Homeडेली पल्सशाळकरी मुलांसाठी गुंतवणुकीची...

शाळकरी मुलांसाठी गुंतवणुकीची सर्वात छोटी SIP योजना लाँच

शाळकरी मुलांना म्युच्युअल फंडाच्या दरमहा गुंतवणूक योजनांच्या (SIP) माध्यमातून शेअर मार्केटशी जोडणारी “तरुण” योजना लाँच करण्यात आली आहे. यातून दरमहा 250 रुपयांपासून गुंतवणूक करणे शक्य होणार आहे. भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ अर्थात सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) आणि भारतीय म्युच्युअल फंड संघटना म्हणजेच असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) यांच्या सहकार्याने ही योजना राबविली जाणार आहे.

250₹ दर महिना म्हणजेच साधारणतः 8 रुपये रोज इतक्या कमी रकमेपासून गुंतवणुकीची संधी देणारी ही आजवरची सर्वात छोटी SIP योजना लाँच करण्यात आली आहे. शालेय स्तरापासून आर्थिक साक्षरता उपक्रम राबविणे, हा यामागील उद्देश असल्याचे AMFI, “ॲम्फी”चे चेअरमन नवनीत मुनोत यांनी सांगितले. त्यासाठी MITRA पोर्टलही लाँच करण्यात आले आहे. मार्चपासून मित्रा पोर्टल पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.

विद्यार्थ्यांना शेअर मार्केटशी जोडणारा हा तरुण SIP चा फायनान्शिअल लिटरसी उपक्रम सुरुवातीला देशातील 9 जिल्ह्यांत प्रायोगिक तत्त्वावर राबविला जाणार आहे. विविध शाळांतील शिक्षकांनाच प्रशिक्षण देऊन आर्थिक साक्षरता उपक्रमाची जबाबदारी देण्यात येणार आहे. शाळकरी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा राबविल्या जाणार असून विजेत्यांना 100 रुपये दरमहिना असे 24 महिन्यांसाठी SIP योजनेचेच बक्षीस दिले जाणार आहे. या उपक्रमातील सर्व योजनांना 2 वर्षे लॉकइन कालावधी राहील, ज्या काळात योजनेत गुंतवलेले पैसे काढून घेता येणार नाहीत. “ॲम्फी”च्या गुंतवणूकदार निधीतून हे उपक्रम राबविले जाणार आहेत.

Continue reading

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....

संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी अनुभवले भावूक क्षण!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना यंदा मानांकित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित रसिकांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....
Skip to content