HomeArchiveमोहिली व्हिलेजच्या रहिवाशांना...

मोहिली व्हिलेजच्या रहिवाशांना बेघर करणाऱ्यांवर कारवाई करा – नसीम खान

Details
मोहिली व्हिलेजच्या रहिवाशांना बेघर करणाऱ्यांवर कारवाई करा – नसीम खान

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतील चांदिवली विधानसभा क्षेत्रात साकिनाका मोहिली व्हिलेज येथील 800 रहिवाशांना बेघर करू नका. त्यांना संरक्षण द्या अशी मागणी काँग्रेसचे आमदार मोहम्मद आरिफ नसिम खान यांनी मंगळवारी विधानसभेत केली. माहितीचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेऊन कागदपत्रांची पडताळणी करून मगच पुढील कारवाई होईल, असे आश्वामसन दिले.

मुंबईतील चांदिवली विधानसभा क्षेत्रात साकिनाका मोहिली व्हिलेज येथील 12 सोसायट्यांमध्ये 800 परिवार गेल्या 40 ते 50 वर्षांपासून राहतात. मूळ मालक 40 वर्षांपूर्वी ही जागा विकून गेला. ते डॉक्युमेंट रजीस्टर झाले नाही म्हणून आता त्या मालकाच्या नातेवाईकांनी या जागेचे अधिकार संचेती बिल्डरला दिले आहेत. ते अधिकारपत्र दिल्याने त्या नव्या विकासकाने महानगरपालिकेच्या अधिकार्यां शी हातमिळवणी करून जागा खाली करा नाहीतर तोडक कारवाई करण्यात येईल, अशा नोटीसा पाठवल्या आहेत. अशा बेकायदेशीर नोटीसा पाठवणार्याय आणि रहिवाशांना बेघर करू पाहाणार्या2 महापालिकेच्या अधिकार्यां वर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नसीम खान यांनी सभागृहात केली.
सभागृहात हा विषय येण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना सर्व माहिती दिली होती. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याची दखल घेत आश्वाेसन दिले. सर्व कागदपत्रांची पडताळणी करू आणि माहिती घेऊनच पुढील कारवाई करू असे फडणवीस यावेळी म्हणाले. त्यामुळे रहिवाशांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतील चांदिवली विधानसभा क्षेत्रात साकिनाका मोहिली व्हिलेज येथील 800 रहिवाशांना बेघर करू नका. त्यांना संरक्षण द्या अशी मागणी काँग्रेसचे आमदार मोहम्मद आरिफ नसिम खान यांनी मंगळवारी विधानसभेत केली. माहितीचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेऊन कागदपत्रांची पडताळणी करून मगच पुढील कारवाई होईल, असे आश्वामसन दिले.

मुंबईतील चांदिवली विधानसभा क्षेत्रात साकिनाका मोहिली व्हिलेज येथील 12 सोसायट्यांमध्ये 800 परिवार गेल्या 40 ते 50 वर्षांपासून राहतात. मूळ मालक 40 वर्षांपूर्वी ही जागा विकून गेला. ते डॉक्युमेंट रजीस्टर झाले नाही म्हणून आता त्या मालकाच्या नातेवाईकांनी या जागेचे अधिकार संचेती बिल्डरला दिले आहेत. ते अधिकारपत्र दिल्याने त्या नव्या विकासकाने महानगरपालिकेच्या अधिकार्यां शी हातमिळवणी करून जागा खाली करा नाहीतर तोडक कारवाई करण्यात येईल, अशा नोटीसा पाठवल्या आहेत. अशा बेकायदेशीर नोटीसा पाठवणार्याय आणि रहिवाशांना बेघर करू पाहाणार्या2 महापालिकेच्या अधिकार्यां वर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नसीम खान यांनी सभागृहात केली.
सभागृहात हा विषय येण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना सर्व माहिती दिली होती. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याची दखल घेत आश्वाेसन दिले. सर्व कागदपत्रांची पडताळणी करू आणि माहिती घेऊनच पुढील कारवाई करू असे फडणवीस यावेळी म्हणाले. त्यामुळे रहिवाशांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.”

Continue reading

आहात तिथेच थांबा! इराणमधल्या भारतीयांना सरकारचे निर्देश!!

मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायल यांच्यात वाढता तणाव पाहता, केंद्र सरकारने इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची 'ट्रॅव्हल ॲडव्हायझरी' (मार्गदर्शक सूचना) जारी केली आहे. "पुढील ४८ तास तुम्ही जिथे आहात, तिथेच सुरक्षित राहा आणि अनावश्यक प्रवास टाळा," असे स्पष्ट आदेश...

उद्या पहाटेपासून मीरा-भाईंदर ते चेंबूरपर्यंतच्या प्रवाशांसाठी मेट्रो!

मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान करण्याच्या दिशेने मंगळवारी एक मोठे पाऊल पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मेट्रो मार्गिका ९ (टप्पा १) आणि मेट्रो मार्गिका...

ऊर्जा प्रकल्पांच्या संरक्षणासाठी इराणमध्ये ‘मानवी साखळी’!

पश्चिम आशियातील युद्ध आता एका निर्णायक आणि भयानक वळणावर येऊन ठेपले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या कठोर इशाऱ्यानंतर, इराणने आपल्या देशातील वीजनिर्मिती केंद्र आणि पायाभूत सुविधा वाचवण्यासाठी अनोखी शस्त्रास्त्रे वापरण्याऐवजी 'मानवी ढाल' (ह्यूमन शिल्ड) तयार करण्याचा...
Skip to content