HomeArchiveमाणिक मुंडेलिखित `मीरा...

माणिक मुंडेलिखित `मीरा – भक्ती का अमिरस’ आणि ‘हंस का दंश’चे प्रकाशन

Details
माणिक मुंडेलिखित `मीरा – भक्ती का अमिरस’ आणि ‘हंस का दंश’चे प्रकाशन

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

मीराचे समर्पण हे विश्वातील विरळा उदाहरण – संत रमेशभाई ओझा यांचे विवेचन
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मीरासारखे समर्पण कुणालाच शक्य नाही. तिने कन्हैय्याचा ध्यास सोडावा, यासाठी अनेक अघोरी प्रयत्न झाले. पण तिने कुणालाच दाद दिली नाही. इतकी ती समर्पित होती. पूर्ण विश्वात तिच्या भक्तीचा महिमा अगाध आहे, असे निरूपण संत रमेशभाई ओझा यांनी माणिक मुंडेलिखित ‘मीरा – भक्ती का अमिरस’ या ग्रंथाचे प्रकाशन करताना केले.

कालजयी प्रकाशनतर्फे मुंबईच्या मुलुंड येथे ट्रान्सकॉन स्कायसिटी येथे झालेल्या प्रकाशन सोहळ्यात ‘मीरा – भक्ती का अमिरस’ आणि ‘आणि हंस का दंश’ या ग्रंथांचे प्रकाशन महामंडलेश्वर श्री स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी आणि संत श्री रमेशभाई ओझा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

हृदयाची स्पंदने ओळखली तर शब्दाची गरज नाही. भावतरंग पकडले आणि तादात्म झालो तर त्यापुढे शब्दही व्यर्थ ठरतात. बुद्ध आणि मीरा यांच्यात आपल्याला विरोधाभास दिसतो. कारण आपली दृष्टी विभाजित झालेली असते, असेही विवेचन यावेळी माणिक मुंडे यांनी केले.

 

मीराच्या जीवनात एक दर्द आहे. तिच्यात अनंताचा महासागर आहे. ब्रम्हस्वरूप मीरा त्यात डुंबली. तिच्या जीवन चरित्रातून प्रेमाची धारा वाहिली. हे सारे मीरा – भक्ती का अमिरस, हा ग्रंथ वाचताना पानोपानी जाणवते, असे महामंडेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी यावेळी म्हणाले. ‘हंस का दंश’ या ग्रंथाबाबत ते म्हणाले, हंसांचा दंश झाल्याचे कधी कुणाला दिसले नाही. दंश झाले त्यांनी कधी आपल्या वेदना प्रकट केल्या नाहीत. दंश झाल्यानंतरही आनंदरस देतात ते खरे संत.

यावेळी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आशिषकुमार चौहान म्हणाले की, संतपरंपरेने काय पाहिलं? त्यांना स्वत:चं भान नव्हतं. अनंतात ते लीन होतात. मीराबाई त्यातील एक. अनंत पाहण्याची खूप जणांची इच्छा असते. पण सर्वांनाच ते पाहण्यास मिळत नाही.

 

यावेळी आहारवेदाचे हरीश शेट्टी म्हणाले की, आहारवेदाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या अभियानात शरीरासाठी आणि ज्ञानासाठी असे दोन उपक्रम चालवले जातात. आपण निसर्गासोबत राहिलो तर निसर्ग आपणास सांभाळेल.”
 
“मीराचे समर्पण हे विश्वातील विरळा उदाहरण – संत रमेशभाई ओझा यांचे विवेचन
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मीरासारखे समर्पण कुणालाच शक्य नाही. तिने कन्हैय्याचा ध्यास सोडावा, यासाठी अनेक अघोरी प्रयत्न झाले. पण तिने कुणालाच दाद दिली नाही. इतकी ती समर्पित होती. पूर्ण विश्वात तिच्या भक्तीचा महिमा अगाध आहे, असे निरूपण संत रमेशभाई ओझा यांनी माणिक मुंडेलिखित ‘मीरा – भक्ती का अमिरस’ या ग्रंथाचे प्रकाशन करताना केले.

कालजयी प्रकाशनतर्फे मुंबईच्या मुलुंड येथे ट्रान्सकॉन स्कायसिटी येथे झालेल्या प्रकाशन सोहळ्यात ‘मीरा – भक्ती का अमिरस’ आणि ‘आणि हंस का दंश’ या ग्रंथांचे प्रकाशन महामंडलेश्वर श्री स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी आणि संत श्री रमेशभाई ओझा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

हृदयाची स्पंदने ओळखली तर शब्दाची गरज नाही. भावतरंग पकडले आणि तादात्म झालो तर त्यापुढे शब्दही व्यर्थ ठरतात. बुद्ध आणि मीरा यांच्यात आपल्याला विरोधाभास दिसतो. कारण आपली दृष्टी विभाजित झालेली असते, असेही विवेचन यावेळी माणिक मुंडे यांनी केले.

 

मीराच्या जीवनात एक दर्द आहे. तिच्यात अनंताचा महासागर आहे. ब्रम्हस्वरूप मीरा त्यात डुंबली. तिच्या जीवन चरित्रातून प्रेमाची धारा वाहिली. हे सारे मीरा – भक्ती का अमिरस, हा ग्रंथ वाचताना पानोपानी जाणवते, असे महामंडेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी यावेळी म्हणाले. ‘हंस का दंश’ या ग्रंथाबाबत ते म्हणाले, हंसांचा दंश झाल्याचे कधी कुणाला दिसले नाही. दंश झाले त्यांनी कधी आपल्या वेदना प्रकट केल्या नाहीत. दंश झाल्यानंतरही आनंदरस देतात ते खरे संत.

यावेळी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आशिषकुमार चौहान म्हणाले की, संतपरंपरेने काय पाहिलं? त्यांना स्वत:चं भान नव्हतं. अनंतात ते लीन होतात. मीराबाई त्यातील एक. अनंत पाहण्याची खूप जणांची इच्छा असते. पण सर्वांनाच ते पाहण्यास मिळत नाही.

 

यावेळी आहारवेदाचे हरीश शेट्टी म्हणाले की, आहारवेदाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या अभियानात शरीरासाठी आणि ज्ञानासाठी असे दोन उपक्रम चालवले जातात. आपण निसर्गासोबत राहिलो तर निसर्ग आपणास सांभाळेल.”
 
 

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content