Homeडेली पल्सशाळकरी मुलांसाठी गुंतवणुकीची...

शाळकरी मुलांसाठी गुंतवणुकीची सर्वात छोटी SIP योजना लाँच

शाळकरी मुलांना म्युच्युअल फंडाच्या दरमहा गुंतवणूक योजनांच्या (SIP) माध्यमातून शेअर मार्केटशी जोडणारी “तरुण” योजना लाँच करण्यात आली आहे. यातून दरमहा 250 रुपयांपासून गुंतवणूक करणे शक्य होणार आहे. भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ अर्थात सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) आणि भारतीय म्युच्युअल फंड संघटना म्हणजेच असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) यांच्या सहकार्याने ही योजना राबविली जाणार आहे.

250₹ दर महिना म्हणजेच साधारणतः 8 रुपये रोज इतक्या कमी रकमेपासून गुंतवणुकीची संधी देणारी ही आजवरची सर्वात छोटी SIP योजना लाँच करण्यात आली आहे. शालेय स्तरापासून आर्थिक साक्षरता उपक्रम राबविणे, हा यामागील उद्देश असल्याचे AMFI, “ॲम्फी”चे चेअरमन नवनीत मुनोत यांनी सांगितले. त्यासाठी MITRA पोर्टलही लाँच करण्यात आले आहे. मार्चपासून मित्रा पोर्टल पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.

विद्यार्थ्यांना शेअर मार्केटशी जोडणारा हा तरुण SIP चा फायनान्शिअल लिटरसी उपक्रम सुरुवातीला देशातील 9 जिल्ह्यांत प्रायोगिक तत्त्वावर राबविला जाणार आहे. विविध शाळांतील शिक्षकांनाच प्रशिक्षण देऊन आर्थिक साक्षरता उपक्रमाची जबाबदारी देण्यात येणार आहे. शाळकरी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा राबविल्या जाणार असून विजेत्यांना 100 रुपये दरमहिना असे 24 महिन्यांसाठी SIP योजनेचेच बक्षीस दिले जाणार आहे. या उपक्रमातील सर्व योजनांना 2 वर्षे लॉकइन कालावधी राहील, ज्या काळात योजनेत गुंतवलेले पैसे काढून घेता येणार नाहीत. “ॲम्फी”च्या गुंतवणूकदार निधीतून हे उपक्रम राबविले जाणार आहेत.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content