HomeArchiveमनोज कोटक यांचे...

मनोज कोटक यांचे संकल्पपत्र जाहीर

Details
मनोज कोटक यांचे संकल्पपत्र जाहीर

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
वाहतूक सुधारणेसह महिला सुरक्षा व सक्षमीकरणावर भर
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी बुधवारी पुढील पाच वर्षांसाठी आपले संकल्पपत्र जाहीर केले आहे. आपल्या मतदारसंघातील मतदारांच्या ‘मन की बात’ जाणून त्यांनी या संकल्पपत्राद्वारे पुढील पाच वर्षांतील आपल्या कामांचा प्राधान्यक्रम निश्चित केला आहे. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या संकल्पनेचे मतदारांकडून स्वागत होत असून कोटक यांची त्यांच्या मतदारसंघाप्रती असलेली बांधिलकी या संकल्पपत्राच्या माध्यमातून दिसत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

ईशान्य मुंबई मतदारसंघातील मतदारांच्या गरजा जाणून घेत मनोज कोटक यांनी ४५ आश्वासनांचा समावेश असलेले हे संकल्पपत्र जाहीर केले आहे. मराठी, गुजराती, हिंदी आणि इंग्रजी अशा चार भाषांमध्ये हे संकल्पपत्र प्रकाशित करण्यात आले आहे. २०२२ मध्ये देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षे पूर्ण होत असून या आगळ्यावेगळ्या घटनेचे औचित्य साधून आपल्या मतदारांना दिलेले हे आश्वासन असल्याचा उल्लेख संकल्पपत्रात करण्यात आला आहे.

संकल्पपत्रातील काही महत्त्वाचे मुद्दे

• मेट्रो ४ – वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे मेट्रो मार्ग कार्यान्वित करणार
• मेट्रो २ बी – मानखूर्द-बांद्रा-बीकेसी मेट्रो मार्ग कामास गती देणार
• मेट्रो ६ – विक्रोळी-जोगेश्वरी मेट्रो मार्ग कामास गती देणार
• एकात्मिक तिकीट प्रणाली कार्यान्वित करणार
• सर्व लोकल गाड्या पंधरा डब्यांच्या करण्यासोबतच वातानुकूलित लोकलच्या ७८ फेऱ्या सुरू करणार
• ईशान्य मुंबईतील सर्व रेल्वेस्टेशन्सवर लिफ्ट व्यवस्था उभारणार
• कुर्ला टर्मिनसचे आधुनिकीकरण
• मुलुंड-गोरेगाव लिंक रोड तसेच घाटकोपर-अंधेरी लिंक रोडचे काम पूर्ण करणार
• विक्रोळी व विद्याविहार येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण करणार”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
वाहतूक सुधारणेसह महिला सुरक्षा व सक्षमीकरणावर भर
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी बुधवारी पुढील पाच वर्षांसाठी आपले संकल्पपत्र जाहीर केले आहे. आपल्या मतदारसंघातील मतदारांच्या ‘मन की बात’ जाणून त्यांनी या संकल्पपत्राद्वारे पुढील पाच वर्षांतील आपल्या कामांचा प्राधान्यक्रम निश्चित केला आहे. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या संकल्पनेचे मतदारांकडून स्वागत होत असून कोटक यांची त्यांच्या मतदारसंघाप्रती असलेली बांधिलकी या संकल्पपत्राच्या माध्यमातून दिसत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

ईशान्य मुंबई मतदारसंघातील मतदारांच्या गरजा जाणून घेत मनोज कोटक यांनी ४५ आश्वासनांचा समावेश असलेले हे संकल्पपत्र जाहीर केले आहे. मराठी, गुजराती, हिंदी आणि इंग्रजी अशा चार भाषांमध्ये हे संकल्पपत्र प्रकाशित करण्यात आले आहे. २०२२ मध्ये देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षे पूर्ण होत असून या आगळ्यावेगळ्या घटनेचे औचित्य साधून आपल्या मतदारांना दिलेले हे आश्वासन असल्याचा उल्लेख संकल्पपत्रात करण्यात आला आहे.

संकल्पपत्रातील काही महत्त्वाचे मुद्दे

• मेट्रो ४ – वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे मेट्रो मार्ग कार्यान्वित करणार
• मेट्रो २ बी – मानखूर्द-बांद्रा-बीकेसी मेट्रो मार्ग कामास गती देणार
• मेट्रो ६ – विक्रोळी-जोगेश्वरी मेट्रो मार्ग कामास गती देणार
• एकात्मिक तिकीट प्रणाली कार्यान्वित करणार
• सर्व लोकल गाड्या पंधरा डब्यांच्या करण्यासोबतच वातानुकूलित लोकलच्या ७८ फेऱ्या सुरू करणार
• ईशान्य मुंबईतील सर्व रेल्वेस्टेशन्सवर लिफ्ट व्यवस्था उभारणार
• कुर्ला टर्मिनसचे आधुनिकीकरण
• मुलुंड-गोरेगाव लिंक रोड तसेच घाटकोपर-अंधेरी लिंक रोडचे काम पूर्ण करणार
• विक्रोळी व विद्याविहार येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण करणार”

Continue reading

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...

‘ब्रँड एकनाथ’ला मान्यता! मोदींनी दिले तब्बल 2 तास!!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर पोहोचले. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, 7-लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दोन तास चाललेल्या या...
Skip to content