Homeन्यूज अँड व्ह्यूजघोडबंदर रस्त्यावरील दुर्दैवाचे...

घोडबंदर रस्त्यावरील दुर्दैवाचे दशावतार संपणार तरी कधी?

ठाण्याच्या घोडबंदर रस्त्यावरील गायमुख घाटात आठवड्यातील सुमारे पाच दिवस वाहतूककोंडी-वाहतूककोंडी हा जीवघेणा खेळ सुरूच असतो. ना ठाणे महापालिकेला फिकीर, ना राज्य सरकारला… या दोघांमध्ये पीसला जातो तो नोकरदार, विद्यार्थीवर्ग, महिला, लहान मुले व लाखो कामगार… ज्यांचे हातावर पोट आहे अशी माणसे तर वाहतूककोंडीचा अंदाज घेऊन घराबाहेर न पडणेच पसंत करतात. अशा या वाहतूककोंडी हा ‘नीचे’चा ग्रह असलेल्या गायमुख घाटात परवा रात्रीपासून सुमारे पाच ब्रेकडाऊन पाहिले. हे कमी होते म्हणूनच की काय छायाचित्रात दिसणारा ‘बशा’ टँकरने संपूर्ण दिवसाचीच बरबादी कारून टाकली. या टँकरमध्ये २० टन कच्चे तेल होते. दुर्दैव इथेच संपलेले नव्हते. या टँकरचे सहाही पाईप्स जॅम झाले होते. त्यामुळे हा टँकर रिकामा करून बाजूला करण्याच्या प्रयत्नांवर पाणी पडले! पोलिसांच्या वाहतूक खात्याचे अधिकारी व हवालदारांचा या महाप्रचंड कोंडीने अक्षरशः घामटा काढला! काही अधिकारी तर घरच्या वेशात घटनास्थळी उपस्थित राहून मार्गदर्शन करत होते. रात्री उशिरा हा बशा टँकर क्रेनच्या सहाय्याने काहीसा बाजूला करून एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात वाहतूक पोलिसांना यश आले.

गेल्या काही महिन्यांपासून गायमुख घाटातील वाहतूककोंडीची ठाणेकराना नको इतकी सवय झालेली आहे. (न होऊन कसे चालेल? पापी पेट का सवाल जो है..) या टँकरसारखीच अनेक भंगार अवजड वाहने या रस्त्यावरून जात असतात. ना त्यांची देखभाल केलेली असते, ना त्यांचा ड्रायव्हर धड बोलूही शकत असतो. सर्व रामभरोसे असतं ना सरकारची भीती, ना कायद्याची भीती.. फक्त वाटेल तशी गाडी हाकता येते इतकेच काय ते पाहिले जाते. खरंतर अशा भंगार वाहनांना शहरात प्रवेशच देऊ नये. शहराच्या आरोग्याची नासाडी करणारी वाहने इथे नकोतच! ठाण्याची ‘आपली’ माणसे म्हणवणारी राजकीय मंडळी काही ‘बाणा’ दाखवणार आहेत की नाही? की आपापसातच ‘हमरीतुमरी’वर संतुष्ट होणार आहेत.

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

वर्णमुद्राचे ‘मोहोळ’- कौशल्य सारे रचनेत आहे!

ज्येष्ठ पत्रकार व संपादक प्रवीण बर्दापूरकर यांच्या कसदार लेखणीतून कागदावर उतरलेले 'मोहोळ' हे पुस्तक दोन दिवसांपूर्वीच पोस्टाने मिळाले. प्रवीणजींना आपल्या वृत्तपत्रीय कारकिर्दीत ज्या व्यक्ती भेटल्या आणि 'भिडल्या' त्यांचे व्यक्तीचित्रण या पुस्तकात रेखाटलेले आहे. 'मोहोळ' वाचताना काही माणसांच्या आयुष्यात आपण...

अंबरीश मित्रा, दुर्गाबाईंच्या नावाने ‘हुंदका’ काढलास म्हणून….

अंबरीश मिश्रा, ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, अभ्यासू माणूस!आतापर्यंत कधीच कोणत्या वादात पडला नाही, पडण्याची गरजही नाही. माझ्या माहितीप्रमाणे तो काही काळ करंजिया यांच्या 'डेली' या इंग्रजी दैनिकात पत्रकारिता करत होता त्यावेळेपासून ओळख व मैत्री आहे. तो मुंबई महापालिकेत यायचा...

बांगलादेशींना हाकलायचंय? मग, वंदे भारतने दिल्ली गाठा…

सध्या मुंबई विभागीय विकास प्राधिकरणात म्हणेच MMRA मध्ये हो, बिचकून जाऊ नका; बांगलादेशी बेकायदा नागरिकांच्या विषयाला नको इतके महत्त्व दिले जात असल्याचे वाटत आहे. नको इतके इतक्यासाठीच म्हटले की, जी मंडळी बांगलादेशींविरुद्ध आवाज उठवत आहेत त्यांचेच सरकार केंद्रात व...
Skip to content