Homeटॉप स्टोरीउद्या मुंबईत पाणीपुरवठ्यात...

उद्या मुंबईत पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात!

पिसे येथील बांधावरील गेटच्या ३२पैकी एका रबरी ब्लाडरमध्ये शनिवार, १६ मार्चला अचानक बिघाड झाल्‍याने पाणीगळती सुरू झाली. या ब्लाडरची दुरुस्ती करण्यासाठी पिसे येथील पाण्याची पातळी ३१ मीटरपर्यंत खाली आणण्यासाठी भातसा धरणातून येणारा पुरवठा नियंत्रित करावा लागला. त्यानंतर बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाने रबरी ब्लाडर दुरूस्‍तीचे काम आज सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत युद्धपातळीवर पूर्ण केले. त्यानंतर भातसा धरणातून पुनश्च पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, बंधाऱ्याची पाणीपातळी पूर्ववत होण्‍याकरिता कालावधी लागणार असल्‍याने उद्या मंगळवारी एका दिवसासाठी संपूर्ण मुंबई महानगराच्‍या पाणीपुरवठ्यात १५ टक्‍के पाणीकपात केली जाणार आहे.

भातसा धरणातून सोडण्‍यात आलेले पाणी पिसे येथे बंधारा बांधून तयार केलेल्या जलाशयामध्‍ये साठविले जाते. पालिकेच्‍या पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्‍ये प्रक्रिया करून येवई येथील महासंतुलन जलाशयामार्फत मुंबईकरांना हा पाणीपुरवठा केला जातो. भातसा धरणातून पिसे बंधाऱ्यासाठी पाणी सोडण्‍यात आले आहे. तथापि, धरण ते बंधारा यातील अंतर सुमारे ४८ किलोमीटर आहे. त्‍यामुळे पिसे बंधाऱ्यातील पाणीपातळी वाढण्‍यास कालावधी लागणार आहे. त्यामुळे ही पाणीकपात करण्यात येत आहे. या काळात नागरिकांनी पाण्‍याचा जपून व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिका प्रसासनाने केले आहे.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content