HomeArchiveमुंबईच्या नॅशनल पार्कमधल्या...

मुंबईच्या नॅशनल पार्कमधल्या २७ हजार कुटुंबांना म्हाडाची घरे! सभापती मधू चव्हाण यांची घोषणा

Details
मुंबईच्या नॅशनल पार्कमधल्या २७ हजार कुटुंबांना म्हाडाची घरे! सभापती मधू चव्हाण यांची घोषणा

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

मुंबईतल्या बोरिवली येथील नॅशनल पार्कमधील दोन हजार आदिवासी व २४ हजार ९५९ पात्र झोपडी धारकांच्या पुनर्वसनाचा आराखडा म्हाडाने तयार करून म्हाडाच्या मुंबई मंडळाने त्यासाठी निविदा जारी केल्या आहेत, अशी माहिती मुंबई म्हाडाचे सभापती मधू चव्हाण यांनी बुधवारी दिली. या पुनर्वसनाचे बांधकाम विकासकांना टीडीआर देण्याच्या अटीवर देण्यात आले  असल्याने म्हाडाला यासाठी निधी उपलब्ध करावा लागणार नाही. यामुळे  नॅशनल पार्कमधील आदिवासी आणि तेथील झोपडी धारकांचा अनेकवर्षे रखडलेला प्रश्न आता मार्गी लागला आहे. सुमारे ९० एकर जागेवर आदिवासी आणि झोपडी धारकांसाठी घरे बांधली जाणार आहेत, असे ते म्हणाले.

 

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नॅशनल पार्कमधील आदिवासी आणि  झोपडी धारकांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. त्याप्रमाणे पहिल्या टप्प्यात यापूर्वी आदिवासी व झोपडी धारकांचे पुनर्वसन पूर्ण करण्यात आले असून आता दुसऱ्या टप्प्यात नॅशनल पार्कमधील दोन हजार आदिवासी आणि २४ हजार ९५९ पात्र झोपडी धारकांचे पुनर्वसन करण्यात येईल. या पुनर्वसनाचे आदेश राज्य सरकारने दिल्यानंतर म्हाडाच्या मुंबई मंडळाने येथील पुनर्विकासाच्या कामाला सुरूवात केली. नॅशनल पार्कमधील आदिवासींचे सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर आता तेथील घरांच्या बांधकामासाठी म्हाडाने निविदा मागविण्यास सुरूवात केली आहे, असे मधू चव्हाण म्हणाले.

या निविदानुसार आदिवासींना ३०० चौरस फुटांचे बांधकाम असलेले एक मजली घर बांधून देण्यात येणार आहे. ४३ एकर जागेवर हीघरे बांधली जाणार आहेत तर झोपडी धारकांचे पुनर्वसन एसआरए योजनेंतर्गत केले जाणारआहे. त्यासाठी ४७ एकर जमिनीवर त्यांच्यासाठी बहुमजली इमारती बांधल्या जातील.आदिवासी आणि झोपडीधारकांसाठी एकूण ९० एकर जागेवर पुनर्वसनाचे काम होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.”
 
“मुंबईतल्या बोरिवली येथील नॅशनल पार्कमधील दोन हजार आदिवासी व २४ हजार ९५९ पात्र झोपडी धारकांच्या पुनर्वसनाचा आराखडा म्हाडाने तयार करून म्हाडाच्या मुंबई मंडळाने त्यासाठी निविदा जारी केल्या आहेत, अशी माहिती मुंबई म्हाडाचे सभापती मधू चव्हाण यांनी बुधवारी दिली. या पुनर्वसनाचे बांधकाम विकासकांना टीडीआर देण्याच्या अटीवर देण्यात आले  असल्याने म्हाडाला यासाठी निधी उपलब्ध करावा लागणार नाही. यामुळे  नॅशनल पार्कमधील आदिवासी आणि तेथील झोपडी धारकांचा अनेकवर्षे रखडलेला प्रश्न आता मार्गी लागला आहे. सुमारे ९० एकर जागेवर आदिवासी आणि झोपडी धारकांसाठी घरे बांधली जाणार आहेत, असे ते म्हणाले.

 

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नॅशनल पार्कमधील आदिवासी आणि  झोपडी धारकांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. त्याप्रमाणे पहिल्या टप्प्यात यापूर्वी आदिवासी व झोपडी धारकांचे पुनर्वसन पूर्ण करण्यात आले असून आता दुसऱ्या टप्प्यात नॅशनल पार्कमधील दोन हजार आदिवासी आणि २४ हजार ९५९ पात्र झोपडी धारकांचे पुनर्वसन करण्यात येईल. या पुनर्वसनाचे आदेश राज्य सरकारने दिल्यानंतर म्हाडाच्या मुंबई मंडळाने येथील पुनर्विकासाच्या कामाला सुरूवात केली. नॅशनल पार्कमधील आदिवासींचे सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर आता तेथील घरांच्या बांधकामासाठी म्हाडाने निविदा मागविण्यास सुरूवात केली आहे, असे मधू चव्हाण म्हणाले.

या निविदानुसार आदिवासींना ३०० चौरस फुटांचे बांधकाम असलेले एक मजली घर बांधून देण्यात येणार आहे. ४३ एकर जागेवर हीघरे बांधली जाणार आहेत तर झोपडी धारकांचे पुनर्वसन एसआरए योजनेंतर्गत केले जाणारआहे. त्यासाठी ४७ एकर जमिनीवर त्यांच्यासाठी बहुमजली इमारती बांधल्या जातील.आदिवासी आणि झोपडीधारकांसाठी एकूण ९० एकर जागेवर पुनर्वसनाचे काम होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.”
 
 

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content