HomeArchiveमासेमारी बंदीच्या काळातील...

मासेमारी बंदीच्या काळातील नुकसानभरपाई द्या – रमेश पाटील

Details
मासेमारी बंदीच्या काळातील नुकसानभरपाई द्या – रमेश पाटील

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
1 जून ते 31 जुलै हा मासेमारी बंदीचा काळ आहे. या काळात समुद्र खवळलेला असून हा मत्स्य प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे मत्स्यव्यवसाय खात्याने या काळात मासेमारीवर कायद्याने बंदी घातली आहे. या दोन महिन्यांच्या काळात मासेमारी पूर्णपणे बंद असल्याने कोळी समाजावर उपासमारीची पाळी येते. त्यामुळे कोळी समाजाला राज्यशासनाने उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत करून नुकसानभरपाई द्यावी अशी आग्रही मागणी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजपाचे आमदार रमेश पाटील यांनी केली आहे.

 

आपण हा महत्वाचा मुद्दा विधान परिषदेतदेखील मांडला अशी माहिती त्यांनी दिली. मासेमारी बंदीच्या दोन महिन्यांच्या काळात खोल समुद्रात मासेमारी करणारे कोळी बांधव, खलाशी व मासे विक्री करणाऱ्या कोळी महिला आणि या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हाताला काम नसल्याने आर्थिक ते विवंचनेत असतात. घरखर्च चालण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. मासेमारी करणाऱ्या गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांतील कोळी बांधवांना मासेमारी बंदीच्या या काळात गेली अनेक वर्षे आर्थिक मदत केली जाते. त्यामुळे राज्य सरकारनेही मासेमारी बंदीच्या काळात आर्थिक नुकसानभरपाई देण्याची तरतूद करावी अशी मागणी रमेश पाटील यांनी केली आहे. राज्यात मासेमारी करणाऱ्या मत्स्य व्यवसायिकांचे सर्वेक्षण करून त्यांची नोंद करावी अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
1 जून ते 31 जुलै हा मासेमारी बंदीचा काळ आहे. या काळात समुद्र खवळलेला असून हा मत्स्य प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे मत्स्यव्यवसाय खात्याने या काळात मासेमारीवर कायद्याने बंदी घातली आहे. या दोन महिन्यांच्या काळात मासेमारी पूर्णपणे बंद असल्याने कोळी समाजावर उपासमारीची पाळी येते. त्यामुळे कोळी समाजाला राज्यशासनाने उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत करून नुकसानभरपाई द्यावी अशी आग्रही मागणी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजपाचे आमदार रमेश पाटील यांनी केली आहे.

 

आपण हा महत्वाचा मुद्दा विधान परिषदेतदेखील मांडला अशी माहिती त्यांनी दिली. मासेमारी बंदीच्या दोन महिन्यांच्या काळात खोल समुद्रात मासेमारी करणारे कोळी बांधव, खलाशी व मासे विक्री करणाऱ्या कोळी महिला आणि या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हाताला काम नसल्याने आर्थिक ते विवंचनेत असतात. घरखर्च चालण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. मासेमारी करणाऱ्या गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांतील कोळी बांधवांना मासेमारी बंदीच्या या काळात गेली अनेक वर्षे आर्थिक मदत केली जाते. त्यामुळे राज्य सरकारनेही मासेमारी बंदीच्या काळात आर्थिक नुकसानभरपाई देण्याची तरतूद करावी अशी मागणी रमेश पाटील यांनी केली आहे. राज्यात मासेमारी करणाऱ्या मत्स्य व्यवसायिकांचे सर्वेक्षण करून त्यांची नोंद करावी अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.”
 

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content