HomeArchive`हौजी राईड २०१९'...

`हौजी राईड २०१९’ च्या नावनोंदणीस प्रारंभ

Details
`हौजी राईड २०१९’ च्या नावनोंदणीस प्रारंभ

    03-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
वुई वन इव्हेन्ट यांच्या वतीने आणि महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवा कल्याण मंत्रालय तसेच पुरातत्व विभाग यांच्या सहकार्याने खेळातून सामाजिक संदेश देणारा हौजी राईड २०१९, हा उपक्रम आयोजित केला आहे. २४ नोव्हेंबर २०१९ यादिवशी मुंबईत होणाऱ्या या उपक्रमाचे यंदाचे दुसरे वर्ष असून याबाबतची क्रीडा क्षेत्रातील उत्सुकता ध्यानात घेऊन यंदा लवकरच नावनोंदणी करण्यास सुरूवात केली गेली आहे.
 
 
मुंबईतील पुरातत्व विभागाने सांस्कृतिक वारसा जतन करणारी काही स्थळं निश्चित केली असून दुचाकीवरून स्पर्धकांना त्याचा ठावठिकाणा शोधावा लागणार आहे. त्याचबरोबर सुरक्षित वाहन चालविण्याचे निकषदेखील यंत्रणेच्या माध्यमातून तपासून स्पर्धकांना एकूण १० लाख रूपयांची वेगवेगळ्या वर्गवारीतील पारितोषिके दिली जाणार आहेत. ही एक अनोखी सहल आणि सफर असेल. मुंबईतील विविध ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्थळांचा शोध त्यातून घेता येईल. हौजी खेळाप्रमाणे बाईकस्वारांना एक तिकीट व क्ल्यू बुक दिले जाईल. त्यानुसार त्या त्या क्रमांकावरील स्थळे शोधायची आहेत. संबंधित ठिकाण बरोबर शोधले की नाही, हे स्पर्धकांना त्यांच्याजवळ दिलेल्या यंत्राद्वारे कळणार आहे. स्पर्धा जिंकण्याच्या भरात त्यांनी बाईक व्यवस्थित चालवली का, वेगमर्यादा ओलांडली का, अर्जंट ब्रेक किती वेळा वापरला याचेही परिक्षण होणार आहे.
 
 
यंदा स्पर्धकांकडून आलेली मागणी विचारात घेता इच्छुकांनी नावनोंदणी लवकरच करावी. स्पर्धेची अधिक माहिती www.houjiride.com या संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत ९०८२३७५३८३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन स्पर्धेच्या आयोजकांनी केले आहे.”

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 

“वुई वन इव्हेन्ट यांच्या वतीने आणि महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवा कल्याण मंत्रालय तसेच पुरातत्व विभाग यांच्या सहकार्याने खेळातून सामाजिक संदेश देणारा हौजी राईड २०१९, हा उपक्रम आयोजित केला आहे. २४ नोव्हेंबर २०१९ यादिवशी मुंबईत होणाऱ्या या उपक्रमाचे यंदाचे दुसरे वर्ष असून याबाबतची क्रीडा क्षेत्रातील उत्सुकता ध्यानात घेऊन यंदा लवकरच नावनोंदणी करण्यास सुरूवात केली गेली आहे.”
 
 
“मुंबईतील पुरातत्व विभागाने सांस्कृतिक वारसा जतन करणारी काही स्थळं निश्चित केली असून दुचाकीवरून स्पर्धकांना त्याचा ठावठिकाणा शोधावा लागणार आहे. त्याचबरोबर सुरक्षित वाहन चालविण्याचे निकषदेखील यंत्रणेच्या माध्यमातून तपासून स्पर्धकांना एकूण १० लाख रूपयांची वेगवेगळ्या वर्गवारीतील पारितोषिके दिली जाणार आहेत. ही एक अनोखी सहल आणि सफर असेल. मुंबईतील विविध ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्थळांचा शोध त्यातून घेता येईल. हौजी खेळाप्रमाणे बाईकस्वारांना एक तिकीट व क्ल्यू बुक दिले जाईल. त्यानुसार त्या त्या क्रमांकावरील स्थळे शोधायची आहेत. संबंधित ठिकाण बरोबर शोधले की नाही, हे स्पर्धकांना त्यांच्याजवळ दिलेल्या यंत्राद्वारे कळणार आहे. स्पर्धा जिंकण्याच्या भरात त्यांनी बाईक व्यवस्थित चालवली का, वेगमर्यादा ओलांडली का, अर्जंट ब्रेक किती वेळा वापरला याचेही परिक्षण होणार आहे.”
 
 
“यंदा स्पर्धकांकडून आलेली मागणी विचारात घेता इच्छुकांनी नावनोंदणी लवकरच करावी. स्पर्धेची अधिक माहिती www.houjiride.com या संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत ९०८२३७५३८३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन स्पर्धेच्या आयोजकांनी केले आहे.”

Continue reading

महाराष्ट्रात भरदिवाळीत अवकाळी पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्र आणि केरळ-कर्नाटक किनाऱ्यावरील लक्षद्वीप क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. पुढील 24 तासांत ते पश्चिम-वायव्येकडे म्हणजेच बंगालच्या उपसागरावर सरकण्याची आणि कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात...

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर...

उपेक्षितांना सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कारीत करा!

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्त्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत घेऊन जाणे, त्यांना केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कारीत करणे हेच आपल्या जीवनाचे धेय्य असल्याचे...
Skip to content