HomeArchiveमागाठाण्यातील 2000 ज्येष्ठ...

मागाठाण्यातील 2000 ज्येष्ठ नागरिक चालले काशी विश्वनाथ यात्रेला!

Details
मागाठाण्यातील 2000 ज्येष्ठ नागरिक चालले काशी विश्वनाथ यात्रेला!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
आपल्या मुलाने आयुष्यात एकदातरी काशीला घेऊन जावे अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. हा योग मागाठाणे येथील 2000 ज्येष्ठ नागरिकांना मिळणार असल्याने त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य खुलले आहे. चलो काशी यात्रेला असा पुकार करत मागाठाणे येथील 2000 ज्येष्ठ नागरिक आज खास रेल्वेने काशी विश्वनाथ यात्रेला रवाना झाले.

मागाठाणे विधानसभेचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी त्यांच्या मतदारसंघातील 2000 ज्येष्ठ नागरिकांना काशी विश्वानाथ यात्रेला घेऊन जाण्याचा संकल्प केला आहे. रेल्वेने बोरिवली ते वाराणसी असा 36 तासांचा प्रवास केल्यावर येत्या रविवारी पहाटे हे ज्येष्ठ नागरिक वाराणसी स्टेशनला पोहोचतील. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ योगी तेथील पोलीस आयुक्तांनी येथील 2000 ज्येष्ठ नागरिकांची खास दर्शनाची व्यवस्था केली आहे असे आमदार सुर्वे यांनी सांगितले.

यात्रेदरम्यान खास गंगा स्नान, संध्याकाळी गंगा आरती असा भरगच्च कार्यक्रम आहे. प्रवासादरम्यान या ज्येष्ठ नागरिकांची नाष्टा, चहा तसेच जेवणाची खास व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृतीची काळजी घेणारे 7 डॉकटर्स तसेच सुमारे 100 शिवसैनिक व महिला प्रत्येक डब्यात तैनात राहून त्यांची बडदास्त ठेवतील असे आमदार सुर्वे यांनी सांगितले. त्याचदिवशी रात्री 11 वाजता हे ज्येष्ठ नागरिक परतीच्या प्रवासाला मुंबईकडे रवाना होऊन मंगळवरी 36 तासांच्या रेल्वे प्रवासानंतर दुपारी मुंबईला पोहचतील अशी माहिती त्यांनी दिली.

माझ्या आईने मला एकदा तरी काशी यात्रेला घेऊन जा असे सांगितले. आईची इच्छा मी पूर्ण केली. माझ्या मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकदेखील आई वडिलांप्रमाणे असून कलीयुगातील या श्रावण बाळाने येथील 2000 ज्येष्ठ नागरिकांची काशी विश्वनाथ दर्शनाची इच्छा पूर्ण केली. गेले एक महिना आम्ही या यात्रेची तयारी करत होतो. यापूर्वी येथील जेष्ठ नागरिकांना नाशिक त्र्यंम्बकेश्वर, शिर्डी, पालघरची महालक्ष्मी यांची दर्शनयात्रा आपण आयोजित केली होती असेही सुर्वे यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
आपल्या मुलाने आयुष्यात एकदातरी काशीला घेऊन जावे अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. हा योग मागाठाणे येथील 2000 ज्येष्ठ नागरिकांना मिळणार असल्याने त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य खुलले आहे. चलो काशी यात्रेला असा पुकार करत मागाठाणे येथील 2000 ज्येष्ठ नागरिक आज खास रेल्वेने काशी विश्वनाथ यात्रेला रवाना झाले.

मागाठाणे विधानसभेचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी त्यांच्या मतदारसंघातील 2000 ज्येष्ठ नागरिकांना काशी विश्वानाथ यात्रेला घेऊन जाण्याचा संकल्प केला आहे. रेल्वेने बोरिवली ते वाराणसी असा 36 तासांचा प्रवास केल्यावर येत्या रविवारी पहाटे हे ज्येष्ठ नागरिक वाराणसी स्टेशनला पोहोचतील. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ योगी तेथील पोलीस आयुक्तांनी येथील 2000 ज्येष्ठ नागरिकांची खास दर्शनाची व्यवस्था केली आहे असे आमदार सुर्वे यांनी सांगितले.

यात्रेदरम्यान खास गंगा स्नान, संध्याकाळी गंगा आरती असा भरगच्च कार्यक्रम आहे. प्रवासादरम्यान या ज्येष्ठ नागरिकांची नाष्टा, चहा तसेच जेवणाची खास व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृतीची काळजी घेणारे 7 डॉकटर्स तसेच सुमारे 100 शिवसैनिक व महिला प्रत्येक डब्यात तैनात राहून त्यांची बडदास्त ठेवतील असे आमदार सुर्वे यांनी सांगितले. त्याचदिवशी रात्री 11 वाजता हे ज्येष्ठ नागरिक परतीच्या प्रवासाला मुंबईकडे रवाना होऊन मंगळवरी 36 तासांच्या रेल्वे प्रवासानंतर दुपारी मुंबईला पोहचतील अशी माहिती त्यांनी दिली.

माझ्या आईने मला एकदा तरी काशी यात्रेला घेऊन जा असे सांगितले. आईची इच्छा मी पूर्ण केली. माझ्या मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकदेखील आई वडिलांप्रमाणे असून कलीयुगातील या श्रावण बाळाने येथील 2000 ज्येष्ठ नागरिकांची काशी विश्वनाथ दर्शनाची इच्छा पूर्ण केली. गेले एक महिना आम्ही या यात्रेची तयारी करत होतो. यापूर्वी येथील जेष्ठ नागरिकांना नाशिक त्र्यंम्बकेश्वर, शिर्डी, पालघरची महालक्ष्मी यांची दर्शनयात्रा आपण आयोजित केली होती असेही सुर्वे यांनी सांगितले.”

Continue reading

बिहारमध्ये महागठबंधनचे आमदारच लापता! नितीश कुमार राज्यसभेत!!

देशाच्या दहा राज्यांमधील 37 राज्यसभा जागांसाठी सोमवारी मतदान झाले. यापैकी 26 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. खरी चुरस बिहारच्या 5 जागा, ओडिशातील 4 जागा आणि हरियाणा (2 जागा) या तीन राज्यांपुरतीच उरली. या 2026 राज्यसभा निवडणुकीत 'एनडीए'चा देशभर...

ओपिनियन पोल: ममतांचा चौथा विजय निश्चित; तामिळनाडूत स्टालिनना धक्का!

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आणि त्याचदिवशी मॅट्रिज-आयएएनएस या संस्थेने या पाचही राज्यांसाठी आपला बहुप्रतिक्षित ओपिनियन पोल जाहीर केला. त्यानुसार, ममतांचा चौथा विजय जवळपास निश्चित मानला जात...

मंत्रालयातल्या दुसऱ्या पंतांचे (पंतबाळेकुंद्री) निधन, आज अन्त्यसंस्कार

महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयाच्या नगरविकास विभागातून सहसचिव म्हणून निवृत्त झालेले नामवंत अधिकारी गो. श्री. पंतबाळेकुंद्री यांचे काल, सोमवारी ठाण्यात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, पुत्र अभिजीत आणि विवाहित कन्या तसेच नातवंडे असा परिवार आहे. पंत यांच्या पार्थिवावर...
Skip to content