HomeArchiveमहाराष्ट्र साहित्य परिषदेचे...

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे वार्षिक ग्रंथ पुरस्कार वितरीत!

Details
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे वार्षिक ग्रंथ पुरस्कार वितरीत!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुरस्कार आणि साहित्यिकांचे लेखनाचे विषय बघता महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या साहित्याचा प्रभाव समाजावर असल्याचे जाणवते. म्हणून महाराष्ट्र हे प्रतिभासंपन्न साहित्यिकांचे राज्य आहे. खऱ्या साहित्याची निर्मिती नेहमीच प्रादेशिक भाषेत होत असते, असे उद्गार सरस्वती सन्मान प्राप्त गुजराती साहित्यिक पद्मश्री सितांशु यशश्चंद्र यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११३व्या वर्धापनदिन कार्यक्रमात वार्षिक ग्रंथ पुरस्कार देताना नुकतेच पुण्यात काढले.

 

यावेळी डॉ. विजया वाड, मुकुंद राज कुलकर्णी, अभिनेता जितेंद्र जोशी, राजीव तांबे, यतीन माझिरे, छाया महाजन, विनायक कुळकर्णी, संतोष शेणई, डॉ. जयश्री तोडकर यांना गौरविण्यात आले. बँकिंगविषयक ग्रंथासाठी देण्यात येणारा कै. सुभाष हरी गोखले पुरस्कार प्रसिद्ध आर्थिक लेखक आणि गुंतवणूक समुपदेशक विनायक कुळकर्णी यांना “अर्थभान- बँकिंग आणि विमा” पुस्तकासाठी गुजराती साहित्यिक सितांशु यशश्चंद्र यांच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे होते. उपाध्यक्ष चंद्रकांत शेवाळे, कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यांचीही उपस्थिती होती. कार्यवाह उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुरस्कार आणि साहित्यिकांचे लेखनाचे विषय बघता महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या साहित्याचा प्रभाव समाजावर असल्याचे जाणवते. म्हणून महाराष्ट्र हे प्रतिभासंपन्न साहित्यिकांचे राज्य आहे. खऱ्या साहित्याची निर्मिती नेहमीच प्रादेशिक भाषेत होत असते, असे उद्गार सरस्वती सन्मान प्राप्त गुजराती साहित्यिक पद्मश्री सितांशु यशश्चंद्र यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११३व्या वर्धापनदिन कार्यक्रमात वार्षिक ग्रंथ पुरस्कार देताना नुकतेच पुण्यात काढले.

 

यावेळी डॉ. विजया वाड, मुकुंद राज कुलकर्णी, अभिनेता जितेंद्र जोशी, राजीव तांबे, यतीन माझिरे, छाया महाजन, विनायक कुळकर्णी, संतोष शेणई, डॉ. जयश्री तोडकर यांना गौरविण्यात आले. बँकिंगविषयक ग्रंथासाठी देण्यात येणारा कै. सुभाष हरी गोखले पुरस्कार प्रसिद्ध आर्थिक लेखक आणि गुंतवणूक समुपदेशक विनायक कुळकर्णी यांना “अर्थभान- बँकिंग आणि विमा” पुस्तकासाठी गुजराती साहित्यिक सितांशु यशश्चंद्र यांच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे होते. उपाध्यक्ष चंद्रकांत शेवाळे, कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यांचीही उपस्थिती होती. कार्यवाह उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.”
 

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content