Homeबॅक पेजआदित्य ठाकरेंना संपवणारा...

आदित्य ठाकरेंना संपवणारा शकुनी मामा वरूण सरदेसाई!

जसे उद्धव ठाकरेंना घरी बसवण्याच्या प्रक्रियेत शकुनीमामाची भूमिका संजय राजाराम राऊत यांनी वठवली आहे तशीच भूमिका वरूण सरदेसाई आदित्य ठाकरेंच्या राजकीय आयुष्यात वठवित आहेत. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना संपवले. आता वरुण सरदेसाई आदित्य ठाकरेंना संपवणार, असा दावा भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला.

काल रात्रीच समजले की, आदित्य ठाकरेंचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय, त्यांचे लाडके राहुल कनाल उद्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. हा त्यांच्यासाठी मोठा वैयक्तिक तसेच राजकीय  धक्का आहे. यांना सर्वस्वी वरूण सरदेसाई जबाबदार आहेत. वरूण सरदेसाईंमुळेच आदित्य ठाकरेंजवळ कोणी उरले नाही. कोविड घोटाळ्यात वरूण सरदेसाईंचे नाव पुढे येऊ शकते. त्या काळात अनेक टेंडर देण्यात हे सरकारी भाचे म्हणून ओळखले जाणारे वरूण सरदेसाई आघाडीवर होते, असेही ते म्हणाले.

वरूण

वरूण सरदेसाईदेखिल भाजपा किंवा शिवसेनेत जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी दिल्ली, नागपूर… कुठे कुठे बैठका झाल्या हे सांगू का? उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना कायमचे रिटायर करण्याचे काम संजय राऊत व वरुण सरदेसाई करत आहेत, असेही राणे म्हणाले.

आज स्वाभिमानाची वर्षपूर्ती आहे. २०१९ला बाळासाहेबांचे विचार विकून काँग्रेस आणि  राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार स्थापन झाले होते. पण ५० योद्धे सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या विचारांना न्याय दिला. मागील अडीच वर्षात रखडलेली सगळी कामे करून त्यांनी गतिमान सरकार स्थापन केले आहे, असेही नितेश राणे म्हणाले.

वरूण

संजय राऊत म्हणाले की शरद पवार समजायला भाजपाला १०० वर्षे लागतील. आम्हाला जर १०० वर्षे लागत असतील तर त्यांचे मालक उद्धव ठाकरे यांना २०० वर्षे लागतील. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचे चॉकलेट देऊन घरी कोणी बसवले? गुगली नेमका कोणाला टाकला आणि सिक्सर कोणाच्या गोलंदाजीवर टाकला?, असा सवालही त्यांनी केला.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content