Homeबॅक पेजउद्धव ठाकरे यांनी...

उद्धव ठाकरे यांनी दोनदा घर सोडले होते….

उद्धव ठाकरे यांनी सांगितले असणार राणेंना बोलवू नका म्हणून… मला पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दोनदा घर सोडलेले होते. हॉलिडे इनमध्ये जाऊन कुटुंबासह राहिलेले आहेत. पण दोनदाही मी साहेबांना तयार करून त्यांना घरी आणले हॉलिडे इनमधून… एकच धमकी साहेबांना असायची. घर सोडायची…, असे उद्गार केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी काढले आहेत.

नारायण राणे यांची अवधूत गुप्ते यांनी घेतलेली मुलाखत येत्या रविवारी रात्री ९ वाजता झी मराठी, या वाहिनीवर ‘खुपते तिथे गुप्ते’, या कार्यक्रमात प्रसारित होणार आहे. त्यात त्यांनी ही माहिती दिली. या मुलाखतीतले काही अंश खास आपल्या वाचकांसाठी…

अवधूत गुप्ते आणि आता मित्रहो… वेळ झाली आहे रॅपिड राऊंडची. राजकारणात जास्त आश्वासक कोण वाटतं? निलेश राणे की नितेश राणे?

नारायण राणे नितेश…

अवधूत गुप्ते- शिवसेना सोडून गेलेल्या कुठल्या नेत्याचे बंड व्यावसायिक स्वार्थासाठी नव्हतं?  छगन भुजबळ, नारायण राणे की एकनाथ शिंदे…

नारायण राणे- —-

अवधूत गुप्ते- इथे एक बॉक्स येईल. त्या बॉक्समध्ये काही वस्तू असतील. त्या भेटवस्तू आहेत असे समजून त्या तुम्ही कोणाला द्याल हे आम्हाला सांगायचं. श्रीफळ… कुणाला द्याल?

नारायण राणे- यांना देऊया ना… अनिल परबना…अवधूत गुप्ते- अरे वाss… डायरेक्ट सिंधुदूर्गचे रेल्वेचे तिकीट आहे. हे तिकीट देऊन कोणाला कोकणात आमंत्रण द्यायला आवडेल?

——-

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content