Homeब्लॅक अँड व्हाईटवर्षातील शेवटचे चंद्रग्रहण...

वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण येत्या 28 ऑक्टोबरच्या मध्यरात्री!

28-29 ऑक्टोबर 2023 (6-7 कार्तिक, 1945 शके) रोजी आंशिक चंद्रग्रहण असणार आहे. 28 ऑक्टोबरच्या मध्यरात्री चंद्र उपछायेत प्रवेश करणार असला तरी 29 ऑक्टोबरच्या मध्यरात्री प्रत्यक्ष ग्रहणाचा (छत्री) टप्पा सुरू होईल. मध्यरात्रीच्या सुमारास भारतातील सर्व ठिकाणाहून हे ग्रहण दिसणार आहे. भारतातून दिसणारे यंदाचे हे शेवटचे चंद्रग्रहण असेल.

पश्चिम पॅसिफिक महासागर, ऑस्ट्रेलिया, आशिया, युरोप, आफ्रिका, पूर्व दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिकेचा ईशान्य भाग, अटलांटिक महासागर, हिंद महासागर आणि दक्षिण प्रशांत महासागर या भागात हे ग्रहण दिसणार आहे.

या अंशिक ग्रहणाच्या छत्री आकाराच्या टप्प्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार 29 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 1 वाजून 5 मिनिटांनी सुरुवात होईल आणि ते मध्यरात्री 2 वाजून 24 मिनिटा पर्यंत दिसू शकेल.

या ग्रहणाचा कालावधी 1 तास 19 मिनिटे एवढा असणार असून त्याचा आकार 0.126 एवढा अगदी लहान असणार आहे.यापुढचे चंद्रग्रहण जे भारतातून 07 सप्टेंबर 2025 रोजी दिसणार आहे आणि तेच पूर्ण चंद्रग्रहण असेल.

भारतातून 8 नोव्हेंबर 2022 रोजी दिसलेले शेवटचे चंद्रग्रहण होते आणि ते पूर्ण ग्रहण होते.

चंद्रग्रहण पौर्णिमेच्या दिवशी होते जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि जेव्हा हे तिन्ही घटक सरळ रेषेत येतात. पूर्ण चंद्रग्रहण तेव्हा होते जेव्हा संपूर्ण चंद्र पृथ्वीच्या छायेखाली येतो आणि आंशिक चंद्रग्रहण तेव्हाच होते जेव्हा चंद्राचा काही भाग पृथ्वीच्या छायेत येतो.

Continue reading

मुंबई महापालिकेकडून ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर

मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हा निर्णय घोषित केला. या सानुग्रह अनुदानाचा तपशील पुढीलप्रमाणेः १. महापालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये ३१,०००/- २. अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळा...

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...
Skip to content