HomeArchiveनारळाचा करा बहुगुणी...

नारळाचा करा बहुगुणी उपयोग!

Details
नारळाचा करा बहुगुणी उपयोग!

    04-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
 
विनय गजानन खरे
 
नारळ हा प्रकार माहीत नसलेला यच्चयावत दुनियेत कोणी असेल असं मला नाही वाटत. तुम्हाला तरी वाटतं का? इतकी या नारळाची महती आहे. नारळपाणी आजारी माणसाचं महत्त्वाचं पोषण, खाद्यपदार्थ रूचकर, चविष्ट बनविण्यात याचा मोठा वाटा! इतकंच आहे का, तर नाही. अगदी एखाद्याला घालवायचा असेल तर नारळ द्या म्हंटलं जातं. मानपान द्यायचा झाला तर हाती नारळ-फुल दिलं जातं. मध्ये एका वाहिनीवर हास्यसम्राट नावाचा विनोदी कार्यक्रम झाला. त्यात स्पर्धकाला बाहेरचा रस्ता दाखविण्यासाठी नारळ देण्याची संकल्पना राबवली गेली. विशेषतः हिंदुस्थानात पूजाअर्चनेसाठी नारळ श्रीफळ म्हणून लागतो.

देशभरात नारळी पौर्णिमा हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला गेला. पण त्याची महती त्या दिवसापुरती नाही. कोणत्याही शुभकार्याची सुरूवात श्रीफळ वाढवून करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. ऐन पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने त्याला शांत होण्याचे आवाहन करत पुढील हंगामात संकट काळात तारणहार होच. शिवाय धंदा बरकतीत राहू दे हे सांगणारी आराधना! देशाच्या तिन्ही किनाऱ्यावरील, या व्यवसायावर उदरनिर्वाह असणारे करतात. हे आपल्याला शाळेतून सांगितलं गेलंय. आता तांत्रिक सुविधा वाढल्याने बाराही महिने मासेमारी चालू असते. यंदा हा सण बुधवारी १४ ऑगस्टला झाला तोही पारंपरिक पद्धतीने.

नारळ भौतिक पातळीवर म्हणजे खाण्यासाठी उपयोगी ठरतो असे नाही तर मानसिक, अध्यात्मिकदृष्ट्या वापरला जातो. अदृश्य शक्तीशी संभाषण किंवा त्या शक्तीला संतुष्ट करण्यासाठी नारळ देण्याची पद्धत आहे. धार्मिक कार्यात नारळ देण्यामागे शरण आल्याची भावना असते. अहंकाराचा नाश करून त्याच्या पायी आपण नतमस्तक आहोत हे दाखवल जातं. शुभ म्हणून नारळ घरात ठेवणे चांगले मानले जाते. नारळाचे असंख्य उपयोग मानवाने शोधून काढले. त्यामुळे नारळ हा पृथ्वीवरील कल्पवृक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला.

साधारणपणे समुद्र किनाऱ्यावरील पट्ट्यात नारळ लागवड पूर्वी आढळायची. मात्र, बदलत्या काळानुसार आता अगदी विदर्भाच्या पोषक वातावरण नसलेल्या भागात नारळ बागा दिसतात. डौलदार नारळाची झाडं वाऱ्यावर डोलताना पाहण्यास वेगळीच मजा असते. चरकसंहिता, सुश्रुतसंहिता यात नारळ महती सांगितली आहे. नारळ हे फळ चवीला गोड, गुणांनी स्निग्ध, गुरू असते. शीत असल्याने पित्तदोष शमन करून ताकद वाढवते. मूत्राशयाची शुद्धी करून मांसधातू पोषण तसेच हृदयाला हितकर असते. नैसर्गिक कफाचे पोषण करते.

नारळाच्या तीन अवस्था सांगितल्या जातात. यात बाल म्हणजे फक्त पाणी, मध्य म्हणजे पाण्यासह सायीसारखा गोड गर, नि पक्व यात पाणी कमी जाडसर घट्ट गर म्हणजे खोबरे. त्यापुढील स्थिती गोटा खोबरे. शहाळ्याचे मलाईयुक्त खोबरे हा एक वेगळाच आनंद खाणाऱ्याला देतो! खोबऱ्याचे अनेक उपयुक्त इलाज आयुर्वेदात आहेत. नारळ दूध केसांना लावल्यास वाढायला मदत, चेहऱ्याला लावल्यास वर्ण उजळतो. जिथे दुधाची कमतरता असेल, तिथे या दुधाचा वापर केला जातो.

वरील वर्णनातील बाल आपण शहाळे म्हणून ओळखतो. उन्हाळ्यात नि आजारात हे उपयुक्त ठरते. याचे पाणी नुसते तहान भागवते असं नाही तर उष्णतेने थकलेल्या शरीरात पुन्हा टवटवी भरते. ते शरीरात पटकन स्वीकारले जात असल्याने काहीवेळा अलीकडे सलाईनमधूनही दिले जाते. जुलाबात शरीरात भासणारी पाण्याची कमतरता ते भरून काढते. शरीराच्या वाढत्या उष्णतेवर, लघवीची जळजळ यात पाण्याचा खूप छान उपयोग होतो. पण, मूत्रपिंडाच्या अकार्यक्षमतेमुळे लघवी होत नसल्यास हे पाणी देऊ नये. औषधांमुळे होणारी उष्णता, विषद्रव्ये निघून जाण्यासही घेता येते. असे अनेक उपयोग सांगता येतात.

 

 
 
 
बुद्धिजीवी, ताण असलेल्या व्यक्ती, गर्भवती विशेषतः गर्भजल समस्या असलेल्या स्त्रिया, ऊन अथवा अर्धशिशीग्रस्तास डोकेदुखी थांबविण्यासाठी खडीसाखर घालून हे पाणी दिले जाते. नारळाच्या दुधात मोनोलोरीन हे विशेष तत्त्व असल्याने ते पौष्टिक असते. केवळ स्तन्य दुधात ते असते. लहान मुलांना अन्न सुरू करताना हे दूध चालू शकते. ओले खोबरे किसून किंवा खवून दूध काढले जाते. हल्ली संगणक, मोबाईल हे डोळ्यांना थकवणारे आहेतच, शिवाय प्रखर दिवे, उन्हात काम करणाऱ्यांनी पातळ खोबरं खाण्याची सवय ठेवल्यास चक्कर येणे, डोळ्यांची आग होणे, डोकेदुखी यावर उपयोग होईल. नारळाची फुले गर्भाशयाची ताकद वाढविणारी असतात, ती पौष्टिक म्हणून बाळंतपणानंतरही घेता येतात.

ओला नारळ नसलेल्या भागात सुकं खोबरं वापरलं जातं. मसालेदार जेवण विशेषतः मांसाहारी नारळशिवाय होऊ शकत नाही. दक्षिण भारतात तर स्वयंपाकासाठी खोबरेल तेलच वापरले जाते. उपलब्ध विज्ञान माहितीनुसार नैसर्गिक शुद्ध खोबरेल तेलाचा रोजच्या आहारात समावेश केल्यास अतिरिक्त चरबी कमी होण्यासह वाईट कोलेस्टेरॉल कमी होते, रोगप्रतिकार शक्ती वाढते, झोप शांत लागते असे लक्षात आलंय. नारळाच्या करंज्या, वड्या, नारळीभात, मोदक, आदी पक्वान्ने प्रसिध्द आहेतच. अनेक वधूवर पाहणीत गरम कांदेबटाटे पोहे सहज दिले जातात. त्यावर खवलेला नारळ चव म्हणजे फारच अप्रतिम, अपरिहार्य! आयुर्वेदात नारिकेल खंडपाक म्हणून एक योग आहे. तो अत्यंत प्रभावी आहे. त्याचबरोबर नारिकेल क्षार, श्रीफल कुसुमादी वटी आदीही योग दिलेत.

इतक्या बहुविध उपायांनी नारळ आपल्या दैनंदिन जीवनात स्थान मिळवून आहे. एका नारळाच्या देण्याने समुद्र शांत कसा होतो हा प्रश्न अनेकांना पडेल. यामागे इतर काही असो पण, श्रद्धा मात्र आहे. तिला आव्हान कोण नि कसे देणार हे मात्र ज्याच्यात्याच्या बुद्धीवर अवलंबून आहे. तुम्ही द्या नाही तर नका देऊ, निसर्ग जे आहे ते तुम्हाला देतोच! आणि हो वरील उपचार तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्याकडून जाणून घेऊन मगच करा. कारण त्यात अन्य मिश्रण करण्याचे घटकही आहेत. तेव्हा बनवा नारळाच्या वड्या किंवा नारळी भात नि करा सण नेहमीच साजरा! मला बोलावलेत तर आवडेल!

 

 
 
 
विनय गजानन खरे

 
“नारळ हा प्रकार माहीत नसलेला यच्चयावत दुनियेत कोणी असेल असं मला नाही वाटत. तुम्हाला तरी वाटतं का? इतकी या नारळाची महती आहे. नारळपाणी आजारी माणसाचं महत्त्वाचं पोषण, खाद्यपदार्थ रूचकर, चविष्ट बनविण्यात याचा मोठा वाटा! इतकंच आहे का, तर नाही. अगदी एखाद्याला घालवायचा असेल तर नारळ द्या म्हंटलं जातं. मानपान द्यायचा झाला तर हाती नारळ-फुल दिलं जातं. मध्ये एका वाहिनीवर हास्यसम्राट नावाचा विनोदी कार्यक्रम झाला. त्यात स्पर्धकाला बाहेरचा रस्ता दाखविण्यासाठी नारळ देण्याची संकल्पना राबवली गेली. विशेषतः हिंदुस्थानात पूजाअर्चनेसाठी नारळ श्रीफळ म्हणून लागतो.”

 

 
 
 

Continue reading

‘बीएमसी’त इतिहास घडविणाऱ्या ‘मेट्रो वुमन’!

बीएमसीच्या म्हणजेच मुंबई महापालिकेच्या १३८ वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात आजपर्यंत आयुक्तपदावर कधीही महिला बसली नव्हती. मात्र, ३१ मार्च २०२६ हा दिवस त्या इतिहासाला कलाटणी देणारा ठरला. महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बीएमसी आयुक्तपदी नियुक्ती जाहीर केली. या...

श्रद्धा और सबुरी! दिल्लीहून शिर्डीला निघालेल्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग!!

दिल्लीहून शिर्डीच्या दिशेने निघालेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला मंगळवारी खराब हवामानामुळे गुजरातमध्ये सूरत विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. विमानात १५०पेक्षा जास्त प्रवासी होते. शिर्डी विमानतळावर जोरदार वारे आणि अत्यंत कमी दृश्यमानता असल्याने लँडिंग अशक्य झाल्यावर पायलटने विमान सुमारे एक तास...

अश्विनी भिडे झाल्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त!

देशातील सर्वात मोठी आणि सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) आयुक्तपदी 'मेट्रो वुमन' म्हणून ओळख असलेल्या अश्विनी भिडे यांची नियुक्ती मंगळवारी जाहीर करण्यात आली. निवृत्त होत असलेले आयुक्त भूषण गागराणी यांच्याकडून भिडे यांनी पदभार स्वीकारला आहे....
Skip to content