Homeमुंबई स्पेशलमुंबईत पालिकांच्या शाळेत...

मुंबईत पालिकांच्या शाळेत गणित, इंग्रजीसाठी स्मार्ट तंत्रज्ञान

मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्रजी यासारख्या विषयाची गोडी लागावी तसेच विषयाच्या संकल्पना सोप्या पद्धतीने समजून घेणे शक्य व्हावे यासाठी पालिकेच्‍या शिक्षण विभाग आणि संपर्क फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपर्क स्मार्ट शाळा शिक्षक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी काल गोखले रोड (दादर) शाळेत सुरू असलेल्या प्रशिक्षण वर्गखोल्यांना भेट दिली. स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धीमत्तेला वाव मिळेल. तसेच सोप्या पद्धतीने संकल्पना आत्मसात करणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी शिक्षण अधिकारी (प्राथमिक) संदीप सांगवे, प्रशासकीय अधिकारी (‌शाळा) स्नेहलता डुंबरे तसेच विविध शाळांचे शिक्षक उपस्थित होते. पालिकेच्या १८१ शाळांमध्ये १८१ स्मार्ट टेलिव्हिजन तसेच ‌शैक्षणिक संकल्पना आधारित उपकरण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गणित तसेच इंग्रजी भाषेतील संकल्पना चलचित्रपटाच्या माध्यमातून स्मार्ट टेलिव्हिजनवर

मांडणे शक्य होणार आहे. दोन दिवसीय प्रशिक्षणासाठी १८१ शाळांमधील प्रत्येकी एक यानुसार शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. प्राथमिक विभागाच्या शिक्षकांची निवड या प्रशिक्षणासाठी करण्यात आली आहे.

छोट्या वारकर्‍यांसोबत आयुक्त

आषाढी एकादशी वारीनिमित्त छोट्या वारकर्‍यांच्या दिंडीचे आयोजन शाळेत करण्यात आले होते. या दिंडीत छोट्या वारकऱ्यांसोबत प्रशासक गगराणी यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी केलेल्या वेशभूषेची त्यांनी आवर्जून विचारपूस केली. दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसोबत त्यांनी छायाचित्रही घेतले. पालिकेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी “आनंददायी शनिवार” या उपक्रमाअंतर्गत अक्षर दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content