HomeArchiveमोहिली व्हिलेजच्या रहिवाशांना...

मोहिली व्हिलेजच्या रहिवाशांना बेघर करणाऱ्यांवर कारवाई करा – नसीम खान

Details
मोहिली व्हिलेजच्या रहिवाशांना बेघर करणाऱ्यांवर कारवाई करा – नसीम खान

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतील चांदिवली विधानसभा क्षेत्रात साकिनाका मोहिली व्हिलेज येथील 800 रहिवाशांना बेघर करू नका. त्यांना संरक्षण द्या अशी मागणी काँग्रेसचे आमदार मोहम्मद आरिफ नसिम खान यांनी मंगळवारी विधानसभेत केली. माहितीचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेऊन कागदपत्रांची पडताळणी करून मगच पुढील कारवाई होईल, असे आश्वामसन दिले.

मुंबईतील चांदिवली विधानसभा क्षेत्रात साकिनाका मोहिली व्हिलेज येथील 12 सोसायट्यांमध्ये 800 परिवार गेल्या 40 ते 50 वर्षांपासून राहतात. मूळ मालक 40 वर्षांपूर्वी ही जागा विकून गेला. ते डॉक्युमेंट रजीस्टर झाले नाही म्हणून आता त्या मालकाच्या नातेवाईकांनी या जागेचे अधिकार संचेती बिल्डरला दिले आहेत. ते अधिकारपत्र दिल्याने त्या नव्या विकासकाने महानगरपालिकेच्या अधिकार्यां शी हातमिळवणी करून जागा खाली करा नाहीतर तोडक कारवाई करण्यात येईल, अशा नोटीसा पाठवल्या आहेत. अशा बेकायदेशीर नोटीसा पाठवणार्याय आणि रहिवाशांना बेघर करू पाहाणार्या2 महापालिकेच्या अधिकार्यां वर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नसीम खान यांनी सभागृहात केली.
सभागृहात हा विषय येण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना सर्व माहिती दिली होती. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याची दखल घेत आश्वाेसन दिले. सर्व कागदपत्रांची पडताळणी करू आणि माहिती घेऊनच पुढील कारवाई करू असे फडणवीस यावेळी म्हणाले. त्यामुळे रहिवाशांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतील चांदिवली विधानसभा क्षेत्रात साकिनाका मोहिली व्हिलेज येथील 800 रहिवाशांना बेघर करू नका. त्यांना संरक्षण द्या अशी मागणी काँग्रेसचे आमदार मोहम्मद आरिफ नसिम खान यांनी मंगळवारी विधानसभेत केली. माहितीचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेऊन कागदपत्रांची पडताळणी करून मगच पुढील कारवाई होईल, असे आश्वामसन दिले.

मुंबईतील चांदिवली विधानसभा क्षेत्रात साकिनाका मोहिली व्हिलेज येथील 12 सोसायट्यांमध्ये 800 परिवार गेल्या 40 ते 50 वर्षांपासून राहतात. मूळ मालक 40 वर्षांपूर्वी ही जागा विकून गेला. ते डॉक्युमेंट रजीस्टर झाले नाही म्हणून आता त्या मालकाच्या नातेवाईकांनी या जागेचे अधिकार संचेती बिल्डरला दिले आहेत. ते अधिकारपत्र दिल्याने त्या नव्या विकासकाने महानगरपालिकेच्या अधिकार्यां शी हातमिळवणी करून जागा खाली करा नाहीतर तोडक कारवाई करण्यात येईल, अशा नोटीसा पाठवल्या आहेत. अशा बेकायदेशीर नोटीसा पाठवणार्याय आणि रहिवाशांना बेघर करू पाहाणार्या2 महापालिकेच्या अधिकार्यां वर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नसीम खान यांनी सभागृहात केली.
सभागृहात हा विषय येण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना सर्व माहिती दिली होती. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याची दखल घेत आश्वाेसन दिले. सर्व कागदपत्रांची पडताळणी करू आणि माहिती घेऊनच पुढील कारवाई करू असे फडणवीस यावेळी म्हणाले. त्यामुळे रहिवाशांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.”

Continue reading

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...

‘ब्रँड एकनाथ’ला मान्यता! मोदींनी दिले तब्बल 2 तास!!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर पोहोचले. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, 7-लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दोन तास चाललेल्या या...
Skip to content