HomeArchiveगणेशोत्सव काळात शालेय...

गणेशोत्सव काळात शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा नको – सुनील प्रभू

Details
गणेशोत्सव काळात शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा नको – सुनील प्रभू

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. विशेषत: कोकणातील बहुतांश चाकरमानी या काळात आपल्या कुटुंबियांसमवेत घरी (गावी) जातात. परिणामी अनेक शालेय विद्यार्थी शाळेमध्ये जात नाहीत. अनेक सरकारी शाळांना गौरी-गणपती विसर्जनापर्यंत सुट्टी दिली जाते. परंतु काही कॉन्व्हेंट शाळा सुट्टी तर नाहीच परंतु हेतुपुरस्सर विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतात. या कॉन्व्हेंट शाळाचालकांना शाळेला सुट्टी देण्याचे तसेच पूर्ण गणेशोत्सव कालावधीत परीक्षा घेण्यास मज्जाव करण्याचे निर्देश द्यावे यासाठी असंख्य पालकांच्या तक्रारी युवासेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे आल्या होत्या.

या अनुषंगाने ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद सुनील प्रभू आणि युवा सेना मुंबई विद्यापीठ सेनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, महादेव जगताप, राजन कोलंबेकर यांनी बुधवारी दुपारी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची भेट घेऊन गणेशोत्सव काळात कोणत्याही परीक्षा घेवू नये अशी आग्रही मागणी केली. तत्काळ आशिष शेलार यांनी बैठकीत उपस्थित असलेले शिक्षण विभागाचे उपसंचालक आयरे यांना गणेशोत्सव काळात शाळांना पाच दिवसांची सुट्टी देऊन संपूर्ण गणेशोत्सव काळात लेखी व तोंडी, कोणत्याही परीक्षा घेऊ नये असे परिपत्रक काढण्याचे निर्देश दिले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. विशेषत: कोकणातील बहुतांश चाकरमानी या काळात आपल्या कुटुंबियांसमवेत घरी (गावी) जातात. परिणामी अनेक शालेय विद्यार्थी शाळेमध्ये जात नाहीत. अनेक सरकारी शाळांना गौरी-गणपती विसर्जनापर्यंत सुट्टी दिली जाते. परंतु काही कॉन्व्हेंट शाळा सुट्टी तर नाहीच परंतु हेतुपुरस्सर विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतात. या कॉन्व्हेंट शाळाचालकांना शाळेला सुट्टी देण्याचे तसेच पूर्ण गणेशोत्सव कालावधीत परीक्षा घेण्यास मज्जाव करण्याचे निर्देश द्यावे यासाठी असंख्य पालकांच्या तक्रारी युवासेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे आल्या होत्या.

या अनुषंगाने ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद सुनील प्रभू आणि युवा सेना मुंबई विद्यापीठ सेनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, महादेव जगताप, राजन कोलंबेकर यांनी बुधवारी दुपारी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची भेट घेऊन गणेशोत्सव काळात कोणत्याही परीक्षा घेवू नये अशी आग्रही मागणी केली. तत्काळ आशिष शेलार यांनी बैठकीत उपस्थित असलेले शिक्षण विभागाचे उपसंचालक आयरे यांना गणेशोत्सव काळात शाळांना पाच दिवसांची सुट्टी देऊन संपूर्ण गणेशोत्सव काळात लेखी व तोंडी, कोणत्याही परीक्षा घेऊ नये असे परिपत्रक काढण्याचे निर्देश दिले.”

Continue reading

बिहारमध्ये महागठबंधनचे आमदारच लापता! नितीश कुमार राज्यसभेत!!

देशाच्या दहा राज्यांमधील 37 राज्यसभा जागांसाठी सोमवारी मतदान झाले. यापैकी 26 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. खरी चुरस बिहारच्या 5 जागा, ओडिशातील 4 जागा आणि हरियाणा (2 जागा) या तीन राज्यांपुरतीच उरली. या 2026 राज्यसभा निवडणुकीत 'एनडीए'चा देशभर...

ओपिनियन पोल: ममतांचा चौथा विजय निश्चित; तामिळनाडूत स्टालिनना धक्का!

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आणि त्याचदिवशी मॅट्रिज-आयएएनएस या संस्थेने या पाचही राज्यांसाठी आपला बहुप्रतिक्षित ओपिनियन पोल जाहीर केला. त्यानुसार, ममतांचा चौथा विजय जवळपास निश्चित मानला जात...

मंत्रालयातल्या दुसऱ्या पंतांचे (पंतबाळेकुंद्री) निधन, आज अन्त्यसंस्कार

महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयाच्या नगरविकास विभागातून सहसचिव म्हणून निवृत्त झालेले नामवंत अधिकारी गो. श्री. पंतबाळेकुंद्री यांचे काल, सोमवारी ठाण्यात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, पुत्र अभिजीत आणि विवाहित कन्या तसेच नातवंडे असा परिवार आहे. पंत यांच्या पार्थिवावर...
Skip to content