HomeArchiveम्हाडाच्या २१७ घरांची...

म्हाडाच्या २१७ घरांची आणि २७६ दुकानांची जाहिरात निघाली!

Details
म्हाडाच्या २१७ घरांची आणि २७६ दुकानांची जाहिरात निघाली!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २१७ घरांची आणि मुंबई-कोकणातील २७६ दुकानांच्या सोडतीची जाहिरात रविवारी ३ मार्चला प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी दिली.

मुंबईतील २१७ घरांसाठी अर्ज नोंदणी ७ मार्चपासून सुरू होणार आहे. बँकेत अनामत रक्कमासहीत अर्ज भरण्याच्या शेवट १३ एप्रिल असणार आहे. सोडत २१ एप्रिल रोजी होणार आहे. तसेच २७६ दुकानांसाठी ५ मार्चपासून सकाळी ११ वाजता ई-लिलावाची नोंदणी सुरू होणार असून अंतिम दिनांक ३० मार्च सायंकाळी ५ पर्यंत ऑनलाईन अर्ज-अनामत रक्कम भरता येणार आहे. ई-लीलाव (ऑनलाईन बोली) सुरू होण्याचा दिनांक २ एप्रिल ते ५ एप्रिल असून दुकांनानांची सोडत ८ एप्रिलला जाहीर करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

या सोडतीत अल्प उत्पन्न गटासाठी चेम्बूर येथील शेल टॉवर, सहकार नगर, इमारत क्र. २, २३, २३, ३७ एकूण १७० सदनिका ह्या ३४८ ते ३८१ चौ. फुटांचा आहेत. त्यांची किंमत ३१ लाख ५४ हजार ते ३४ लाख३३ हजार आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी चेम्बूर सहकार नगर येथे एक सदनिका असून त्यांची किंमत ३९ लाख ६४ हजार तर पवई येथे ४६ सदनिका असून किंमत ५५ लाख ६१ हजार आहे. सायन प्रतीक्षा नगर येथे ३५ दुकाने असून त्यांची किंमत २२ लाख ५५ हजार ते ४० लाख २५ हजार आहे. न्यू हिंद मिल माझगाव येथे ४ किंमत ६१ लाख ६९ हजार आहे. विनोबा भावे नगर कुर्ला येथे १४ किंमत ६७ लाख १६ हजार ते ९१ लाख २५ हजार आहे. स्वदेशी मिल कुर्ला येते ५ किंमत ६७ लाख १५ हजार ते ९१ लाख २४ हजार आहे. तुर्भे मांडले मानखुर्द येथे ७ किंमत ३० लाख ४८ हजार आहे. तुंगा पवई येथे ५ किंमत ५४ लाख ८४ हजार आहे. मुलुंड गव्हाण पाडा येते ११ किंमत ४३ लाख ५५ हजार ते ८८ लाख ८३ हजार आहे. जोगेश्वरी मजासवाडी १ किंमत ७२ लाख १० हजार, गोरेगाव सिद्धार्थ नगर येथे किंमत १ कोटी ४९ लाख ४५ हजार आहे. शास्त्री नगर गोरेगाव येथे किंमत ६३ लाख १८ हजार ते ७१ लाख २२ हजार आहे. तर चारकोप येथे किंमत ४१ लाख ८७ हजार ते ९६ लाख ४१ हजार आहे. मालाड मालवणी ६९, किंमत ४३ लाख २४ हजार ते ५७ लाख आणि विरार-बोळींज येते ५७, किंमत १६ लाख ६८ हजार ते ९० लाख तसेच वेंगुर्ला, सिंधुदूर्ग २०, किंमत १० लाख ते १६ लाख ८३ हजार आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २१७ घरांची आणि मुंबई-कोकणातील २७६ दुकानांच्या सोडतीची जाहिरात रविवारी ३ मार्चला प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी दिली.

मुंबईतील २१७ घरांसाठी अर्ज नोंदणी ७ मार्चपासून सुरू होणार आहे. बँकेत अनामत रक्कमासहीत अर्ज भरण्याच्या शेवट १३ एप्रिल असणार आहे. सोडत २१ एप्रिल रोजी होणार आहे. तसेच २७६ दुकानांसाठी ५ मार्चपासून सकाळी ११ वाजता ई-लिलावाची नोंदणी सुरू होणार असून अंतिम दिनांक ३० मार्च सायंकाळी ५ पर्यंत ऑनलाईन अर्ज-अनामत रक्कम भरता येणार आहे. ई-लीलाव (ऑनलाईन बोली) सुरू होण्याचा दिनांक २ एप्रिल ते ५ एप्रिल असून दुकांनानांची सोडत ८ एप्रिलला जाहीर करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

या सोडतीत अल्प उत्पन्न गटासाठी चेम्बूर येथील शेल टॉवर, सहकार नगर, इमारत क्र. २, २३, २३, ३७ एकूण १७० सदनिका ह्या ३४८ ते ३८१ चौ. फुटांचा आहेत. त्यांची किंमत ३१ लाख ५४ हजार ते ३४ लाख३३ हजार आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी चेम्बूर सहकार नगर येथे एक सदनिका असून त्यांची किंमत ३९ लाख ६४ हजार तर पवई येथे ४६ सदनिका असून किंमत ५५ लाख ६१ हजार आहे. सायन प्रतीक्षा नगर येथे ३५ दुकाने असून त्यांची किंमत २२ लाख ५५ हजार ते ४० लाख २५ हजार आहे. न्यू हिंद मिल माझगाव येथे ४ किंमत ६१ लाख ६९ हजार आहे. विनोबा भावे नगर कुर्ला येथे १४ किंमत ६७ लाख १६ हजार ते ९१ लाख २५ हजार आहे. स्वदेशी मिल कुर्ला येते ५ किंमत ६७ लाख १५ हजार ते ९१ लाख २४ हजार आहे. तुर्भे मांडले मानखुर्द येथे ७ किंमत ३० लाख ४८ हजार आहे. तुंगा पवई येथे ५ किंमत ५४ लाख ८४ हजार आहे. मुलुंड गव्हाण पाडा येते ११ किंमत ४३ लाख ५५ हजार ते ८८ लाख ८३ हजार आहे. जोगेश्वरी मजासवाडी १ किंमत ७२ लाख १० हजार, गोरेगाव सिद्धार्थ नगर येथे किंमत १ कोटी ४९ लाख ४५ हजार आहे. शास्त्री नगर गोरेगाव येथे किंमत ६३ लाख १८ हजार ते ७१ लाख २२ हजार आहे. तर चारकोप येथे किंमत ४१ लाख ८७ हजार ते ९६ लाख ४१ हजार आहे. मालाड मालवणी ६९, किंमत ४३ लाख २४ हजार ते ५७ लाख आणि विरार-बोळींज येते ५७, किंमत १६ लाख ६८ हजार ते ९० लाख तसेच वेंगुर्ला, सिंधुदूर्ग २०, किंमत १० लाख ते १६ लाख ८३ हजार आहे.”

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content