Tuesday, February 4, 2025
Homeटॉप स्टोरीराजकीय अजेंडा रेटण्यासाठी...

राजकीय अजेंडा रेटण्यासाठी तुम्हाला खासदार केलेले नाही!

देशातील जनतेने सर्व खासदारांना स्वतःच्या राजकीय पक्षांचा कार्यक्रम (अजेंडा) रेटण्यासाठी नाही, तर या देशाची सेवा करण्यासाठी जनादेश दिला आहे. हे सभागृह राजकीय पक्षांसाठी नाही, तर हे सभागृह देशासाठी आहे. ही संसद खासदारांची सेवा करण्यासाठी नसून देशभरातील 140 कोटी नागरिकांची सेवा करण्यासाठी आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सांगितले.

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि निवेदन केले. त्यावेळी ते बोलत होते.

तब्बल 60 वर्षांच्या कालखंडानंतर पहिल्यांदाच एखादे सरकार सलग तिसऱ्या कार्यकाळासाठी निवडून आले आहे. एखाद्या सरकारने आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प सादर करणे ही एक अभूतपूर्व घटना आहे. हा अर्थसंकल्प आपल्या नेतृत्त्वातील सध्याच्या सरकारच्या पुढच्या पाच वर्षांच्या वाटचालीची दिशा ठरवेल तसेच 2047 सालापर्यंत विकसित भारत घडवण्याच्या स्वप्नाचा भक्कम पाया रचेल. गेली सलग तीन वर्षे भारताचा विकास दर सुमारे ८ टक्के राहिला आहे. सकारात्मक दृष्टीकोन, गुंतवणूक आणि केंद्र सरकारची कामगिरीमुळे यामुळेच आज मोठ्या प्रमाणात आपल्यासमोर संधी उपलब्ध असल्याची स्थिती निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले.

खासदार

राजकीय पक्षांच्या परस्परांमध्ये होणाऱ्या सर्व लढाया आता संपल्या आहेत. देशातील नागरिकांनी सरकारही निवडून दिले आहे. आता सर्व खासदारांनी एकत्र येत पुढची पाच वर्षे देशासाठी लढावे. सर्व राजकीय पक्षांनी पुढची साडेचार वर्षे आपापल्या संघटनांपुरता विचार करण्याच्या पुढे जात संसदेसारख्या प्रतिष्ठित आणि सर्वोच्च व्यासपीठाचा वापर करावा. आता आपण सगळेच जानेवारी 2029मध्ये निवडणुकीच्या रिगणात लढण्यासाठी उतरू या. मात्र तोपर्यंत आपला देश, इथली गरीब जनता, शेतकरी, महिला आणि युवकांना आपण प्राधान्य देऊ या असे आवाहन मोदी यांनी केले.

काही राजकीय पक्षांचा दृष्टिकोन नकारात्मक आहे. त्यामुळे अनेक खासदारांना आपले विचार मांडण्याची आणि त्यांच्या मतदारसंघाशी संबंधित मुद्दे मांडण्याची संधी मिळू शकली नाही. सर्व पक्षांनी सर्व सदस्यांना, विशेषत: पहिल्यांदाच निवडून आलेल्या सदस्यांना आपले मत मांडण्याची संधी द्यायला हवी. जनतेने निवडून आणलेल्या सरकारला दडपण्याचा तसेच संसदेतील पंतप्रधानांच्या भाषणही दडपून टाकण्याचा प्रयत्न संसेदत झाला. लोकशाही परंपरेत अशा वर्तणुकीला स्थान नाही, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.

Continue reading

श्री उद्यानगणेश शालेय कॅरम स्पर्धेत ध्रुव भालेराव विजेता

मुंबईतल्या श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री उद्यानगणेश मंदिर चषक विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेत अँटोनिओ डिसिल्व्हा हायस्कूल-दादरचा राष्ट्रीय ख्यातीचा सबज्युनियर कॅरमपटू ध्रुव भालेरावने विजेतेपद पटकाविले. मोक्याच्या क्षणी अचूक फटके साधत ध्रुव...

मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले ‘सुनबाई लय भारी’चे पोस्टर लाँच

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते "सुनबाई लय भारी" या चित्रपटाचं पोस्टर नुकतेच लाँच केले. महिला सबलीकरणावर आधारित गोवर्धन दोलताडे निर्मित व शिवाजी दोलताडे दिग्दर्शित हा नवा चित्रपट आहे. मार्च महिन्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचं चित्रिकरण सुरू करण्यात येणार आहे. सोनाई...

जॅकी श्रॉफ, श्वेता बच्चन आदींनी लुटला पुष्पोत्सवाचा आनंद!

मुंबई महापालिकेचा उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (पूर्वीच्या राणीच्या बागेत) ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पुष्पोत्सवाला साधारण दीड लाख मुंबईकरांनी भेट दिली. यामध्ये अभिनेता जॅकी...
Skip to content