Homeब्लॅक अँड व्हाईटवर्षातील शेवटचे चंद्रग्रहण...

वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण येत्या 28 ऑक्टोबरच्या मध्यरात्री!

28-29 ऑक्टोबर 2023 (6-7 कार्तिक, 1945 शके) रोजी आंशिक चंद्रग्रहण असणार आहे. 28 ऑक्टोबरच्या मध्यरात्री चंद्र उपछायेत प्रवेश करणार असला तरी 29 ऑक्टोबरच्या मध्यरात्री प्रत्यक्ष ग्रहणाचा (छत्री) टप्पा सुरू होईल. मध्यरात्रीच्या सुमारास भारतातील सर्व ठिकाणाहून हे ग्रहण दिसणार आहे. भारतातून दिसणारे यंदाचे हे शेवटचे चंद्रग्रहण असेल.

पश्चिम पॅसिफिक महासागर, ऑस्ट्रेलिया, आशिया, युरोप, आफ्रिका, पूर्व दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिकेचा ईशान्य भाग, अटलांटिक महासागर, हिंद महासागर आणि दक्षिण प्रशांत महासागर या भागात हे ग्रहण दिसणार आहे.

या अंशिक ग्रहणाच्या छत्री आकाराच्या टप्प्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार 29 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 1 वाजून 5 मिनिटांनी सुरुवात होईल आणि ते मध्यरात्री 2 वाजून 24 मिनिटा पर्यंत दिसू शकेल.

या ग्रहणाचा कालावधी 1 तास 19 मिनिटे एवढा असणार असून त्याचा आकार 0.126 एवढा अगदी लहान असणार आहे.यापुढचे चंद्रग्रहण जे भारतातून 07 सप्टेंबर 2025 रोजी दिसणार आहे आणि तेच पूर्ण चंद्रग्रहण असेल.

भारतातून 8 नोव्हेंबर 2022 रोजी दिसलेले शेवटचे चंद्रग्रहण होते आणि ते पूर्ण ग्रहण होते.

चंद्रग्रहण पौर्णिमेच्या दिवशी होते जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि जेव्हा हे तिन्ही घटक सरळ रेषेत येतात. पूर्ण चंद्रग्रहण तेव्हा होते जेव्हा संपूर्ण चंद्र पृथ्वीच्या छायेखाली येतो आणि आंशिक चंद्रग्रहण तेव्हाच होते जेव्हा चंद्राचा काही भाग पृथ्वीच्या छायेत येतो.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content