Details
मुंबईतील भाजपा आमदार व नगरसेवक देणार एक महिन्याचा पगार
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील सर्व आमदार आणि नगरसेवक मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपला एक महिन्याचा पगार देणार आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. भाजपचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपापल्या परीने सहाय्यता करणार आहेत. लोढा यांनी मुंबईतील जनतेला पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपापल्या क्षमतेनुसार मदत करण्याचे आवाहनही केले आहे.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूर आल्यामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत. सामान्यापेक्षा १२ पट जास्त पाऊस पडल्याने शेकडो गावे पूर्णपणे पाण्यात बुडाली आहेत. शेतीचे नुकसान होऊन हजारो घरेही पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. लोकांकडे खाण्यासाठी अन्न नाही व परिधान करण्यासाठी कपडेही नाही. मुंबईतील लोकांचा इतिहास राहिला आहे की, देशात कुठेही आपत्ती आली असल्यास येथील लोक मदतीसाठी नेहमी पुढाकार घेतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात अडीच लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे, असेही लोढा यांनी सांगितले.”
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील सर्व आमदार आणि नगरसेवक मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपला एक महिन्याचा पगार देणार आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. भाजपचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपापल्या परीने सहाय्यता करणार आहेत. लोढा यांनी मुंबईतील जनतेला पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपापल्या क्षमतेनुसार मदत करण्याचे आवाहनही केले आहे.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूर आल्यामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत. सामान्यापेक्षा १२ पट जास्त पाऊस पडल्याने शेकडो गावे पूर्णपणे पाण्यात बुडाली आहेत. शेतीचे नुकसान होऊन हजारो घरेही पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. लोकांकडे खाण्यासाठी अन्न नाही व परिधान करण्यासाठी कपडेही नाही. मुंबईतील लोकांचा इतिहास राहिला आहे की, देशात कुठेही आपत्ती आली असल्यास येथील लोक मदतीसाठी नेहमी पुढाकार घेतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात अडीच लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे, असेही लोढा यांनी सांगितले.”

