Homeब्लॅक अँड व्हाईटयंदा 5 महिन्यांत...

यंदा 5 महिन्यांत घरातून पळालेली 3430 मुले आरपीएफला सापडली

यंदा फक्त पहिल्या पाच महिन्यांत, आरपीएफने रेल्वेच्या हद्दीतून 4,607 मुलांची सुटका केली असून यामध्ये घरातून पळून गेलेल्या 3430 मुलांचा समावेश आहे. आरपीएफने सुटका केलेल्या मुलांव्यतिरिक्त इतर यंत्रणांकडून शोध घेतला गेलेल्या तसेच ज्यांचा शोध लागला नाही अशा मुलांची संख्या लक्षात घेतल्यास ही संख्या कितीतरी पटीने वाढेल. या संख्येवरून मुलांची घरातून पळून जाण्याची समस्या आणि त्याचे निराकरण करण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्याची गरज असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.

रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) गेल्या सात वर्षांपासून ‘नन्हे फरिश्ते’ अभियान प्रभावीपणे राबवत आहे. भारतीय रेल्वेच्या देशभरातील विविध विभागांमध्ये काळजी आणि सुरक्षेची गरज असलेल्या लहान मुलांची सुटका करण्यासाठी हे अभियान समर्पित आहे. आरपीएफने गेल्या सात वर्षांत (2018 ते मे 2024), रेल्वेस्थानके आणि रेल्वेगाड्यांमधून संकटात सापडलेल्या  84,119 मुलांची सुटका केली.

आरपीएफ

“ऑपरेशन नन्हे फरिश्ते”च्या आरंभासह 2018 हे वर्ष महत्त्वाचे ठरले. या वर्षात, आरपीएफने एकूण 17,112 मुलांची सुटका केली. यामध्ये मुलगे आणि मुली दोन्ही समाविष्ट होते. 2018, या वर्षाने अशा उपक्रमाची तातडीची गरज अधोरेखित करत या अभियानाचा भक्कम पाया रचला. 2019मध्ये आरपीएफने एकूण 15,932 मुला-मुलींची सुटका केली. कोविड-19 साथ रोगामुळे 2020 हे वर्ष आव्हानात्मक ठरले. सामान्य जीवन विस्कळीत झाले आणि अभियानाच्या कामावर लक्षणीय परिणाम झाला. तरीही या आव्हानांचा सामना करत आरपीएफने 5,011 मुलांची सुटका करण्यात यश मिळविले.

2021मध्ये, आरपीएफने आपल्या बचावकार्यात आणखी प्रगती करत 11,907 मुलांची सुटका केली. 2022मध्ये, आरपीएफने 17,756 मुलांची सुटका केली, जी आतापर्यंतची सर्वाधिक संख्या होती. यावर्षी घरातून पळून गेलेली आणि हरवलेली मुले मोठ्या संख्येने सापडली. त्यांना आवश्यक ती काळजी आणि संरक्षण देण्यात आले. 2023 या वर्षात आरपीएफने 11,794 मुलांची सुटका केली. आरपीएफने आपल्या अथक परिश्रमांनी केवळ मुलांची सुटका केली नाही, तर पळून जाणाऱ्या आणि हरवलेल्या मुलांच्या वाढत्या समस्येबाबत जागरुकता निर्माण केली. त्यामुळे पुढील कारवाई शक्य झाली आणि या अभियानाला विविध हितधारकांचे पाठबळ मिळाले.  

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content