HomeArchiveमुंबईतील भाजपा आमदार...

मुंबईतील भाजपा आमदार व नगरसेवक देणार एक महिन्याचा पगार

Details
मुंबईतील भाजपा आमदार व नगरसेवक देणार एक महिन्याचा पगार

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील सर्व आमदार आणि नगरसेवक मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपला एक महिन्याचा पगार देणार आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. भाजपचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपापल्या परीने सहाय्यता करणार आहेत. लोढा यांनी मुंबईतील जनतेला पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपापल्या क्षमतेनुसार मदत करण्याचे आवाहनही केले आहे.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूर आल्यामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत. सामान्यापेक्षा १२ पट जास्त पाऊस पडल्याने शेकडो गावे पूर्णपणे पाण्यात बुडाली आहेत. शेतीचे नुकसान होऊन हजारो घरेही पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. लोकांकडे खाण्यासाठी अन्न नाही व परिधान करण्यासाठी कपडेही नाही. मुंबईतील लोकांचा इतिहास राहिला आहे की, देशात कुठेही आपत्ती आली असल्यास येथील लोक मदतीसाठी नेहमी पुढाकार घेतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात अडीच लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे, असेही लोढा यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील सर्व आमदार आणि नगरसेवक मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपला एक महिन्याचा पगार देणार आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. भाजपचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपापल्या परीने सहाय्यता करणार आहेत. लोढा यांनी मुंबईतील जनतेला पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपापल्या क्षमतेनुसार मदत करण्याचे आवाहनही केले आहे.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूर आल्यामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत. सामान्यापेक्षा १२ पट जास्त पाऊस पडल्याने शेकडो गावे पूर्णपणे पाण्यात बुडाली आहेत. शेतीचे नुकसान होऊन हजारो घरेही पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. लोकांकडे खाण्यासाठी अन्न नाही व परिधान करण्यासाठी कपडेही नाही. मुंबईतील लोकांचा इतिहास राहिला आहे की, देशात कुठेही आपत्ती आली असल्यास येथील लोक मदतीसाठी नेहमी पुढाकार घेतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात अडीच लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे, असेही लोढा यांनी सांगितले.”

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content