्या विरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवरुन आगपाखड करण्यात येत आहे. पण ही आगपाखड म्हणजे केवळ भारताला व मोदी सरकारला बदनाम करण्यासाठीचे रचलेले षडयंत्र होते. पॉप गायिका रिहानाला एक ट्विट करण्यासाठी स्कायरॉकेट पीआर फर्मकडून १८ कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती उघड झाल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

प्रिंट, या न्यूज वेब पोर्टलवर या षडयंत्राची महिती प्रसिद्ध झाल्यामुळे शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली आपली राजकीय पोळी भाजण्याचे काही मंडळींचे षडयंत्र उघड झाले आहे. प्रिंटमधील वृत्तानुसार, पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गद्वारे आधी केलेले ट्विट नंतर डिलीट करण्यात आलेल्या टूलकिटमुळे भारताच्या विरोधात सुरू असलेल्या या आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा खुलासा झाला आहे. या टूलकिटमध्ये कोणत्या आंतरराष्ट्रीय सेलेब्रिटीला कधी आणि काय ट्विट करायचं आहे, कोणत्या दिवशी शेतकरी आंदोलनात काय घटना घडतील, या सर्व गोष्टींची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील घटनादेखील याच षडयंत्राचा भाग होती, असेही या वृत्तामध्ये नमूद करण्यात आल्याचे पाटील यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

हे सर्व प्रकरण अतिशय गंभीर असून याची चौकशी करुन या आंतरराष्ट्रीय षडयंत्रात कोण सहभागी आहेत याचाही तपास झाला पाहिजे अशी मागणी करतानाच पाटील म्हणाले की, केवळ राजकीय स्वार्थ साधणारे हे लोक भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी धोकादायक ठरत आहेत. काही न्यूज रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, कॅनडामधील पीएफजे नावाच्या संघटनेचा या आंतरराष्ट्रीय षडयंत्रात सहभाग असल्याचे समोर आले आहे. भारताच्या गुप्तचर संघटनांच्या रडारमध्ये पीएफजेच्या संस्थापकासह स्कायरॉकेट नावाच्या पब्लिक रिलेशन्स फर्मचा डायरेक्टर आणि काही इतर लोकांचाही समावेश होता.

या आंतरराष्ट्रीय लोकांना भारत, कृषी कायदे आणि कृषीविषयक कोणत्याही गोष्टींबद्दल कसलेही ज्ञान नाही. शेतकरी आंदोलनासंदर्भातील ट्विटस भारतावर लांछन लावण्यासाठी व भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी जाणीवपूर्वक केले जात आहेत असा आरोपही त्यांनी केला.

Continue reading

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात...

लाभ घ्या आयुष्मान भारत आणि म. फुले जनआरोग्य योजनेचा

महाराष्ट्रात ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना’ एकत्रित राबविण्यात येत असून राज्यातल्या सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सर्व लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड राज्यातल्या आशा कर्मचारी, आपले सरकार सेवा केंद्रातील कर्मचारी तसेच स्वस्त धान्य दुकानचालक यांच्यामार्फत तयार केले...

एमआयजी क्रिकेट क्लबची राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

मुंबईतल्या एमआयजी क्रिकेट क्लबच्या वतीने तिसरी महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धा येत्या 27 ते 29 सप्टेंबर 2025दरम्यान एमआयजी क्रिकेट क्लब, कलानगर वांद्रे (पाश्चिम), मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन विभागात खेळविण्यात येणाऱ्या या...
Skip to content