HomeArchiveउमेदवार आणण्याची परंपरा...

उमेदवार आणण्याची परंपरा यशवंतराव चव्हाण यांच्यावेळचीच! – मधु चव्हाण

Details
उमेदवार आणण्याची परंपरा यशवंतराव चव्हाण यांच्यावेळचीच! – मधु चव्हाण

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दुसऱ्या पक्षातील उमेदवार भारतीय जनता पार्टीत स्वतःहून येत आहेत. ही उमेदवारांची पळवापळवी नाही. उमेदवारांना स्वतःच्या पक्षात घेण्याची परंपरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या वेळेपासून सुरू झाली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे अभ्यासू नेते यशवंतराव मोहिते यांना काँग्रेस पक्षाच्या घेऊन पक्ष वाढविण्याची परंपरा सुरू झाली. त्याचे मानसपुत्र शरद पवार यांनीही ही परंपरा आजतागायत चालू ठेवली आहे. त्यामुळे भाजपाची भूमिका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकास कार्यक्रम आवडला म्हणून इतर पक्षातील ज्येष्ठ भाजपात येत असतील तर त्यात वावगे काहीच नाही, असे मत भाजपाचे ज्येष्ठ प्रवक्ते व म्हाडा मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी व्यक्त केले.

मुंबई मराठी पत्रकार संघाने लोकसभा निवडणूक : २०१९, ही वार्तालाप मालिका आयोजित केली आहे. त्यात मधु चव्हाण बोलत होते. प्रारंभी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मधु चव्हाण यांनी मुंबईतील लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी यांनी देशात विकासाची कामे केली आहेत. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी प्रत्येक देशाबरोबर चांगले संबंध प्रस्थापित केल्याने पाकिस्तान आज एकटा पडला आहे. सन २००८ मध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईत ३०० हून अधिक निरपराध माणसांना मारले. त्यात आमचे आघाडीचे पोलीस अधिकारी हेमंत करकरे, विजय साळकर आणि अशोक कामटे मारले गेले. त्यावेळी तत्कालीन काँग्रेस सरकारने निषेधाचे पाकिस्तानला पत्र पाठविले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्काराला पूर्ण स्वातंत्र्य देऊन लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केला. पण दुर्दैव असं की, राहुल गांधी यांचे मार्गदर्शक सॅम पित्रोदा मोदी यांच्याकडे पुरावा मागत आहेत. इतर विरोधी पक्षही पुरावा मागत आहेत. परंतु जनमानसात याबाबत प्रचंड संताप निर्माण झाला असून त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून येईल, असेही मधु चव्हाण यांनी यावेळी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दुसऱ्या पक्षातील उमेदवार भारतीय जनता पार्टीत स्वतःहून येत आहेत. ही उमेदवारांची पळवापळवी नाही. उमेदवारांना स्वतःच्या पक्षात घेण्याची परंपरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या वेळेपासून सुरू झाली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे अभ्यासू नेते यशवंतराव मोहिते यांना काँग्रेस पक्षाच्या घेऊन पक्ष वाढविण्याची परंपरा सुरू झाली. त्याचे मानसपुत्र शरद पवार यांनीही ही परंपरा आजतागायत चालू ठेवली आहे. त्यामुळे भाजपाची भूमिका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकास कार्यक्रम आवडला म्हणून इतर पक्षातील ज्येष्ठ भाजपात येत असतील तर त्यात वावगे काहीच नाही, असे मत भाजपाचे ज्येष्ठ प्रवक्ते व म्हाडा मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी व्यक्त केले.

मुंबई मराठी पत्रकार संघाने लोकसभा निवडणूक : २०१९, ही वार्तालाप मालिका आयोजित केली आहे. त्यात मधु चव्हाण बोलत होते. प्रारंभी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मधु चव्हाण यांनी मुंबईतील लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी यांनी देशात विकासाची कामे केली आहेत. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी प्रत्येक देशाबरोबर चांगले संबंध प्रस्थापित केल्याने पाकिस्तान आज एकटा पडला आहे. सन २००८ मध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईत ३०० हून अधिक निरपराध माणसांना मारले. त्यात आमचे आघाडीचे पोलीस अधिकारी हेमंत करकरे, विजय साळकर आणि अशोक कामटे मारले गेले. त्यावेळी तत्कालीन काँग्रेस सरकारने निषेधाचे पाकिस्तानला पत्र पाठविले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्काराला पूर्ण स्वातंत्र्य देऊन लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केला. पण दुर्दैव असं की, राहुल गांधी यांचे मार्गदर्शक सॅम पित्रोदा मोदी यांच्याकडे पुरावा मागत आहेत. इतर विरोधी पक्षही पुरावा मागत आहेत. परंतु जनमानसात याबाबत प्रचंड संताप निर्माण झाला असून त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून येईल, असेही मधु चव्हाण यांनी यावेळी सांगितले.”

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content