Wednesday, March 12, 2025
Homeचिट चॅटसोन्यात गुंतवणूक करण्याची...

सोन्यात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ?

सध्या भारतीय गुंतवणुकीचे साधन म्हणून सोन्यात गुंतवणूक करत आहेत. कारण महागाई आणि चलन अवमूल्यनाच्या संकटात ते मदतीला येते. आता तर केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना गुंतवणुकीच्या अनुषंगाने सोन्यात गुंतवणूक करावी की नाही याबद्दल विश्लेषण करीत आहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष प्रथमेश माल्या.

सोनेच का?

सुरुवातीला असे म्हणता येईल की, सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही वेळ चांगली किंवा वाईट नसते. सोने हा सर्वच गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओचा भाग आहे. वैविध्य आणि संतुलनाच्या उद्देशाकरिता याचा वापर होतो. तसेच ही किफायतशीर कमोडिटीदेखील आहे. २००५पासून, सोन्याने ७ पटींनी जास्त परतावे दिले आहेत. तर दुसरीकडे, बीएसई सेन्सेक्सने ५ पटींनी परतावे दिले आहेत. २०२०मध्ये सोन्याने, सोन्यानेच २५ टक्के परतावे दिले.

आर्थिक अनिश्चिततेदरम्यानच, सोन्याचे विशेष महत्त्व अधोरेखित झाले आहे. गुंतवणूकदारांच्या थंब रुलप्रमाणे, सोन्याला १०% वजन दिले जाते. आर्थिक अस्थैर्यात, हे वजन १५% किंवा गुंतवणूकदाराच्या निर्णयानुसार अवलंबून असते. सोने प्रत्यक्ष किंवा डिजिटली विकत घेण्याचा विषय निघतो तेव्हा गुंतवणूकदार अधिक चांगल्या पर्यायांचा आनंद घेतो. डिजिटल पर्यायांमध्ये उपलब्ध असलेला सर्वात चांगला म्हणजे भारतीय सरकारची सोव्हेरियन गोल्ड बाँड स्कीम. यात जोखीम आणि साठवणुकीचे शुल्क नसते, तर गुंतवणूकदाराला लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्समधून सवलतही मिळते.

सध्या, जगभरातील सामाजिक-आर्थिक घटकांमुळे बाजारात अजूनही अस्थिरता कायम आहे. विशेषत: युरोप व अमेरिकेत. कोव्हिड-१९ साथीची लाट पुन्हा आल्याने बाजाराच्या गतीशीलतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सोने हा गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. काही अंदाजांनुसार, २०२१मध्येच सोने दोन अंकी परतावे देईल. त्यामुळे तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमधील सोन्याचे वजन वाढवू इच्छित असाल, तर याचा पुन्हा विचार करा.

गुंतवणूकदाराने इतर कोणत्या पर्यायांचा विचार केला पाहिजे?

पिवळा धातू किंमतीनुसार खरोखरच उपयुक्त असतो. सध्या त्याची किंमत १० ग्राममागे ५००००पेक्षा जास्त आहे. अशा वेळी गुंतवणूकदार चांदी विकत घेण्याचाही विचार करू शकतो. तिचा दर ६६,००० प्रति किलो एवढा आहे. तथ्यांचा विचार करता, सोन्याने मागील वर्षात २५ टक्के परतावे दिले तर चांदीने ५० टक्के. त्यामुळे चांदीदेखील गुंतवणूकदारांसाठी अधिक फायद्याची ठरू शकते.

एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे चांदीमध्ये गुंतवणुकीच्या दृष्टीने फार पर्याय उपलब्ध नाहीत. तुम्ही ती फक्त प्रत्यक्षपणेच खरेदी करू शकता. त्याची खरेदी आणि साठवणुकीचा मुद्दा ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.

अखेरीस, सध्या चलनात असलेल्या विस्तृत आर्थिक घटकांमध्ये तुम्ही मौल्यवान धातूंना जास्त वजन दिलेच पाहिजे. सध्या अस्थिर अससलेल्या बाजारपेठेत तुमच्या पोर्टफोलिओसाठी हे संतुलन साधणारे ठरेल. त्याचवेळी त्यात गुंतवणूक करतना तुम्हाला उत्कृष्ट परताव्यांचा आनंदही मिळेल. सोने हा भारतीयांसाठी आणखी अभिमानास्पद घटक आहे. तथापि, तुम्ही या प्रतिष्ठेसाठी गुंतवणूक करणार नाहीत तर, परताव्यांसाठी गुंतवणूक करत आहात. त्यामुळे शक्य झाल्यास चांदीचा पर्याय निवडा.

Continue reading

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला...

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...

भारतात महिलांच्या आत्महत्त्यांपैकी ३६.६% तरुणींच्या!

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये चिंता आणि नैराश्य अधिक प्रमाणात असून जागतिक स्तरावर ही समस्या अधिक व्यापक आहे, असा अहवाल नीरजा बिर्ला यांच्या नेतृत्त्वाखालील आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या एमपॉवर, या अभ्यास गटाने प्रसिद्ध केला आहे. भारतात पुरुषांपेक्षा हे प्रमाण दुप्पट असून यात...
Skip to content