HomeArchiveआपल्याकडे हेमंतअप्पा तर...

आपल्याकडे हेमंतअप्पा तर पलीकडे फक्त गप्पा – उद्धव ठाकरे

Details
आपल्याकडे हेमंतअप्पा तर पलीकडे फक्त गप्पा – उद्धव ठाकरे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भगवी वज्रमूठ पाहिल्यावर आपल्याला टक्कर देण्यासाठी कोणी उभे राहील असे मला वाटत नाही. आपल्याकडे हेमंत आप्पा आहेत आणि पलीकडे फक्त गप्पा आहेत. देव, देश आणि धर्मासाठी आपण युती केली आहे. अपक्ष फक्त मते फोडण्यासाठी उभे आहेत. बाजारबुणगे हातामध्ये भगवा घेऊ शकणार नाहीत, असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी नाशिकमध्ये झालेल्या जाहीर सभेत केले.

शिवसेनाप्रमुखांना कशासाठी अटक करायला निघाले होता तुम्ही? शिवसेनाप्रमुखांना अटक करण्याची हिंमत कोणालाही नव्हती. देश अस्थिर होत होता म्हणून शिवसेनाप्रमुख स्वतः कोर्टात जाऊन हजर राहिले. १९९२ आणि १९९३ साली मुंबईला वाचण्याचा गुन्हा केला का त्यांनी? काँग्रेसवाले आपल्याला विचारत आहेत लाज वाटते का? 50 ते 60 वर्षे तुम्ही देशाला ओरबाडलं तेव्हा तुम्हाला लाज वाटली का? भाजप आणि आमच्यात मतभेद होते. ५० वर्षांपूर्वी अटल बिहारी वाजपेयी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे बीज पेरलं ते आज हिंदुत्व म्हणून उभे आहे. तो भगवा ध्वज आज विरोधकांना पाहवत नाही, असेही ते म्हणाले.

काँग्रेसवाल्यांचा पंतप्रधानपदासाठी एकामेकांना मध्ये वाद आहेत. बिनचेहऱ्याची ही आघाडी आहे. काही झालं तरी युतीचा पंतप्रधान नको हा विरोधकांचा प्रयत्न आहे. 2014 च्या आधी नेहमी घोटाळे. ए टू झेड घोटाळ्यांची यादी आहे. घोटाळ्यांमध्ये सुद्धा आदर्श. शेण घोटाळा, चारा घोटाळा, कोळसा घोटाळा, टू जी स्पेक्ट्रम घोटाळा. अशी घोटाळ्यांची यादी आहे. हे करताना तुम्हाला लाज वाटली नाही का, असा सवाल ठाकरे यांनी केला.

शरद पवार कधी आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला भेटले नाहीत. त्यांनी राहुल गांधी यांनादेखील दगा दिला होता. हे कालचे पोर, याला काय राजकारण कळतं, असे ते म्हणाले होते. मी एक वेळ तोंडाला काळे फासून हिमालयात निघून जाईन पण पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही, असे पवार म्हणाले होते. कुठे गेला हिमालय? कुठे गेले ते काळे तोंड, असा सवालही त्यांनी केला.

पाकिस्तान नकाशावर राहणार नाही – संजय राऊत

नरेंद्र मोदी जेव्हा पुन्हा पंतप्रधान होतील तेव्हा लाहोर आणि कराचीमध्ये सुद्धा राम मंदिर बांधू. पाकिस्तान नकाशावर राहणार नाही. आपल्या सर्वांना या देशाचे नेतृत्त्व नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये द्यायचे आहे. इथले गुंड या मातीमध्ये गाडायचे आहेत आणि हेमंत गोडसे यांना लोकसभेमध्ये पाठवायचे आहे, असे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले.

हेमंत गोडसे जमिनीवरचा माणूस – गिरीश महाजन

या सभेमध्ये महिलांची संख्या कौतुकास्पद आहे. हेमंत गोडसे साधा सरळ सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा आणि जमिनीवरचा माणूस आहे. समीर भुजबळ यांची जेलयात्रा आणि त्यांचे कारनामे हे जनतेला सांगण्याची गरज नाही. पाच वर्षांत बहुतांश योजनांचा लाभ नाशिककरांना मिळाला आहे. याचे एकमेव कारण हेमंत गोडसे, अशा शब्दांत नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

नदीजोड प्रकल्प राबवला – हेमंत गोडसे

आपण गेल्या पाच वर्षांपासून जनतेच्या सतत संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला आहे. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात काढला आहे. सिन्नरमध्ये पाणी उपलब्ध करून दिले आहे. रेल्वे आणि महामार्ग यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहू, असे हेमंत गोडसे म्हणाले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भगवी वज्रमूठ पाहिल्यावर आपल्याला टक्कर देण्यासाठी कोणी उभे राहील असे मला वाटत नाही. आपल्याकडे हेमंत आप्पा आहेत आणि पलीकडे फक्त गप्पा आहेत. देव, देश आणि धर्मासाठी आपण युती केली आहे. अपक्ष फक्त मते फोडण्यासाठी उभे आहेत. बाजारबुणगे हातामध्ये भगवा घेऊ शकणार नाहीत, असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी नाशिकमध्ये झालेल्या जाहीर सभेत केले.

शिवसेनाप्रमुखांना कशासाठी अटक करायला निघाले होता तुम्ही? शिवसेनाप्रमुखांना अटक करण्याची हिंमत कोणालाही नव्हती. देश अस्थिर होत होता म्हणून शिवसेनाप्रमुख स्वतः कोर्टात जाऊन हजर राहिले. १९९२ आणि १९९३ साली मुंबईला वाचण्याचा गुन्हा केला का त्यांनी? काँग्रेसवाले आपल्याला विचारत आहेत लाज वाटते का? 50 ते 60 वर्षे तुम्ही देशाला ओरबाडलं तेव्हा तुम्हाला लाज वाटली का? भाजप आणि आमच्यात मतभेद होते. ५० वर्षांपूर्वी अटल बिहारी वाजपेयी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे बीज पेरलं ते आज हिंदुत्व म्हणून उभे आहे. तो भगवा ध्वज आज विरोधकांना पाहवत नाही, असेही ते म्हणाले.

काँग्रेसवाल्यांचा पंतप्रधानपदासाठी एकामेकांना मध्ये वाद आहेत. बिनचेहऱ्याची ही आघाडी आहे. काही झालं तरी युतीचा पंतप्रधान नको हा विरोधकांचा प्रयत्न आहे. 2014 च्या आधी नेहमी घोटाळे. ए टू झेड घोटाळ्यांची यादी आहे. घोटाळ्यांमध्ये सुद्धा आदर्श. शेण घोटाळा, चारा घोटाळा, कोळसा घोटाळा, टू जी स्पेक्ट्रम घोटाळा. अशी घोटाळ्यांची यादी आहे. हे करताना तुम्हाला लाज वाटली नाही का, असा सवाल ठाकरे यांनी केला.

शरद पवार कधी आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला भेटले नाहीत. त्यांनी राहुल गांधी यांनादेखील दगा दिला होता. हे कालचे पोर, याला काय राजकारण कळतं, असे ते म्हणाले होते. मी एक वेळ तोंडाला काळे फासून हिमालयात निघून जाईन पण पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही, असे पवार म्हणाले होते. कुठे गेला हिमालय? कुठे गेले ते काळे तोंड, असा सवालही त्यांनी केला.

पाकिस्तान नकाशावर राहणार नाही – संजय राऊत

नरेंद्र मोदी जेव्हा पुन्हा पंतप्रधान होतील तेव्हा लाहोर आणि कराचीमध्ये सुद्धा राम मंदिर बांधू. पाकिस्तान नकाशावर राहणार नाही. आपल्या सर्वांना या देशाचे नेतृत्त्व नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये द्यायचे आहे. इथले गुंड या मातीमध्ये गाडायचे आहेत आणि हेमंत गोडसे यांना लोकसभेमध्ये पाठवायचे आहे, असे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले.

हेमंत गोडसे जमिनीवरचा माणूस – गिरीश महाजन

या सभेमध्ये महिलांची संख्या कौतुकास्पद आहे. हेमंत गोडसे साधा सरळ सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा आणि जमिनीवरचा माणूस आहे. समीर भुजबळ यांची जेलयात्रा आणि त्यांचे कारनामे हे जनतेला सांगण्याची गरज नाही. पाच वर्षांत बहुतांश योजनांचा लाभ नाशिककरांना मिळाला आहे. याचे एकमेव कारण हेमंत गोडसे, अशा शब्दांत नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

नदीजोड प्रकल्प राबवला – हेमंत गोडसे

आपण गेल्या पाच वर्षांपासून जनतेच्या सतत संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला आहे. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात काढला आहे. सिन्नरमध्ये पाणी उपलब्ध करून दिले आहे. रेल्वे आणि महामार्ग यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहू, असे हेमंत गोडसे म्हणाले.”

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content