Homeन्यूज अँड व्ह्यूजघोडबंदर रस्त्यावरील दुर्दैवाचे...

घोडबंदर रस्त्यावरील दुर्दैवाचे दशावतार संपणार तरी कधी?

ठाण्याच्या घोडबंदर रस्त्यावरील गायमुख घाटात आठवड्यातील सुमारे पाच दिवस वाहतूककोंडी-वाहतूककोंडी हा जीवघेणा खेळ सुरूच असतो. ना ठाणे महापालिकेला फिकीर, ना राज्य सरकारला… या दोघांमध्ये पीसला जातो तो नोकरदार, विद्यार्थीवर्ग, महिला, लहान मुले व लाखो कामगार… ज्यांचे हातावर पोट आहे अशी माणसे तर वाहतूककोंडीचा अंदाज घेऊन घराबाहेर न पडणेच पसंत करतात. अशा या वाहतूककोंडी हा ‘नीचे’चा ग्रह असलेल्या गायमुख घाटात परवा रात्रीपासून सुमारे पाच ब्रेकडाऊन पाहिले. हे कमी होते म्हणूनच की काय छायाचित्रात दिसणारा ‘बशा’ टँकरने संपूर्ण दिवसाचीच बरबादी कारून टाकली. या टँकरमध्ये २० टन कच्चे तेल होते. दुर्दैव इथेच संपलेले नव्हते. या टँकरचे सहाही पाईप्स जॅम झाले होते. त्यामुळे हा टँकर रिकामा करून बाजूला करण्याच्या प्रयत्नांवर पाणी पडले! पोलिसांच्या वाहतूक खात्याचे अधिकारी व हवालदारांचा या महाप्रचंड कोंडीने अक्षरशः घामटा काढला! काही अधिकारी तर घरच्या वेशात घटनास्थळी उपस्थित राहून मार्गदर्शन करत होते. रात्री उशिरा हा बशा टँकर क्रेनच्या सहाय्याने काहीसा बाजूला करून एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात वाहतूक पोलिसांना यश आले.

गेल्या काही महिन्यांपासून गायमुख घाटातील वाहतूककोंडीची ठाणेकराना नको इतकी सवय झालेली आहे. (न होऊन कसे चालेल? पापी पेट का सवाल जो है..) या टँकरसारखीच अनेक भंगार अवजड वाहने या रस्त्यावरून जात असतात. ना त्यांची देखभाल केलेली असते, ना त्यांचा ड्रायव्हर धड बोलूही शकत असतो. सर्व रामभरोसे असतं ना सरकारची भीती, ना कायद्याची भीती.. फक्त वाटेल तशी गाडी हाकता येते इतकेच काय ते पाहिले जाते. खरंतर अशा भंगार वाहनांना शहरात प्रवेशच देऊ नये. शहराच्या आरोग्याची नासाडी करणारी वाहने इथे नकोतच! ठाण्याची ‘आपली’ माणसे म्हणवणारी राजकीय मंडळी काही ‘बाणा’ दाखवणार आहेत की नाही? की आपापसातच ‘हमरीतुमरी’वर संतुष्ट होणार आहेत.

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

मोदीजी.. हे बाबू आपले मान्य करतील?

दोनच दिवसांपूर्वी दिल्लीत एका व्याख्यानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'इंग्रजाळलेली' शिक्षणपद्धती येत्या दहा वर्षांत संपूर्णपणे गाडून टाका, असे आवाहन विद्वानांना व समाजाला केले आहे. इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूहातर्फे आयोजित केलेल्या रामनाथ गोयंका स्मृती व्याख्यानात पंतप्रधान बोलत होते. समाजमनावर व शिक्षणक्षेत्रात...

ठाण्यात रात्री-बेरात्री फटाके वाजवताय? सावधान!

ठाणे राज्यातील असे शहर आहे की, या शहरात दिवाळी असो-नसो बाराही महिने रात्री-अपरात्री फटाके वाजतच असतात. गेल्या काही दिवसांतील मध्यरात्रीनंतरच्या फटाके वाजवण्याच्या प्रकाराची पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी गांभीर्याने दखल घेतली असून यापुढे फटाके आणि बँडबाजा रात्री दहा वाजल्यानंतर...

बिहारमध्ये विरोधकांचे ‘जंगलराज’ तर सत्ताधाऱ्यांचे काय ‘मंगलराज’?

"Criticism may not agreeable but its necessary. It fulfils the same function as pain in the human body. It calls attention to an unhealthy state of things" असंच काहीस राजकारणात सत्तारूढ पक्ष व विरोधी पक्ष यांचे नाते असावे, असं...
Skip to content