Homeचिट चॅटराज्य कॅरम स्पर्धेत...

राज्य कॅरम स्पर्धेत संदीप दिवे, काजल कुमारी विजेते 

सोमेश्वर फाऊंडेशन आणि क्रीडा जागृती आयोजित सनी निम्हण यांच्या पुढाकाराने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणेच्या मान्यतेने कै. विनायक निम्हण यांच्या स्मरणार्थ सनीज वर्ल्ड, पुणे येथे आयोजित केलेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरच्या विश्वविजेत्या संदीप दिवेने पुण्याच्या अभिजित त्रिपनकरचा अटीतटीच्या लढतीत पराभव करून विजेतेपद मिळविले.

संदिपने रोख रुपये २५ हजारांचे ईनाम व चषक मिळवला.  महिला एकेरीचा सामना अगदीच एकतर्फी झाला. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू काजल कुमारीने मुंबईच्या अंबिका हरिथवर सहज विजय मिळवून रोख रुपये ८ हजरांचे ईनाम व चषक पटकाविला. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या पुरुषांच्या सामन्यात पुण्याच्या रहिम खानने ठाण्याच्या झैद अहमदला  हरविले. महिलांच्या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत मुंबईच्या उर्मिला शेंडगेने मुंबईच्या रिंकी कुमारीवर मात केली.

विजेत्या खेळाडूंना पुण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष भारत देसडला, क्रीडा जागृतीचे मुख्य प्रताप जाधव, राज्य कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सहसचिव अभिजित मोहिते, सदस्य संतोष चव्हाण आणि कॅरम असोसिएशनचे सचिव नंदू सोनावणे उपस्थित होते.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content