HomeArchiveमागाठाण्यातील 2000 ज्येष्ठ...

मागाठाण्यातील 2000 ज्येष्ठ नागरिक चालले काशी विश्वनाथ यात्रेला!

Details
मागाठाण्यातील 2000 ज्येष्ठ नागरिक चालले काशी विश्वनाथ यात्रेला!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
आपल्या मुलाने आयुष्यात एकदातरी काशीला घेऊन जावे अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. हा योग मागाठाणे येथील 2000 ज्येष्ठ नागरिकांना मिळणार असल्याने त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य खुलले आहे. चलो काशी यात्रेला असा पुकार करत मागाठाणे येथील 2000 ज्येष्ठ नागरिक आज खास रेल्वेने काशी विश्वनाथ यात्रेला रवाना झाले.

मागाठाणे विधानसभेचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी त्यांच्या मतदारसंघातील 2000 ज्येष्ठ नागरिकांना काशी विश्वानाथ यात्रेला घेऊन जाण्याचा संकल्प केला आहे. रेल्वेने बोरिवली ते वाराणसी असा 36 तासांचा प्रवास केल्यावर येत्या रविवारी पहाटे हे ज्येष्ठ नागरिक वाराणसी स्टेशनला पोहोचतील. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ योगी तेथील पोलीस आयुक्तांनी येथील 2000 ज्येष्ठ नागरिकांची खास दर्शनाची व्यवस्था केली आहे असे आमदार सुर्वे यांनी सांगितले.

यात्रेदरम्यान खास गंगा स्नान, संध्याकाळी गंगा आरती असा भरगच्च कार्यक्रम आहे. प्रवासादरम्यान या ज्येष्ठ नागरिकांची नाष्टा, चहा तसेच जेवणाची खास व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृतीची काळजी घेणारे 7 डॉकटर्स तसेच सुमारे 100 शिवसैनिक व महिला प्रत्येक डब्यात तैनात राहून त्यांची बडदास्त ठेवतील असे आमदार सुर्वे यांनी सांगितले. त्याचदिवशी रात्री 11 वाजता हे ज्येष्ठ नागरिक परतीच्या प्रवासाला मुंबईकडे रवाना होऊन मंगळवरी 36 तासांच्या रेल्वे प्रवासानंतर दुपारी मुंबईला पोहचतील अशी माहिती त्यांनी दिली.

माझ्या आईने मला एकदा तरी काशी यात्रेला घेऊन जा असे सांगितले. आईची इच्छा मी पूर्ण केली. माझ्या मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकदेखील आई वडिलांप्रमाणे असून कलीयुगातील या श्रावण बाळाने येथील 2000 ज्येष्ठ नागरिकांची काशी विश्वनाथ दर्शनाची इच्छा पूर्ण केली. गेले एक महिना आम्ही या यात्रेची तयारी करत होतो. यापूर्वी येथील जेष्ठ नागरिकांना नाशिक त्र्यंम्बकेश्वर, शिर्डी, पालघरची महालक्ष्मी यांची दर्शनयात्रा आपण आयोजित केली होती असेही सुर्वे यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
आपल्या मुलाने आयुष्यात एकदातरी काशीला घेऊन जावे अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. हा योग मागाठाणे येथील 2000 ज्येष्ठ नागरिकांना मिळणार असल्याने त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य खुलले आहे. चलो काशी यात्रेला असा पुकार करत मागाठाणे येथील 2000 ज्येष्ठ नागरिक आज खास रेल्वेने काशी विश्वनाथ यात्रेला रवाना झाले.

मागाठाणे विधानसभेचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी त्यांच्या मतदारसंघातील 2000 ज्येष्ठ नागरिकांना काशी विश्वानाथ यात्रेला घेऊन जाण्याचा संकल्प केला आहे. रेल्वेने बोरिवली ते वाराणसी असा 36 तासांचा प्रवास केल्यावर येत्या रविवारी पहाटे हे ज्येष्ठ नागरिक वाराणसी स्टेशनला पोहोचतील. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ योगी तेथील पोलीस आयुक्तांनी येथील 2000 ज्येष्ठ नागरिकांची खास दर्शनाची व्यवस्था केली आहे असे आमदार सुर्वे यांनी सांगितले.

यात्रेदरम्यान खास गंगा स्नान, संध्याकाळी गंगा आरती असा भरगच्च कार्यक्रम आहे. प्रवासादरम्यान या ज्येष्ठ नागरिकांची नाष्टा, चहा तसेच जेवणाची खास व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृतीची काळजी घेणारे 7 डॉकटर्स तसेच सुमारे 100 शिवसैनिक व महिला प्रत्येक डब्यात तैनात राहून त्यांची बडदास्त ठेवतील असे आमदार सुर्वे यांनी सांगितले. त्याचदिवशी रात्री 11 वाजता हे ज्येष्ठ नागरिक परतीच्या प्रवासाला मुंबईकडे रवाना होऊन मंगळवरी 36 तासांच्या रेल्वे प्रवासानंतर दुपारी मुंबईला पोहचतील अशी माहिती त्यांनी दिली.

माझ्या आईने मला एकदा तरी काशी यात्रेला घेऊन जा असे सांगितले. आईची इच्छा मी पूर्ण केली. माझ्या मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकदेखील आई वडिलांप्रमाणे असून कलीयुगातील या श्रावण बाळाने येथील 2000 ज्येष्ठ नागरिकांची काशी विश्वनाथ दर्शनाची इच्छा पूर्ण केली. गेले एक महिना आम्ही या यात्रेची तयारी करत होतो. यापूर्वी येथील जेष्ठ नागरिकांना नाशिक त्र्यंम्बकेश्वर, शिर्डी, पालघरची महालक्ष्मी यांची दर्शनयात्रा आपण आयोजित केली होती असेही सुर्वे यांनी सांगितले.”

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content