Homeचिट चॅट१८ फेब्रुवारीपासून अंडर...

१८ फेब्रुवारीपासून अंडर आर्मर चंदिगढ फास्ट!

भारतात धावण्याच्या क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी अंडर आर्मर चंदिगढ फास्ट मॅरेथॉन, हा क्रांतिकारी उपक्रम सुरु करण्यात आला आहे. ब्रँडेड ऍथलेटिक परफॉर्मन्स ऍपेरल, फूटवेयर आणि ऍक्सेसरीजचे आघाडीचे इन्व्हेंटर, मार्केटर आणि डिस्ट्रिब्युटर अंडर आर्मर यांनी अतिशय अभिमानाने सुरू केलेला हा उपक्रम फक्त पात्र स्पर्धकांसाठीच असल्याने अनोखा आहे. या स्पर्धेमध्ये पात्र ठरल्यानंतरच भाग घेता येऊ शकेल. अप्रतिम पायाभूत सोयीसुविधा, अनुकूल हवामान आणि सरकारकडून दिले जाणारे प्रोत्साहन यासाठी नावाजले जाणारे शहर चंदिगढमध्ये १८ फेब्रुवारी २०२४ रोजी याची सुरुवात होईल.   

धावण्याची विशेष आवड असणारे अनेक लोक न्यूयॉर्क, शिकागो, बॉस्टन, बर्लिन, टोकियो आणि लंडन या सहा वर्ल्ड मेजर मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यासाठी जगभर प्रवास करताना दिसतात. पण या प्रतिष्ठित मॅरेथॉनमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी इतर प्रमाणित रेसेसमध्ये पात्रता मिळवलेली असणे आवश्यक असते. भारतीयांना ही संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

धावण्याशी संबंधित तंत्रज्ञानाची प्रीमियम कंपनी इंडिया रनिंगचे रेस आयोजक व सीईओ विकास सिंग यांनी सांगितले की, अंडर आर्मर चंदिगढ फास्ट मॅरेथॉनमध्ये फक्त कामगिरीवर भर दिला जातो. लांब पल्ल्याच्या धावपटूंना आवश्यक असलेले प्रत्येक साहाय्य देण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे. उत्कृष्टतेप्रती आमची वचनबद्धता आणि अंडर आर्मरकडून मिळणारा पाठिंबा यांच्यासह आम्ही ही मॅरेथॉन जगातील प्रतिष्ठित वर्ल्ड मेजर मॅरेथॉनसाठी प्रीमियर क्वालिफायर बनवू इच्छितो. फक्त भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया-पॅसिफिक क्षेत्रात येत्या वर्षात हिची ख्याती निर्माण व्हावी हा आमचा उद्देश आहे.

अंडरडॉग ऍथलेटिक्सचे मॅनेजिंग डायरेक्टर (भारतामध्ये अंडर आर्मरचे एक्सक्लुसिव्ह लायसेन्सी आणि वितरक) तुषार गोकुळदास यांनी सांगितले की, अंडर आर्मर चंदिगढ फास्ट मॅरेथॉन हे क्षितिजे विस्तारून उत्कृष्टतेचा ध्यास धरून प्रयत्न करण्याचे, अंडर आर्मरला अनुरूप मूल्यांचे प्रतीक आहे. धावपटूंना त्यांची सर्वोत्तम कामगिरी बजावता यावी यासाठी सक्षम बनवणे आमचे उद्दिष्ट असून, अंडर आर्मर चंदिगढ फास्ट मॅरेथॉन ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सुसज्ज आहे. या रेसचा फक्त भारतातच नव्हे तर जगभरात सखोल प्रभाव घडून येईल, याची आम्हाला खात्री आहे.

Continue reading

धनत्रयोदशीच्या दिवशी ‘अशुभ’ दक्षिणेलाच का लावतात दिवा?

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो...

मुंबई महापालिकेकडून ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर

मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हा निर्णय घोषित केला. या सानुग्रह अनुदानाचा तपशील पुढीलप्रमाणेः १. महापालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये ३१,०००/- २. अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळा...

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...
Skip to content