Homeचिट चॅटश्री गणेश आखाड्याला...

श्री गणेश आखाड्याला भक्कम पाठिंबा देऊ!

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्याला भविष्यातदेखील भक्कम पाठिंबा देऊ असे आश्वासन पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले.

आखाड्याच्या नवीन मॅटच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. दोन हजार साली नाईक यांच्या हस्ते या आखाड्याचेदेखील उद्घाटन करण्यात आले होते. सध्याचे आखाड्याचे विस्तृत स्वरुप बघून नाईक यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच २४ वर्षांत आखाड्याने या खेळात केलेल्या प्रगतीचेदेखील त्यांनी कौतुक केले. यावेळी मीरा भाईंदर

कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष  मिलिंद लिमये यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व बजरंगबलीची मूर्ती प्रदान करून  गणेश नाईक यांचा खास सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद लिमये यांनी केले. आखाड्याला २५ वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने नाईक यांच्या अध्यक्षतेखाली भव्य कुस्ती मैदान भरवण्याची मागणी त्यांनी यावेळी  केली.

यावेळी ओमप्रकाश गरोडिया, नारायण पोद्दार, अजित पाटील, प्रकाश दुबोले, विद्या रेवणकर आदि प्रमुख मंडळीदेखील उपस्थित होती. वस्ताद वसंतराव पाटील यांना प्रतिष्ठा फाउंडेशन सांगलीच्या वतीने दिला जाणारा “राज्यस्तरीय प्रतिष्ठा क्रीडारत्न पुरस्कार २०२५” मिळाल्याबद्दल गणेश नाईक यांच्या हस्ते त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. विशाल माटेकर, विशाल जाधव, सूरज माने, मनीषा शेलार, सुदीक्षा जैस्वर, डॉली गुप्ता, मनस्वी राऊत, ओम जाधव या कुस्तीपटूंचा सत्कारदेखील नाईक यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन करण्यात आला. पैलवानांना भेटवस्तू श्री साई ज्वेलर्सचे मालक सुधाकर गायकवाड यांनी दिल्या. सदर कार्यक्रमाचे  समालोचन वरिष्ठ शिक्षक बलराज बागल यांनी केले.

Continue reading

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...
Skip to content