Homeएनसर्कलपाणबुडी आयएनएस अरिघाट...

पाणबुडी आयएनएस अरिघाट नौदलासाठी सज्ज

हिंद महासागर क्षेत्रात भारताची ताकद वाढविण्यासाठी केंद्र सरकारने जोरदार कंबर कसली आहे. चीनच्या वेगवान हालचालीवर लक्ष ठेवत त्याला अचूक उत्तर देण्यासाठी भारताने वेगवान पद्धतीने प्रगतीचा जणू काही आलेखच तयार केल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. याचाच भाग म्हणून हिंद महासागरात अणू क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेली पाणबुडी आयएनएस अरिघाट, भारतीय नौदलात सामील होण्यासाठी सज्ज झाली आहे.

विशाखापट्टणम येथील जहाजबांधणी केंद्रात प्रगत तंत्रज्ञान जहाज (ATV) प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आले आहे. भारताची पहिली बॅलेस्टिक मिसाईल पाणबुडी INS अरिहंत 2009मध्ये लाँच करण्यात आली. याशिवाय पारंपारिक शस्त्रांसह दोन अणुऊर्जेवर हल्ला करणाऱ्या पाणबुड्या तयार करण्याचा प्रकल्पही अंतिम मंजुरीच्या जवळ आहे.


नौदलाला दुसरी 6,000 टन अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी INS अरिघाट मिळाल्यानंतर, भारत आता हिंद महासागर क्षेत्रात चीनकडून सामरिक प्रतिकारासाठी वाढत्या आव्हानांना तोंड देऊ शकेल. भारतीय नौदलाची दुसरी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी INS अरिघाट तीन वर्षांच्या सागरी चाचण्यांनंतर या वर्षाच्या अखेरीस समुद्रात दाखल होईल.

भारतात बांधलेली ही दुसरी अरिहंत श्रेणीची पाणबुडी आहे. विस्तारित कालावधीत सुधारणा करून काही तांत्रिक समस्यांचे निराकरण केले गेले, ज्यामुळे पाणबुडी व्यापक चाचण्यांनंतर औपचारिक कार्यान्वित होण्यासाठी पूर्णपणे तयार राहिली. भारताची पहिली बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी INS अरिहंत 9 वर्षांच्या व्यापक चाचण्यांनंतर ऑगस्ट 2016मध्ये दाखल करण्यात आली.

दोन वर्षांच्या चाचणीनंतर 2018मध्ये ती पूर्णपणे कार्यान्वित झाले. जवळपास पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर २०१७मध्ये आयएनएस अरिघाट लाँच करण्यात आले. ही पाणबुडी मूळत: आयएनएस अरिधमान या नावाने ओळखली जात होती. परंतु लॉन्च झाल्यावर त्याचे नाव आयएनएस अरिघाट असे ठेवले गेले.

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content