Details
गणेशोत्सव काळात शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा नको – सुनील प्रभू
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. विशेषत: कोकणातील बहुतांश चाकरमानी या काळात आपल्या कुटुंबियांसमवेत घरी (गावी) जातात. परिणामी अनेक शालेय विद्यार्थी शाळेमध्ये जात नाहीत. अनेक सरकारी शाळांना गौरी-गणपती विसर्जनापर्यंत सुट्टी दिली जाते. परंतु काही कॉन्व्हेंट शाळा सुट्टी तर नाहीच परंतु हेतुपुरस्सर विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतात. या कॉन्व्हेंट शाळाचालकांना शाळेला सुट्टी देण्याचे तसेच पूर्ण गणेशोत्सव कालावधीत परीक्षा घेण्यास मज्जाव करण्याचे निर्देश द्यावे यासाठी असंख्य पालकांच्या तक्रारी युवासेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे आल्या होत्या.
या अनुषंगाने ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद सुनील प्रभू आणि युवा सेना मुंबई विद्यापीठ सेनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, महादेव जगताप, राजन कोलंबेकर यांनी बुधवारी दुपारी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची भेट घेऊन गणेशोत्सव काळात कोणत्याही परीक्षा घेवू नये अशी आग्रही मागणी केली. तत्काळ आशिष शेलार यांनी बैठकीत उपस्थित असलेले शिक्षण विभागाचे उपसंचालक आयरे यांना गणेशोत्सव काळात शाळांना पाच दिवसांची सुट्टी देऊन संपूर्ण गणेशोत्सव काळात लेखी व तोंडी, कोणत्याही परीक्षा घेऊ नये असे परिपत्रक काढण्याचे निर्देश दिले.”
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. विशेषत: कोकणातील बहुतांश चाकरमानी या काळात आपल्या कुटुंबियांसमवेत घरी (गावी) जातात. परिणामी अनेक शालेय विद्यार्थी शाळेमध्ये जात नाहीत. अनेक सरकारी शाळांना गौरी-गणपती विसर्जनापर्यंत सुट्टी दिली जाते. परंतु काही कॉन्व्हेंट शाळा सुट्टी तर नाहीच परंतु हेतुपुरस्सर विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतात. या कॉन्व्हेंट शाळाचालकांना शाळेला सुट्टी देण्याचे तसेच पूर्ण गणेशोत्सव कालावधीत परीक्षा घेण्यास मज्जाव करण्याचे निर्देश द्यावे यासाठी असंख्य पालकांच्या तक्रारी युवासेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे आल्या होत्या.
या अनुषंगाने ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद सुनील प्रभू आणि युवा सेना मुंबई विद्यापीठ सेनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, महादेव जगताप, राजन कोलंबेकर यांनी बुधवारी दुपारी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची भेट घेऊन गणेशोत्सव काळात कोणत्याही परीक्षा घेवू नये अशी आग्रही मागणी केली. तत्काळ आशिष शेलार यांनी बैठकीत उपस्थित असलेले शिक्षण विभागाचे उपसंचालक आयरे यांना गणेशोत्सव काळात शाळांना पाच दिवसांची सुट्टी देऊन संपूर्ण गणेशोत्सव काळात लेखी व तोंडी, कोणत्याही परीक्षा घेऊ नये असे परिपत्रक काढण्याचे निर्देश दिले.”