Homeडेली पल्स१२ जानेवारीपर्यंत नोंदणी...

१२ जानेवारीपर्यंत नोंदणी करा ‘परीक्षा पे चर्चा’मध्ये भाग घेण्यासाठी…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासोबतचा सातवा संवादात्मक कार्यक्रम ‘परीक्षा पे चर्चा’ तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली येथे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. हा कार्यक्रम गेल्या सहा वर्षांपासून शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्यावतीने आयोजित करण्यात येतो. त्यासाठी १२ जानेवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई यांनी केले आहे.

‘परीक्षा पे चर्चा’मध्ये सहभागी होणाऱ्यांची नोंदणी करण्यासाठी आणि त्यांची निवड करण्यासाठी https://innovateindia.mygov.in/ppc-२०२४ ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्न (MCQ) स्पर्धा आयोजित केली जात आहे. सहावी ते बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलांसाठी, शिक्षक आणि पालकांसाठी सहभाग घेण्याकरीता ऑनलाईन लिंक उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या लिंकद्वारे १२ जानेवारी २०२४पर्यंत नोंदणी करता येईल. सहभागी विद्यार्थी, पालक व शिक्षकदेखील प्रश्न विचारू शकतात. सर्व सहभागींना संचालक एनसीइआरटी यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र मिळणार आहे.

Continue reading

मोहना कारखानीस यांच्या साहित्यकृतींवर रंगला परिसंवाद

सिंगापूरस्थित मराठी साहित्यिका मोहना कारखानीस यांच्या 'टेक ऑफ' (कथासंग्रह), 'चेहरे, कहाण्या आणि सिंगापूर’ (लेखसंग्रह)) आणि `चंद्रकळा’ (कवितासंग्रह) या पुस्तकांवर आधारित 'पुस्तकावर बोलू काही’ हा परिसंवाद मुंबईतल्या कांदिवलीत मान्यवर साहित्यिक आणि रसिकांच्या उपस्थितीत नुकताच रंगला. त्यांचे साहित्य हे सहज हळूवार भावविश्वांचे प्रतिनिधीत्व करते आणि त्यातून समाजमनाला त्या आपल्या जाणीवांचा...

भारतातल्या २ ते ५ टक्‍के व्‍यक्‍ती हायपरहायड्रोसिसने पीडित

भारतातील २ ते ५ टक्‍के व्‍यक्‍ती हायपरहायड्रोसिसने पीडित असण्‍याचा अंदाज आहे. असे असतानादेखील या स्थितीबाबत जागरूकतेचा अभाव आहे. परिणामत: अनेक व्‍यक्‍तींना या वैद्यकीय स्थितीबाबत माहित नाही आणि ते नकळतपणे आजार सहन करतात. वेळेवर उपचार न केल्‍यास या आजाराचा दैनंदिन...

दिल्लीकरांनी अनुभवले मणिपुरी थांग-ता आणि शिवकालीन युद्धतंत्राचे थरारक क्षण!

दिल्लीतील भारत मंडपम् येथे सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशन आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच आयोजित करण्यात आलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद' महोत्सवात भारताच्या गौरवशाली प्राचीन युद्धपरंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शौर्याचा सजीव, थरारक आविष्कार पाहायला मिळाला. या महोत्सवाने उपस्थितांमध्ये...
Skip to content