Homeचिट चॅट१८ फेब्रुवारीपासून अंडर...

१८ फेब्रुवारीपासून अंडर आर्मर चंदिगढ फास्ट!

भारतात धावण्याच्या क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी अंडर आर्मर चंदिगढ फास्ट मॅरेथॉन, हा क्रांतिकारी उपक्रम सुरु करण्यात आला आहे. ब्रँडेड ऍथलेटिक परफॉर्मन्स ऍपेरल, फूटवेयर आणि ऍक्सेसरीजचे आघाडीचे इन्व्हेंटर, मार्केटर आणि डिस्ट्रिब्युटर अंडर आर्मर यांनी अतिशय अभिमानाने सुरू केलेला हा उपक्रम फक्त पात्र स्पर्धकांसाठीच असल्याने अनोखा आहे. या स्पर्धेमध्ये पात्र ठरल्यानंतरच भाग घेता येऊ शकेल. अप्रतिम पायाभूत सोयीसुविधा, अनुकूल हवामान आणि सरकारकडून दिले जाणारे प्रोत्साहन यासाठी नावाजले जाणारे शहर चंदिगढमध्ये १८ फेब्रुवारी २०२४ रोजी याची सुरुवात होईल.   

धावण्याची विशेष आवड असणारे अनेक लोक न्यूयॉर्क, शिकागो, बॉस्टन, बर्लिन, टोकियो आणि लंडन या सहा वर्ल्ड मेजर मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यासाठी जगभर प्रवास करताना दिसतात. पण या प्रतिष्ठित मॅरेथॉनमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी इतर प्रमाणित रेसेसमध्ये पात्रता मिळवलेली असणे आवश्यक असते. भारतीयांना ही संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

धावण्याशी संबंधित तंत्रज्ञानाची प्रीमियम कंपनी इंडिया रनिंगचे रेस आयोजक व सीईओ विकास सिंग यांनी सांगितले की, अंडर आर्मर चंदिगढ फास्ट मॅरेथॉनमध्ये फक्त कामगिरीवर भर दिला जातो. लांब पल्ल्याच्या धावपटूंना आवश्यक असलेले प्रत्येक साहाय्य देण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे. उत्कृष्टतेप्रती आमची वचनबद्धता आणि अंडर आर्मरकडून मिळणारा पाठिंबा यांच्यासह आम्ही ही मॅरेथॉन जगातील प्रतिष्ठित वर्ल्ड मेजर मॅरेथॉनसाठी प्रीमियर क्वालिफायर बनवू इच्छितो. फक्त भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया-पॅसिफिक क्षेत्रात येत्या वर्षात हिची ख्याती निर्माण व्हावी हा आमचा उद्देश आहे.

अंडरडॉग ऍथलेटिक्सचे मॅनेजिंग डायरेक्टर (भारतामध्ये अंडर आर्मरचे एक्सक्लुसिव्ह लायसेन्सी आणि वितरक) तुषार गोकुळदास यांनी सांगितले की, अंडर आर्मर चंदिगढ फास्ट मॅरेथॉन हे क्षितिजे विस्तारून उत्कृष्टतेचा ध्यास धरून प्रयत्न करण्याचे, अंडर आर्मरला अनुरूप मूल्यांचे प्रतीक आहे. धावपटूंना त्यांची सर्वोत्तम कामगिरी बजावता यावी यासाठी सक्षम बनवणे आमचे उद्दिष्ट असून, अंडर आर्मर चंदिगढ फास्ट मॅरेथॉन ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सुसज्ज आहे. या रेसचा फक्त भारतातच नव्हे तर जगभरात सखोल प्रभाव घडून येईल, याची आम्हाला खात्री आहे.

Continue reading

मी हरलेच नाही, मग राजीनामा का देऊ? ममतांचा सवाल!

मी हरलेच नाही तर मग राजीनामा कशासाठी देणार, असा सवाल करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला. मी हरलेच नाही. मला हरवले गेले आहे. त्यामुळे लोकभवन म्हणजेच राजभवनावर जाऊन मी राजीनामा देणार...

दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी करणारी महिला झाली आमदार!

जिद्द, चिकाटी आणि लोकशाहीवरचा विश्वास असेल, तर एखादी सामान्य व्यक्ती किती मोठी झेप घेऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे कलिता माजी. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात अनेक दिग्गजांचा पराभव झाला असला, तरी औसग्राम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या...

इराणने युद्धविराम तोडला!

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला युद्धविराम आज अखेर इराणने तोडला. इराणने आज होर्मूझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदीला असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकेवरच हल्ला केल्याचे वृत्त आहे. अमेरिकेची ही युद्धनौका इराणच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला असता इराणने या...
Skip to content