HomeArchiveमनोज कोटक यांचे...

मनोज कोटक यांचे संकल्पपत्र जाहीर

Details
मनोज कोटक यांचे संकल्पपत्र जाहीर

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
वाहतूक सुधारणेसह महिला सुरक्षा व सक्षमीकरणावर भर
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी बुधवारी पुढील पाच वर्षांसाठी आपले संकल्पपत्र जाहीर केले आहे. आपल्या मतदारसंघातील मतदारांच्या ‘मन की बात’ जाणून त्यांनी या संकल्पपत्राद्वारे पुढील पाच वर्षांतील आपल्या कामांचा प्राधान्यक्रम निश्चित केला आहे. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या संकल्पनेचे मतदारांकडून स्वागत होत असून कोटक यांची त्यांच्या मतदारसंघाप्रती असलेली बांधिलकी या संकल्पपत्राच्या माध्यमातून दिसत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

ईशान्य मुंबई मतदारसंघातील मतदारांच्या गरजा जाणून घेत मनोज कोटक यांनी ४५ आश्वासनांचा समावेश असलेले हे संकल्पपत्र जाहीर केले आहे. मराठी, गुजराती, हिंदी आणि इंग्रजी अशा चार भाषांमध्ये हे संकल्पपत्र प्रकाशित करण्यात आले आहे. २०२२ मध्ये देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षे पूर्ण होत असून या आगळ्यावेगळ्या घटनेचे औचित्य साधून आपल्या मतदारांना दिलेले हे आश्वासन असल्याचा उल्लेख संकल्पपत्रात करण्यात आला आहे.

संकल्पपत्रातील काही महत्त्वाचे मुद्दे

• मेट्रो ४ – वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे मेट्रो मार्ग कार्यान्वित करणार
• मेट्रो २ बी – मानखूर्द-बांद्रा-बीकेसी मेट्रो मार्ग कामास गती देणार
• मेट्रो ६ – विक्रोळी-जोगेश्वरी मेट्रो मार्ग कामास गती देणार
• एकात्मिक तिकीट प्रणाली कार्यान्वित करणार
• सर्व लोकल गाड्या पंधरा डब्यांच्या करण्यासोबतच वातानुकूलित लोकलच्या ७८ फेऱ्या सुरू करणार
• ईशान्य मुंबईतील सर्व रेल्वेस्टेशन्सवर लिफ्ट व्यवस्था उभारणार
• कुर्ला टर्मिनसचे आधुनिकीकरण
• मुलुंड-गोरेगाव लिंक रोड तसेच घाटकोपर-अंधेरी लिंक रोडचे काम पूर्ण करणार
• विक्रोळी व विद्याविहार येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण करणार”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
वाहतूक सुधारणेसह महिला सुरक्षा व सक्षमीकरणावर भर
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी बुधवारी पुढील पाच वर्षांसाठी आपले संकल्पपत्र जाहीर केले आहे. आपल्या मतदारसंघातील मतदारांच्या ‘मन की बात’ जाणून त्यांनी या संकल्पपत्राद्वारे पुढील पाच वर्षांतील आपल्या कामांचा प्राधान्यक्रम निश्चित केला आहे. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या संकल्पनेचे मतदारांकडून स्वागत होत असून कोटक यांची त्यांच्या मतदारसंघाप्रती असलेली बांधिलकी या संकल्पपत्राच्या माध्यमातून दिसत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

ईशान्य मुंबई मतदारसंघातील मतदारांच्या गरजा जाणून घेत मनोज कोटक यांनी ४५ आश्वासनांचा समावेश असलेले हे संकल्पपत्र जाहीर केले आहे. मराठी, गुजराती, हिंदी आणि इंग्रजी अशा चार भाषांमध्ये हे संकल्पपत्र प्रकाशित करण्यात आले आहे. २०२२ मध्ये देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षे पूर्ण होत असून या आगळ्यावेगळ्या घटनेचे औचित्य साधून आपल्या मतदारांना दिलेले हे आश्वासन असल्याचा उल्लेख संकल्पपत्रात करण्यात आला आहे.

संकल्पपत्रातील काही महत्त्वाचे मुद्दे

• मेट्रो ४ – वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे मेट्रो मार्ग कार्यान्वित करणार
• मेट्रो २ बी – मानखूर्द-बांद्रा-बीकेसी मेट्रो मार्ग कामास गती देणार
• मेट्रो ६ – विक्रोळी-जोगेश्वरी मेट्रो मार्ग कामास गती देणार
• एकात्मिक तिकीट प्रणाली कार्यान्वित करणार
• सर्व लोकल गाड्या पंधरा डब्यांच्या करण्यासोबतच वातानुकूलित लोकलच्या ७८ फेऱ्या सुरू करणार
• ईशान्य मुंबईतील सर्व रेल्वेस्टेशन्सवर लिफ्ट व्यवस्था उभारणार
• कुर्ला टर्मिनसचे आधुनिकीकरण
• मुलुंड-गोरेगाव लिंक रोड तसेच घाटकोपर-अंधेरी लिंक रोडचे काम पूर्ण करणार
• विक्रोळी व विद्याविहार येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण करणार”

Continue reading

महाराष्ट्रात भरदिवाळीत अवकाळी पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्र आणि केरळ-कर्नाटक किनाऱ्यावरील लक्षद्वीप क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. पुढील 24 तासांत ते पश्चिम-वायव्येकडे म्हणजेच बंगालच्या उपसागरावर सरकण्याची आणि कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात...

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर...

उपेक्षितांना सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कारीत करा!

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्त्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत घेऊन जाणे, त्यांना केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कारीत करणे हेच आपल्या जीवनाचे धेय्य असल्याचे...
Skip to content