HomeArchiveसचिन घरोटे ठरला...

सचिन घरोटे ठरला स्वातंत्र्यवीर दौडचा पहिला विजेता!

Details
सचिन घरोटे ठरला स्वातंत्र्यवीर दौडचा पहिला विजेता!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतल्या शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या परिसरातील रविवारची सकाळ भरून गेली होती अबालवृद्ध धावपटूंनी. कारण होते स्वातंत्र्यवीर दौड 2019 च्या पहिल्या पर्वाचे. यात सहभागी होण्यासाठी मुंबईसह नागपूर, पुणे, सातारा, पालघर तसेच महाराष्ट्राच्या विविध भागांतील हजारो स्पर्धक उत्साहाने यात सहभागी झाले. भारतीय सीमेवर शत्रूंशी झुंजणाऱ्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना सहाय्य म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 136 व्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येवर याचे आयोजन करून एक आगळीवेगळी आदरांजली यानिमित्ताने दिली गेली. स्पर्धेच्या निमित्ताने स्पर्धक तसेच शिवाजी पार्क व परिसरातील नागरिकांचा उत्साह विशेष होता.

 
या पहिल्या मॅरॅथॉनचा विजेता होण्याचा मान पटकावला सचिन घरोटे याने. स्पर्धेचे विशेष म्हणजे टीम व्हिजन या अंधांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे अंध स्पर्धकदेखील यात सहभागी झाले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, विश्वस्त मंजिरी मराठे, राजेंद्र वराडकर, विकास सबनीस तसेच उषा सोमण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पारटकर, नगरसेवक अरविंद भोसले, स्वप्नील सावरकर, अभिनेते श्रीरंग देशमुख, निवेदिका मालविका मराठे आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. स्पर्धाप्रमुख विज्ञानेश मासावकर तसेच गुरूरचरणसिंह सिद्धू यांनी संपूर्ण स्पर्धेचे यशस्वी नियोजन केले.

विविध गटांतील पहिल्या तीन विजेत्यांची नावे अशीः 10 किमी – पुरूष – 18 ते 27 वयोगट – संदीप पाल, विनोद सामावडवी, प्रवीण यादव, 28 ते 37 वयोगट – अनिल कोरवी, दीपक बंडपे, किसन लाल, 38 ते 47 वयोगट – तानाजी, नितीन, अरूण. 48 ते 57 वयोगट – पांडुरंग, नागोराव भोयर, निहाल, 58 वर्षांवरील – केशव मोटे, युजीन कॉड्रस, बजरंग चव्हाण, महिला विभाग – 18 ते 27 वयोगट – आरती, शिवानी गुप्ता, प्रमिला, 28 ते 37 वयोगट – मिनाज नादूस, बड्रीयन करवचवाला, देवयानी कदम, 37 ते 48 वयोगट – डॉ. इंदू टंडन, शारदा भोयर, माधवी सुब्रमण्यम, 48 ते 57 वयोगट – अरूधन अल्फोन्स, चित्रा नाडकर्णी, अंजना जंगी, 58 वर्षांवरील – नीता रामकृष्ण व दक्षा गडाविया.
5 किमी – गटातील पहिले चार विजेते – पुरूष विभाग, अॅम्युअल अलिया, मोहन, अविनाश पवार, अक्षय पडवळ, महिला विभाग – रूपा अशोक, सविता यादव, साक्षी राजे, सायरी म्हैसधुसे. 3 किमी – गटातील पहिले तीन विजेते – मुले – सुजीत कामत, पवन पटेल, देवेश हुमरमठेकर – मुली – गायत्री शिंदे, अश्विनी मेकाल, ओशिन दुखंडे.

 
3 किमी, 5 किमी तसेच 10 किमी अशा तीन गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण अडीच लाख रूपये किंमतीची पारितोषिके दिली गेली तसेच सहभागी झालेल्या प्रत्येकाला प्रमाणपत्रदेखील देण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने अनेक पातळ्यांवर कार्य करून समाजात विविध माध्यमांतून राष्ट्रभक्ती वृद्धींगत करण्यावर भर दिला जातो. त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला तसेच आरोग्य जपण्याचा संदेशदेखील दिला गेला. अशाप्रकारची ही स्पर्धा पहिल्यांदाच होत असून येणा-या काळात त्याचे स्वरूप अधिक व्यापक करण्यावर भर दिला जाईल, अशी माहिती स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी दिली.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतल्या शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या परिसरातील रविवारची सकाळ भरून गेली होती अबालवृद्ध धावपटूंनी. कारण होते स्वातंत्र्यवीर दौड 2019 च्या पहिल्या पर्वाचे. यात सहभागी होण्यासाठी मुंबईसह नागपूर, पुणे, सातारा, पालघर तसेच महाराष्ट्राच्या विविध भागांतील हजारो स्पर्धक उत्साहाने यात सहभागी झाले. भारतीय सीमेवर शत्रूंशी झुंजणाऱ्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना सहाय्य म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 136 व्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येवर याचे आयोजन करून एक आगळीवेगळी आदरांजली यानिमित्ताने दिली गेली. स्पर्धेच्या निमित्ताने स्पर्धक तसेच शिवाजी पार्क व परिसरातील नागरिकांचा उत्साह विशेष होता.

 
या पहिल्या मॅरॅथॉनचा विजेता होण्याचा मान पटकावला सचिन घरोटे याने. स्पर्धेचे विशेष म्हणजे टीम व्हिजन या अंधांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे अंध स्पर्धकदेखील यात सहभागी झाले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, विश्वस्त मंजिरी मराठे, राजेंद्र वराडकर, विकास सबनीस तसेच उषा सोमण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पारटकर, नगरसेवक अरविंद भोसले, स्वप्नील सावरकर, अभिनेते श्रीरंग देशमुख, निवेदिका मालविका मराठे आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. स्पर्धाप्रमुख विज्ञानेश मासावकर तसेच गुरूरचरणसिंह सिद्धू यांनी संपूर्ण स्पर्धेचे यशस्वी नियोजन केले.

विविध गटांतील पहिल्या तीन विजेत्यांची नावे अशीः 10 किमी – पुरूष – 18 ते 27 वयोगट – संदीप पाल, विनोद सामावडवी, प्रवीण यादव, 28 ते 37 वयोगट – अनिल कोरवी, दीपक बंडपे, किसन लाल, 38 ते 47 वयोगट – तानाजी, नितीन, अरूण. 48 ते 57 वयोगट – पांडुरंग, नागोराव भोयर, निहाल, 58 वर्षांवरील – केशव मोटे, युजीन कॉड्रस, बजरंग चव्हाण, महिला विभाग – 18 ते 27 वयोगट – आरती, शिवानी गुप्ता, प्रमिला, 28 ते 37 वयोगट – मिनाज नादूस, बड्रीयन करवचवाला, देवयानी कदम, 37 ते 48 वयोगट – डॉ. इंदू टंडन, शारदा भोयर, माधवी सुब्रमण्यम, 48 ते 57 वयोगट – अरूधन अल्फोन्स, चित्रा नाडकर्णी, अंजना जंगी, 58 वर्षांवरील – नीता रामकृष्ण व दक्षा गडाविया.
5 किमी – गटातील पहिले चार विजेते – पुरूष विभाग, अॅम्युअल अलिया, मोहन, अविनाश पवार, अक्षय पडवळ, महिला विभाग – रूपा अशोक, सविता यादव, साक्षी राजे, सायरी म्हैसधुसे. 3 किमी – गटातील पहिले तीन विजेते – मुले – सुजीत कामत, पवन पटेल, देवेश हुमरमठेकर – मुली – गायत्री शिंदे, अश्विनी मेकाल, ओशिन दुखंडे.

 
3 किमी, 5 किमी तसेच 10 किमी अशा तीन गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण अडीच लाख रूपये किंमतीची पारितोषिके दिली गेली तसेच सहभागी झालेल्या प्रत्येकाला प्रमाणपत्रदेखील देण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने अनेक पातळ्यांवर कार्य करून समाजात विविध माध्यमांतून राष्ट्रभक्ती वृद्धींगत करण्यावर भर दिला जातो. त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला तसेच आरोग्य जपण्याचा संदेशदेखील दिला गेला. अशाप्रकारची ही स्पर्धा पहिल्यांदाच होत असून येणा-या काळात त्याचे स्वरूप अधिक व्यापक करण्यावर भर दिला जाईल, अशी माहिती स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी दिली.”
 
 

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content