Homeबॅक पेजमहाविकास आघाडीत ठाकरे...

महाविकास आघाडीत ठाकरे गट तिसऱ्या स्थानावर!

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेला उद्धव ठाकरेंचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे, असे स्पष्ट प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते,  राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याने महाविकास आघाडीमध्ये नव्याने खळबळ उडाली आहे.

सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस हा आमचा मोठा भाऊच आहे. सध्या महाविकास आघाडीमध्ये नंबर एकचे स्थान राष्ट्रवादीचे आहे. त्यानंतर नंबर दोनवर, आम्ही म्हणजे काँग्रेस आहोत. उद्धव ठाकरेंचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे त्याचदृष्टीने सर्व निवडणुकांमध्ये जागावाटपाचे सूत्र निश्चित होईल, असे संकेत त्यांनी दिले.

चार दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत लोकसभा निवडणुकीच्या महाविकास आघाडीतल्या जागावाटपासंबंधी भाष्य करत आहेत. या जागावाटपात लोकसभेच्या निवडणुकीत आमचा गट पूर्वीच्या शिवसेनेच्या जागांइतकाच म्हणजे 19 जागा लढवेल, असे ते म्हणाले. त्यावरून महाविकास आघाडीमध्ये सुरू झालेली परस्परांवरील कुरघोडी आता मोठ्या भावापर्यंत पोहोचली आहे.

कालच विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीत राष्ट्रवादी, हा मोठा भाऊ असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर अजितदादांवर पलटवार करताना संजय राऊत यांनी कोण मोठा भाऊ हे ठरवण्यासाठी डीएनए टेस्ट करावी लागेल, असे भाष्य केले होते. त्यापाठोपाठ आज पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठ्या भावाबद्दल वक्तव्य केले आहे.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content