HomeArchiveमासेमारी बंदीच्या काळातील...

मासेमारी बंदीच्या काळातील नुकसानभरपाई द्या – रमेश पाटील

Details
मासेमारी बंदीच्या काळातील नुकसानभरपाई द्या – रमेश पाटील

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
1 जून ते 31 जुलै हा मासेमारी बंदीचा काळ आहे. या काळात समुद्र खवळलेला असून हा मत्स्य प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे मत्स्यव्यवसाय खात्याने या काळात मासेमारीवर कायद्याने बंदी घातली आहे. या दोन महिन्यांच्या काळात मासेमारी पूर्णपणे बंद असल्याने कोळी समाजावर उपासमारीची पाळी येते. त्यामुळे कोळी समाजाला राज्यशासनाने उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत करून नुकसानभरपाई द्यावी अशी आग्रही मागणी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजपाचे आमदार रमेश पाटील यांनी केली आहे.

 

आपण हा महत्वाचा मुद्दा विधान परिषदेतदेखील मांडला अशी माहिती त्यांनी दिली. मासेमारी बंदीच्या दोन महिन्यांच्या काळात खोल समुद्रात मासेमारी करणारे कोळी बांधव, खलाशी व मासे विक्री करणाऱ्या कोळी महिला आणि या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हाताला काम नसल्याने आर्थिक ते विवंचनेत असतात. घरखर्च चालण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. मासेमारी करणाऱ्या गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांतील कोळी बांधवांना मासेमारी बंदीच्या या काळात गेली अनेक वर्षे आर्थिक मदत केली जाते. त्यामुळे राज्य सरकारनेही मासेमारी बंदीच्या काळात आर्थिक नुकसानभरपाई देण्याची तरतूद करावी अशी मागणी रमेश पाटील यांनी केली आहे. राज्यात मासेमारी करणाऱ्या मत्स्य व्यवसायिकांचे सर्वेक्षण करून त्यांची नोंद करावी अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
1 जून ते 31 जुलै हा मासेमारी बंदीचा काळ आहे. या काळात समुद्र खवळलेला असून हा मत्स्य प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे मत्स्यव्यवसाय खात्याने या काळात मासेमारीवर कायद्याने बंदी घातली आहे. या दोन महिन्यांच्या काळात मासेमारी पूर्णपणे बंद असल्याने कोळी समाजावर उपासमारीची पाळी येते. त्यामुळे कोळी समाजाला राज्यशासनाने उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत करून नुकसानभरपाई द्यावी अशी आग्रही मागणी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजपाचे आमदार रमेश पाटील यांनी केली आहे.

 

आपण हा महत्वाचा मुद्दा विधान परिषदेतदेखील मांडला अशी माहिती त्यांनी दिली. मासेमारी बंदीच्या दोन महिन्यांच्या काळात खोल समुद्रात मासेमारी करणारे कोळी बांधव, खलाशी व मासे विक्री करणाऱ्या कोळी महिला आणि या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हाताला काम नसल्याने आर्थिक ते विवंचनेत असतात. घरखर्च चालण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. मासेमारी करणाऱ्या गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांतील कोळी बांधवांना मासेमारी बंदीच्या या काळात गेली अनेक वर्षे आर्थिक मदत केली जाते. त्यामुळे राज्य सरकारनेही मासेमारी बंदीच्या काळात आर्थिक नुकसानभरपाई देण्याची तरतूद करावी अशी मागणी रमेश पाटील यांनी केली आहे. राज्यात मासेमारी करणाऱ्या मत्स्य व्यवसायिकांचे सर्वेक्षण करून त्यांची नोंद करावी अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.”
 

Continue reading

बिहारमध्ये महागठबंधनचे आमदारच लापता! नितीश कुमार राज्यसभेत!!

देशाच्या दहा राज्यांमधील 37 राज्यसभा जागांसाठी सोमवारी मतदान झाले. यापैकी 26 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. खरी चुरस बिहारच्या 5 जागा, ओडिशातील 4 जागा आणि हरियाणा (2 जागा) या तीन राज्यांपुरतीच उरली. या 2026 राज्यसभा निवडणुकीत 'एनडीए'चा देशभर...

ओपिनियन पोल: ममतांचा चौथा विजय निश्चित; तामिळनाडूत स्टालिनना धक्का!

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आणि त्याचदिवशी मॅट्रिज-आयएएनएस या संस्थेने या पाचही राज्यांसाठी आपला बहुप्रतिक्षित ओपिनियन पोल जाहीर केला. त्यानुसार, ममतांचा चौथा विजय जवळपास निश्चित मानला जात...

मंत्रालयातल्या दुसऱ्या पंतांचे (पंतबाळेकुंद्री) निधन, आज अन्त्यसंस्कार

महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयाच्या नगरविकास विभागातून सहसचिव म्हणून निवृत्त झालेले नामवंत अधिकारी गो. श्री. पंतबाळेकुंद्री यांचे काल, सोमवारी ठाण्यात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, पुत्र अभिजीत आणि विवाहित कन्या तसेच नातवंडे असा परिवार आहे. पंत यांच्या पार्थिवावर...
Skip to content