Tuesday, February 4, 2025
Homeचिट चॅटराज्य कॅरम स्पर्धेत...

राज्य कॅरम स्पर्धेत संदीप दिवे, काजल कुमारी विजेते 

सोमेश्वर फाऊंडेशन आणि क्रीडा जागृती आयोजित सनी निम्हण यांच्या पुढाकाराने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणेच्या मान्यतेने कै. विनायक निम्हण यांच्या स्मरणार्थ सनीज वर्ल्ड, पुणे येथे आयोजित केलेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरच्या विश्वविजेत्या संदीप दिवेने पुण्याच्या अभिजित त्रिपनकरचा अटीतटीच्या लढतीत पराभव करून विजेतेपद मिळविले.

संदिपने रोख रुपये २५ हजारांचे ईनाम व चषक मिळवला.  महिला एकेरीचा सामना अगदीच एकतर्फी झाला. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू काजल कुमारीने मुंबईच्या अंबिका हरिथवर सहज विजय मिळवून रोख रुपये ८ हजरांचे ईनाम व चषक पटकाविला. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या पुरुषांच्या सामन्यात पुण्याच्या रहिम खानने ठाण्याच्या झैद अहमदला  हरविले. महिलांच्या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत मुंबईच्या उर्मिला शेंडगेने मुंबईच्या रिंकी कुमारीवर मात केली.

विजेत्या खेळाडूंना पुण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष भारत देसडला, क्रीडा जागृतीचे मुख्य प्रताप जाधव, राज्य कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सहसचिव अभिजित मोहिते, सदस्य संतोष चव्हाण आणि कॅरम असोसिएशनचे सचिव नंदू सोनावणे उपस्थित होते.

Continue reading

श्री मावळी मंडळाच्या खो-खो स्पर्धेत ज्ञानविकास,विहंग विजयी

ठाण्यातील श्री मावळी मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित प्रथम विभागीय खो-खो स्पर्धेच्या महिला गटात ज्ञानविकास फाउंडेशन संघ (ठाणे) व पुरुष गटात विहंग क्रीडा केंद्र (ठाणे) या संघांनी विजेतेपद पटकावले. महिला गटातील अंतिम सामन्यात ठाण्याच्या ज्ञानविकास फाउंडेशन संघाने ठाण्याच्या रा....

महाराष्ट्रात सुरू होणार देशातले पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ

महाराष्ट्रात देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, असे राज्याचे तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. नवे विद्यापीठ AI आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला...

शेअर बाजारात पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी पाण्यात!

बजेटनंतरच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराच्या व्यवहारात पहिल्या अवघ्या पाच मिनिटांत सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला. त्यामुळे या पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे तब्बल 5 लाख कोटींचे नुकसान झाले. कार्पोरेट क्षेत्राची बजेटने निराशा केल्याचे मानले जात आहे. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात अपेक्षित गुंतवणूक न...
Skip to content