Homeचिट चॅटपैलवान वसंतराव पाटील...

पैलवान वसंतराव पाटील कोल्हापुरात सन्मानित

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने, मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा भाईंदरचे वस्ताद वसंतराव पाटील यांना “भारत गौरव सन्मान राष्ट्रीय पुरस्कार २०२४” पुरस्कार स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नुकताच  प्रदान करण्यात आला.

कुस्ती क्षेत्रात अनेक वर्षांपासून केलेल्या कार्याबद्दल भारत गौरव सन्मान समारोह समिती दिल्ली, यांच्याकडून हा पुरस्कार राजेंद्र पाटील – कारगिल युद्ध, भारतीय सेना,  संजय पाटील – राज्य सचिव, शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, संजय मालवेकर – सेवानिवृत्त भारतीय सेना दल, डॉ. स्मिता गिरी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

हा कार्यक्रम कोल्हापूर इंजीनियरिंग असोसिएशन राणा समिती सभागृह, उद्धमनगर, कोल्हापूर येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन अनिल माळवी (सचिव ऑर्गनायझिंग कमिटी) यांनी केले होते. यावेळी  देशभक्तीपर गीतांचा सुंदर कार्यक्रमदेखील सादर करण्यात आला.

Continue reading

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...
Skip to content