HomeArchiveअंधेरीच्या गोखले पुलाचे...

अंधेरीच्या गोखले पुलाचे काम अखेर पूर्ण!

Details
अंधेरीच्या गोखले पुलाचे काम अखेर पूर्ण!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईत 1960च्या सुमारास बांधलेला आणि रेल्वे ट्रॅकवरून जाणारा अंधेरी पश्चिम व पूर्वेला जोडणारा व थेट पश्चिम द्रूतगती महामार्गापर्यंत जाणारा दुवा म्हणजे अंधेरीचा गोखले पूल. रोज या पुलावरून सुमारे 2.50 ते 3 लाख वाहने ये-जा करतात. गेल्या वर्षी 2 जुलैला सकाळी 8च्या सुमारास पावसात या पुलाचा दक्षिणेकडचा पदपथाचा काही भाग पश्चिम रेल्वेच्या ट्रॅकवरच कोसळल्याने मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी पश्चिम रेल्वेची वाहतूक त्यादिवशी रात्री उशिरापर्यंत बंदच होती. तसेच गोखले पुलाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने आणि पुलाचा काही भाग वाहतुकीस खुला करण्यात आला होता. परिणामी हा पूल अरूंद झाल्याने गेले वर्षभर अंधेरीकरांना व वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. हा पूल कोसळल्यानंतर या पुलाची जबाबदारी महापालिकेची का रेल्वेची यावरून या दोघांमध्ये कलगीतुरा चांगलाच रंगला होता.

 

अंधेरीच्या गोखले पुलाचे काम अखेर पूर्ण झाल्याने गेल्या रविवार दि. 16च्या सकाळपासून हा पूल अखेरीस वाहतूकीस खुला करण्यात आला. या पुलाच्या कामास सुमारे 3.34 कोटी रूपये खर्च आला आहे. आयआयटी पवईने या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट केले असून या पुलाचा दक्षिणेकडच्या पदपथाचा काही भाग कोसळल्याने येथील पुलाच्या दुरूस्तीचे काम गेल्या जुलैपासून सुरू करण्यात आले होते. पालिका व रेल्वे प्रशासन यांच्या समन्वयातून या पुलाचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले. अखेर हा पूल वाहतुकीस खुला झाल्याने येथील काही प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झाली असा विश्वास पालिकेच्या के पश्चिम विभागाचे साहाय्यक पालिका आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी व्यक्त केला.

याप्रकरणी अंधेरी पश्चिम येथील भाजपा आमदार अमित साटम यांनी सांगितले की, सदर घटना घडल्यापासून ते या पुलाची यशस्वी व मजबूत दुरूस्ती होण्यासाठी पालिका, रेल्वे यांच्याशी पाठपुरावा करत होते. मुंबईतील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली होती. पावसाळा तोंडावर आला असताना अखेरीस हा पूल वाहतुकीस खुला झाल्याने अंधेरीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईत 1960च्या सुमारास बांधलेला आणि रेल्वे ट्रॅकवरून जाणारा अंधेरी पश्चिम व पूर्वेला जोडणारा व थेट पश्चिम द्रूतगती महामार्गापर्यंत जाणारा दुवा म्हणजे अंधेरीचा गोखले पूल. रोज या पुलावरून सुमारे 2.50 ते 3 लाख वाहने ये-जा करतात. गेल्या वर्षी 2 जुलैला सकाळी 8च्या सुमारास पावसात या पुलाचा दक्षिणेकडचा पदपथाचा काही भाग पश्चिम रेल्वेच्या ट्रॅकवरच कोसळल्याने मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी पश्चिम रेल्वेची वाहतूक त्यादिवशी रात्री उशिरापर्यंत बंदच होती. तसेच गोखले पुलाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने आणि पुलाचा काही भाग वाहतुकीस खुला करण्यात आला होता. परिणामी हा पूल अरूंद झाल्याने गेले वर्षभर अंधेरीकरांना व वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. हा पूल कोसळल्यानंतर या पुलाची जबाबदारी महापालिकेची का रेल्वेची यावरून या दोघांमध्ये कलगीतुरा चांगलाच रंगला होता.

 

अंधेरीच्या गोखले पुलाचे काम अखेर पूर्ण झाल्याने गेल्या रविवार दि. 16च्या सकाळपासून हा पूल अखेरीस वाहतूकीस खुला करण्यात आला. या पुलाच्या कामास सुमारे 3.34 कोटी रूपये खर्च आला आहे. आयआयटी पवईने या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट केले असून या पुलाचा दक्षिणेकडच्या पदपथाचा काही भाग कोसळल्याने येथील पुलाच्या दुरूस्तीचे काम गेल्या जुलैपासून सुरू करण्यात आले होते. पालिका व रेल्वे प्रशासन यांच्या समन्वयातून या पुलाचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले. अखेर हा पूल वाहतुकीस खुला झाल्याने येथील काही प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झाली असा विश्वास पालिकेच्या के पश्चिम विभागाचे साहाय्यक पालिका आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी व्यक्त केला.

याप्रकरणी अंधेरी पश्चिम येथील भाजपा आमदार अमित साटम यांनी सांगितले की, सदर घटना घडल्यापासून ते या पुलाची यशस्वी व मजबूत दुरूस्ती होण्यासाठी पालिका, रेल्वे यांच्याशी पाठपुरावा करत होते. मुंबईतील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली होती. पावसाळा तोंडावर आला असताना अखेरीस हा पूल वाहतुकीस खुला झाल्याने अंधेरीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.”
 

Continue reading

ऊर्जा प्रकल्पांच्या संरक्षणासाठी इराणमध्ये ‘मानवी साखळी’!

पश्चिम आशियातील युद्ध आता एका निर्णायक आणि भयानक वळणावर येऊन ठेपले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या कठोर इशाऱ्यानंतर, इराणने आपल्या देशातील वीजनिर्मिती केंद्र आणि पायाभूत सुविधा वाचवण्यासाठी अनोखी शस्त्रास्त्रे वापरण्याऐवजी 'मानवी ढाल' (ह्यूमन शिल्ड) तयार करण्याचा...

खुर्चीची मस्ती डोक्यात जाऊ देऊ नका!

आपल्या रोकठोक आणि निर्भीड स्वभावासाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. "सत्ता आज आहे, उद्या नसेल; पण खुर्चीची मस्ती कधीही डोक्यात जाऊ देऊ नका," अशा शब्दांत गडकरींनी नेत्यांना खडेबोल...

‘छोटू गॅस’ सिलिंडरच्या कोट्यात दुप्पट वाढ

देशातील विविध राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या स्थलांतरित मजुरांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ५ किलो वजनाच्या 'फ्री ट्रेड एलपीजी' (एफटीएल) सिलिंडरच्या दैनंदिन वाटप कोट्यात सरकारने आता दुप्पट वाढ केली आहे. "छोटू गॅस" म्हणून या सिलिंडरची कष्टकरी...
Skip to content