Homeडेली पल्सवरूण सरदेसाईंची संभाव्य...

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली आहे.

विलेपार्ल्यात राहणारे यांचे पक्षातले काम काही नाही. आदित्यकृपेने नेते म्हणून युवा सेनेतली त्यांची कारकीर्द. प्रचंड गुर्मी.. कुणाशी साधं बोलताही येत नाही.. अरेरावी संपूर्ण अंगात भिनलेली.. शिवाय तेथे शिवसेना नेते व विभागप्रमुख अनिल परब यांचाही तोच मतदारसंघ आहे. ते वरुण यांच्या उमेदवारीला उघड विरोध करू शकत नाहीत. परंतु ते काही कमी काडीबहाद्दर नाहीत. शिवाय त्यांच्याविरुद्धही असंतोष आहेच. कारण, नेतेपदी निवड झाल्यानंतर आता तब्ब्ल चार वर्षे झाली तरी त्यांना विभागप्रमुखपदाचा मोह आवरत नाही. फेविकॉलसारखे ते त्या पदाला चिकटून बसलेले आहेत, असेही या भागाातल्या शिवसैनिकांमध्ये बोलले जात आहे.

खरंतर काँग्रेसचा हा मतदारसंघ. झिशान सिद्दिकी तेथील आमदार. त्यांच्यावर प्रचंड दबाब टाकून त्यांना येथून माघार घेण्यासाठी ठाकरे गट प्रयत्नशील असल्याचे समजते. परंतु आता बाबा सिद्दिकींच्या हत्त्येमुळे समीकरण बदलले आहे. कुणीही मुस्लिम उमेदवार दिल्यास सहानुभूतीमुळे निवडून येईल कारण येथे मुस्लिम मतदारांची संख्या लक्षात घेण्याजोगी आहे. जुन्या शिवसैनिकांना बोलावून वरुणबरोबर या मतदारसंघात फिरण्याचे फर्मान मातोश्रीने काढल्याचे समजते. बाळा सावंत व श्रीकांत सरमळकर यांचा हा बालेकिल्ला होता. वरुणचे नाव जाहीर झाल्यास एकनाथ शिंदे यांचे काम सोपे होईल, असेही येथील लोकांमध्ये बोलले जाते.

Continue reading

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...
Skip to content