HomeArchiveभ्रष्टाचार्‍यांचा कर्दनकाळ!

भ्रष्टाचार्‍यांचा कर्दनकाळ!

Details
भ्रष्टाचार्‍यांचा कर्दनकाळ!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]

सहाय्यक पोलीस आयुक्त विलास तुपे यांनी लिहिलेले ‘ट्रॅपस्-अँटी करप्शन’ हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले. निवृत्त पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांनी हे पुस्तक प्रकाशित करताना तुपे यांचे कौतुक केले. ‘तुपे हे केस तयार करण्यात इतके निपूण होते की, त्यांना कागदावरील एनकाऊंटर स्पेशलिस्ट म्हटले पाहिजे’, असेही शिवानंदन म्हणाले. तुपे हे पोलीस सेवेत असताना एक कर्तबगार आणि स्वच्छ चारित्र्याचे अधिकारी म्हणून ओळखले जात. त्यांनी ज्या-ज्या विभागात काम केले त्या-त्या विभागात आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटवला. अशा कर्तबगार अधिकार्‍याची अँटी करप्शन विभागात नेमणूक केली जाते. तुपे यांची या विभागात बदली झाली आणि ते भ्रष्ट सरकारी कर्मचार्‍यांचा कर्दनकाळ ठरले.

 

भ्रष्टाचाराची चीड असलेल्या तुपे यांनी अनेक लाचखोर सरकारी कर्मचार्‍यांना आणि अधिकार्‍यांना गजाआड केले. त्या विविध प्रकरणांच्या सत्यकथा तुपे यांनी साध्या आणि सोप्या भाषेत मांडल्या आहेत. त्या वाचताना समाजात भ्रष्टाचार किती खोलवर रूजला आहे याची कल्पना येते. या पुस्तकात रेशनिंग ट्रॅप, खोटी तक्रार, रेव्हेन्यू बिल कलेक्टर ट्रॅप, पोलीस प्रशिक्षण केंद्र ट्रॅप, इतकेच नव्हे तर प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणार्‍या पोस्टमार्टम डॉक्टर ट्रॅपसारख्या सापळ्यांच्या कथा तुपे यांनी रसाळ भाषेत कथन केल्या आहेत. यातील ‘मयत पार्टी’चा किस्सा मनोरंजक आहे. तुपे यांची अँटी करप्शन ब्युरोमध्ये नेमणूक झाल्यानंतर त्यांच्या पहिल्या ट्रॅपच्या वेळी अनुभवी एसीपी अब्दुल रौफ शेख त्यांना म्हणाले, ‘मी मयत पार्टी बनवित आहे.’ ‘सर, हा मयत पार्टी काय प्रकार आहे?’ असा निरागस प्रश्न नवख्या तुपे यांनी विचारला असता रौफ म्हणाले, ‘ट्रॅपसाठी 10 ते 12 अधिकारी, कर्मचारी, साक्षीदारांची टीम करावी लागते व त्यांनी लाच मागणार्‍या सरकारी/निमसरकारी नोकरास लाच घेताना रंगेहात पकडल्यावर त्याचा पब्लिक सर्व्हंट म्हणून तात्पुरता मृत्यू होत असतो. जिवंत असून तो मेल्यासारखाच असतो. दुसर्‍या दिवशी तो पैसे खाल्ल्याबद्दल, लाचखाऊ अधिकारी/कर्मचारी म्हणून प्रसिद्ध होतो. सेवेतून तो कमीत कमी 6 महिने तत्काळ निलंबित होतो. म्हणून ही मयत पार्टी.’

 

तुपे यांना या ‘मयत पार्टी’चे प्रमुख बनविण्यात आले. ते प्रकरण होते महापालिकेतील जनार्दन पाटील नावाच्या मुकादमाचे. त्या मुकादमाने एका झोपडीधारकाकडून झोपडीची रूंदी वाढविण्याकरिता 30 हजार रूपयांची लाच मागितली होती. फुटपाथवर बसून दिवसातून 25 ते 30 रूपये कमविणार्‍या त्या गरीबासाठी ही रक्कम कितीतरी मोठी होती. अखेर त्याने 500 रूपये महिना असे सहा हफ्ते देण्याचे नाईलाजास्तव कबूल केले. मग त्याने क्रिसेंट हाऊस, बॅलार्ड पिअर येथे जाऊन त्या मुकादमाची अँटी करप्शनमध्ये तक्रार केली. तुपे यांनी सापळा रचून त्या मुकादमाला अटक केली. पुढे या मुकादमाला दोन वर्षे कैदेची शिक्षा झाली. 57 वर्षे वय असलेल्या त्या मुकादमाची तुपे यांना आधी दया आली होती. पण कर्तव्यापुढे सारे काही दुय्यम मानणार्‍या कर्तबगार तुपे यांनी त्याला गजाआड पोहोचविले. नंतरच्या काळात त्यांना असे अनेक ‘मुकादम’ भेटले. तुपे यांनी त्यांच्या नाकात दम आणला.

त्यांच्याविरोधात भक्कम केस तयार करून त्यांना तुरूंगात टाकले.
‘ट्रॅपस्-अँटी करप्शन’ हे पुस्तक तुपे यांनी केवळ हौस म्हणून लिहिलेले नाही. एकदा पकडले गेल्यानंतर होणारा मनस्ताप, बदनामी, तुरूंगवास याचा विचार करून सरकारी कर्मचारी हे पुस्तक वाचून आपल्या दैनंदिन कामामध्ये भ्रष्ट्राचार करणे थांबवतील अशी तुपे यांना आशा वाटते. 176 पृष्ठे असलेल्या या पुस्तकाची किंमत 150 रूपये आहे. पण तुपे यांनी व्यवसाय करण्यासाठी ते लिहिलेले नाही. प्रकाशन समारंभात सर्व उपस्थितांना हे पुस्तक विनामूल्य वाटण्यात आले. यावरून तुपे यांच्या सामाजिक बांधिलकीची आणि तळमळीची कल्पना येते. हे पुस्तक सर्वांनी, विशेषत: भ्रष्ट सरकारी बाबूंनी आवर्जून वाचावे, अशी आम्ही शिफारस करत आहोत…”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]

सहाय्यक पोलीस आयुक्त विलास तुपे यांनी लिहिलेले ‘ट्रॅपस्-अँटी करप्शन’ हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले. निवृत्त पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांनी हे पुस्तक प्रकाशित करताना तुपे यांचे कौतुक केले. ‘तुपे हे केस तयार करण्यात इतके निपूण होते की, त्यांना कागदावरील एनकाऊंटर स्पेशलिस्ट म्हटले पाहिजे’, असेही शिवानंदन म्हणाले. तुपे हे पोलीस सेवेत असताना एक कर्तबगार आणि स्वच्छ चारित्र्याचे अधिकारी म्हणून ओळखले जात. त्यांनी ज्या-ज्या विभागात काम केले त्या-त्या विभागात आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटवला. अशा कर्तबगार अधिकार्‍याची अँटी करप्शन विभागात नेमणूक केली जाते. तुपे यांची या विभागात बदली झाली आणि ते भ्रष्ट सरकारी कर्मचार्‍यांचा कर्दनकाळ ठरले.

 

भ्रष्टाचाराची चीड असलेल्या तुपे यांनी अनेक लाचखोर सरकारी कर्मचार्‍यांना आणि अधिकार्‍यांना गजाआड केले. त्या विविध प्रकरणांच्या सत्यकथा तुपे यांनी साध्या आणि सोप्या भाषेत मांडल्या आहेत. त्या वाचताना समाजात भ्रष्टाचार किती खोलवर रूजला आहे याची कल्पना येते. या पुस्तकात रेशनिंग ट्रॅप, खोटी तक्रार, रेव्हेन्यू बिल कलेक्टर ट्रॅप, पोलीस प्रशिक्षण केंद्र ट्रॅप, इतकेच नव्हे तर प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणार्‍या पोस्टमार्टम डॉक्टर ट्रॅपसारख्या सापळ्यांच्या कथा तुपे यांनी रसाळ भाषेत कथन केल्या आहेत. यातील ‘मयत पार्टी’चा किस्सा मनोरंजक आहे. तुपे यांची अँटी करप्शन ब्युरोमध्ये नेमणूक झाल्यानंतर त्यांच्या पहिल्या ट्रॅपच्या वेळी अनुभवी एसीपी अब्दुल रौफ शेख त्यांना म्हणाले, ‘मी मयत पार्टी बनवित आहे.’ ‘सर, हा मयत पार्टी काय प्रकार आहे?’ असा निरागस प्रश्न नवख्या तुपे यांनी विचारला असता रौफ म्हणाले, ‘ट्रॅपसाठी 10 ते 12 अधिकारी, कर्मचारी, साक्षीदारांची टीम करावी लागते व त्यांनी लाच मागणार्‍या सरकारी/निमसरकारी नोकरास लाच घेताना रंगेहात पकडल्यावर त्याचा पब्लिक सर्व्हंट म्हणून तात्पुरता मृत्यू होत असतो. जिवंत असून तो मेल्यासारखाच असतो. दुसर्‍या दिवशी तो पैसे खाल्ल्याबद्दल, लाचखाऊ अधिकारी/कर्मचारी म्हणून प्रसिद्ध होतो. सेवेतून तो कमीत कमी 6 महिने तत्काळ निलंबित होतो. म्हणून ही मयत पार्टी.’

 

तुपे यांना या ‘मयत पार्टी’चे प्रमुख बनविण्यात आले. ते प्रकरण होते महापालिकेतील जनार्दन पाटील नावाच्या मुकादमाचे. त्या मुकादमाने एका झोपडीधारकाकडून झोपडीची रूंदी वाढविण्याकरिता 30 हजार रूपयांची लाच मागितली होती. फुटपाथवर बसून दिवसातून 25 ते 30 रूपये कमविणार्‍या त्या गरीबासाठी ही रक्कम कितीतरी मोठी होती. अखेर त्याने 500 रूपये महिना असे सहा हफ्ते देण्याचे नाईलाजास्तव कबूल केले. मग त्याने क्रिसेंट हाऊस, बॅलार्ड पिअर येथे जाऊन त्या मुकादमाची अँटी करप्शनमध्ये तक्रार केली. तुपे यांनी सापळा रचून त्या मुकादमाला अटक केली. पुढे या मुकादमाला दोन वर्षे कैदेची शिक्षा झाली. 57 वर्षे वय असलेल्या त्या मुकादमाची तुपे यांना आधी दया आली होती. पण कर्तव्यापुढे सारे काही दुय्यम मानणार्‍या कर्तबगार तुपे यांनी त्याला गजाआड पोहोचविले. नंतरच्या काळात त्यांना असे अनेक ‘मुकादम’ भेटले. तुपे यांनी त्यांच्या नाकात दम आणला.

त्यांच्याविरोधात भक्कम केस तयार करून त्यांना तुरूंगात टाकले.
‘ट्रॅपस्-अँटी करप्शन’ हे पुस्तक तुपे यांनी केवळ हौस म्हणून लिहिलेले नाही. एकदा पकडले गेल्यानंतर होणारा मनस्ताप, बदनामी, तुरूंगवास याचा विचार करून सरकारी कर्मचारी हे पुस्तक वाचून आपल्या दैनंदिन कामामध्ये भ्रष्ट्राचार करणे थांबवतील अशी तुपे यांना आशा वाटते. 176 पृष्ठे असलेल्या या पुस्तकाची किंमत 150 रूपये आहे. पण तुपे यांनी व्यवसाय करण्यासाठी ते लिहिलेले नाही. प्रकाशन समारंभात सर्व उपस्थितांना हे पुस्तक विनामूल्य वाटण्यात आले. यावरून तुपे यांच्या सामाजिक बांधिलकीची आणि तळमळीची कल्पना येते. हे पुस्तक सर्वांनी, विशेषत: भ्रष्ट सरकारी बाबूंनी आवर्जून वाचावे, अशी आम्ही शिफारस करत आहोत…”
 
 

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content