Homeटॉप स्टोरीलोकसभा सभापतीपदी ओम...

लोकसभा सभापतीपदी ओम बिर्ला बिनविरोध?

लोकसभेच्या सभापतीसाठी आज सकाळी ११ वाजता निवडणूक होत असली तरी प्रत्यक्षात ही निवडणूक बिनविरोध होण्याचीच शक्यता जास्त आहे. या निवडणुकीत ऐनवेळी विरोधी पक्षांचे म्हणजेच काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीचे उमेदवार काहीतरी कारण उभे करून माघार घेतील आणि निवडणूक बिनविरोध करतील किंवा विरोधक निवडणुकीवर बहिष्कार घालून निवडणूक एकतर्फी करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक झालीच तर ती तब्बल २६ वर्षांनंतर होईल. निवडणूक झाली किंवा नाही एनडीएचे उमेदवार ओम बिर्लाच सभापती होतील, हे निश्चित.

सभापतीपदासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी याकरीता गेले दोन दिवस प्रयत्न सुरू होते. मात्र, लोकसभेच्या उपसभापतीसाठी विरोधकांनी आपला उमेदवार असावा असा हट्ट धरला. सत्ताधाऱ्यांकडून तशी तयारीही दाखवण्यात आली. परंतु विरोधकांनी सरकारी पक्षांवर अविश्वास दाखवत उपसभापतीपदाची निवडणूक आधी घेण्याचा आग्रह धरला जो सत्ताधाऱ्यांकडून धुडकावण्यात आला. पर्यायाने निवडणूक बिनविरोध करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न फसला आणि सत्ताधाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ सदस्य व मावळत्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पुन्हा सभापतीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले. एनडीएच्या वतीने बिर्ला यांनी काल आपले नामांकनही दाखल केले. त्यापाठोपाठ काँग्रेसकडून के. सुरेश यांनी सभापतीपदाकरीता आपले नामांकन दाखल केले. विरोधी इंडिया आघाडीकडून ते सभापतीपदाचे उमेदवार आहेत.

६१ वर्षीय ओम बिर्ला राजस्थानच्या कोटा मतदारसंघाचे खासदार आहेत. याच भागातून ते २००३ सालापासून २०१४ सालापर्यंत राजस्थान विधानसभेचे भाजपाचे सदस्य होते. के. सुरेश तथा कोडीकुन्निल सुरेश केरळ काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष आहेत. काँग्रेसकडून थिरूवअनंतपूरम लोकसभा मतदारसंघातून ते १९८९ ते १९९७ आणि १९९९ ते २००४ या काळात ते लोकसभेचे सदस्य होते. आताही ते याच मतदारसंघाचे लोकसभेचे प्रतिनिधीत्व करतात.

भाजपाप्रणित एनडीएचे २९३ सदस्य असून काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीचे २३७ सदस्य आहेत. इतर व अपक्ष असे १३ सदस्य आहेत. लोकसभेत सध्या अपक्षांच्या पाठिंब्यासह सत्ताधारी एनडीएला ३०२ सदस्यांचा पाठिंबा आहे. सभापतीपदासाठी मतदान झाले तर सत्ताधाऱ्यांकडून विरोधी इंडिया आघाडीची मते फोडण्याचा सत्ताधारी पूर्ण प्रयत्न करेल. यात जर त्यांना यश आले तर या लोकसभेच्या पुढच्या पाच वर्षांत विरोधी आघाडी विस्कळीतच राहील आणि असे चित्र निर्माण होऊ द्यायचे नसेल तर झाकली मूठ सव्वा लाखाची.. याप्रमाणे विरोधक ऐनवेळी निवडणूक बिनविरोध करू शकतात, असे जाणकारांना वाटते.

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content