HomeArchiveगणेशोत्सव काळात शालेय...

गणेशोत्सव काळात शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा नको – सुनील प्रभू

Details
गणेशोत्सव काळात शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा नको – सुनील प्रभू

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. विशेषत: कोकणातील बहुतांश चाकरमानी या काळात आपल्या कुटुंबियांसमवेत घरी (गावी) जातात. परिणामी अनेक शालेय विद्यार्थी शाळेमध्ये जात नाहीत. अनेक सरकारी शाळांना गौरी-गणपती विसर्जनापर्यंत सुट्टी दिली जाते. परंतु काही कॉन्व्हेंट शाळा सुट्टी तर नाहीच परंतु हेतुपुरस्सर विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतात. या कॉन्व्हेंट शाळाचालकांना शाळेला सुट्टी देण्याचे तसेच पूर्ण गणेशोत्सव कालावधीत परीक्षा घेण्यास मज्जाव करण्याचे निर्देश द्यावे यासाठी असंख्य पालकांच्या तक्रारी युवासेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे आल्या होत्या.

या अनुषंगाने ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद सुनील प्रभू आणि युवा सेना मुंबई विद्यापीठ सेनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, महादेव जगताप, राजन कोलंबेकर यांनी बुधवारी दुपारी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची भेट घेऊन गणेशोत्सव काळात कोणत्याही परीक्षा घेवू नये अशी आग्रही मागणी केली. तत्काळ आशिष शेलार यांनी बैठकीत उपस्थित असलेले शिक्षण विभागाचे उपसंचालक आयरे यांना गणेशोत्सव काळात शाळांना पाच दिवसांची सुट्टी देऊन संपूर्ण गणेशोत्सव काळात लेखी व तोंडी, कोणत्याही परीक्षा घेऊ नये असे परिपत्रक काढण्याचे निर्देश दिले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. विशेषत: कोकणातील बहुतांश चाकरमानी या काळात आपल्या कुटुंबियांसमवेत घरी (गावी) जातात. परिणामी अनेक शालेय विद्यार्थी शाळेमध्ये जात नाहीत. अनेक सरकारी शाळांना गौरी-गणपती विसर्जनापर्यंत सुट्टी दिली जाते. परंतु काही कॉन्व्हेंट शाळा सुट्टी तर नाहीच परंतु हेतुपुरस्सर विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतात. या कॉन्व्हेंट शाळाचालकांना शाळेला सुट्टी देण्याचे तसेच पूर्ण गणेशोत्सव कालावधीत परीक्षा घेण्यास मज्जाव करण्याचे निर्देश द्यावे यासाठी असंख्य पालकांच्या तक्रारी युवासेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे आल्या होत्या.

या अनुषंगाने ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद सुनील प्रभू आणि युवा सेना मुंबई विद्यापीठ सेनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, महादेव जगताप, राजन कोलंबेकर यांनी बुधवारी दुपारी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची भेट घेऊन गणेशोत्सव काळात कोणत्याही परीक्षा घेवू नये अशी आग्रही मागणी केली. तत्काळ आशिष शेलार यांनी बैठकीत उपस्थित असलेले शिक्षण विभागाचे उपसंचालक आयरे यांना गणेशोत्सव काळात शाळांना पाच दिवसांची सुट्टी देऊन संपूर्ण गणेशोत्सव काळात लेखी व तोंडी, कोणत्याही परीक्षा घेऊ नये असे परिपत्रक काढण्याचे निर्देश दिले.”

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content