HomeArchiveमागाठाण्यातील 2000 ज्येष्ठ...

मागाठाण्यातील 2000 ज्येष्ठ नागरिक चालले काशी विश्वनाथ यात्रेला!

Details
मागाठाण्यातील 2000 ज्येष्ठ नागरिक चालले काशी विश्वनाथ यात्रेला!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
आपल्या मुलाने आयुष्यात एकदातरी काशीला घेऊन जावे अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. हा योग मागाठाणे येथील 2000 ज्येष्ठ नागरिकांना मिळणार असल्याने त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य खुलले आहे. चलो काशी यात्रेला असा पुकार करत मागाठाणे येथील 2000 ज्येष्ठ नागरिक आज खास रेल्वेने काशी विश्वनाथ यात्रेला रवाना झाले.

मागाठाणे विधानसभेचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी त्यांच्या मतदारसंघातील 2000 ज्येष्ठ नागरिकांना काशी विश्वानाथ यात्रेला घेऊन जाण्याचा संकल्प केला आहे. रेल्वेने बोरिवली ते वाराणसी असा 36 तासांचा प्रवास केल्यावर येत्या रविवारी पहाटे हे ज्येष्ठ नागरिक वाराणसी स्टेशनला पोहोचतील. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ योगी तेथील पोलीस आयुक्तांनी येथील 2000 ज्येष्ठ नागरिकांची खास दर्शनाची व्यवस्था केली आहे असे आमदार सुर्वे यांनी सांगितले.

यात्रेदरम्यान खास गंगा स्नान, संध्याकाळी गंगा आरती असा भरगच्च कार्यक्रम आहे. प्रवासादरम्यान या ज्येष्ठ नागरिकांची नाष्टा, चहा तसेच जेवणाची खास व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृतीची काळजी घेणारे 7 डॉकटर्स तसेच सुमारे 100 शिवसैनिक व महिला प्रत्येक डब्यात तैनात राहून त्यांची बडदास्त ठेवतील असे आमदार सुर्वे यांनी सांगितले. त्याचदिवशी रात्री 11 वाजता हे ज्येष्ठ नागरिक परतीच्या प्रवासाला मुंबईकडे रवाना होऊन मंगळवरी 36 तासांच्या रेल्वे प्रवासानंतर दुपारी मुंबईला पोहचतील अशी माहिती त्यांनी दिली.

माझ्या आईने मला एकदा तरी काशी यात्रेला घेऊन जा असे सांगितले. आईची इच्छा मी पूर्ण केली. माझ्या मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकदेखील आई वडिलांप्रमाणे असून कलीयुगातील या श्रावण बाळाने येथील 2000 ज्येष्ठ नागरिकांची काशी विश्वनाथ दर्शनाची इच्छा पूर्ण केली. गेले एक महिना आम्ही या यात्रेची तयारी करत होतो. यापूर्वी येथील जेष्ठ नागरिकांना नाशिक त्र्यंम्बकेश्वर, शिर्डी, पालघरची महालक्ष्मी यांची दर्शनयात्रा आपण आयोजित केली होती असेही सुर्वे यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
आपल्या मुलाने आयुष्यात एकदातरी काशीला घेऊन जावे अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. हा योग मागाठाणे येथील 2000 ज्येष्ठ नागरिकांना मिळणार असल्याने त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य खुलले आहे. चलो काशी यात्रेला असा पुकार करत मागाठाणे येथील 2000 ज्येष्ठ नागरिक आज खास रेल्वेने काशी विश्वनाथ यात्रेला रवाना झाले.

मागाठाणे विधानसभेचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी त्यांच्या मतदारसंघातील 2000 ज्येष्ठ नागरिकांना काशी विश्वानाथ यात्रेला घेऊन जाण्याचा संकल्प केला आहे. रेल्वेने बोरिवली ते वाराणसी असा 36 तासांचा प्रवास केल्यावर येत्या रविवारी पहाटे हे ज्येष्ठ नागरिक वाराणसी स्टेशनला पोहोचतील. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ योगी तेथील पोलीस आयुक्तांनी येथील 2000 ज्येष्ठ नागरिकांची खास दर्शनाची व्यवस्था केली आहे असे आमदार सुर्वे यांनी सांगितले.

यात्रेदरम्यान खास गंगा स्नान, संध्याकाळी गंगा आरती असा भरगच्च कार्यक्रम आहे. प्रवासादरम्यान या ज्येष्ठ नागरिकांची नाष्टा, चहा तसेच जेवणाची खास व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृतीची काळजी घेणारे 7 डॉकटर्स तसेच सुमारे 100 शिवसैनिक व महिला प्रत्येक डब्यात तैनात राहून त्यांची बडदास्त ठेवतील असे आमदार सुर्वे यांनी सांगितले. त्याचदिवशी रात्री 11 वाजता हे ज्येष्ठ नागरिक परतीच्या प्रवासाला मुंबईकडे रवाना होऊन मंगळवरी 36 तासांच्या रेल्वे प्रवासानंतर दुपारी मुंबईला पोहचतील अशी माहिती त्यांनी दिली.

माझ्या आईने मला एकदा तरी काशी यात्रेला घेऊन जा असे सांगितले. आईची इच्छा मी पूर्ण केली. माझ्या मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकदेखील आई वडिलांप्रमाणे असून कलीयुगातील या श्रावण बाळाने येथील 2000 ज्येष्ठ नागरिकांची काशी विश्वनाथ दर्शनाची इच्छा पूर्ण केली. गेले एक महिना आम्ही या यात्रेची तयारी करत होतो. यापूर्वी येथील जेष्ठ नागरिकांना नाशिक त्र्यंम्बकेश्वर, शिर्डी, पालघरची महालक्ष्मी यांची दर्शनयात्रा आपण आयोजित केली होती असेही सुर्वे यांनी सांगितले.”

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content