Homeटॉप स्टोरीराज ठाकरे आता...

राज ठाकरे आता पुणे, नाशिकही ओलांडणार!

महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता फक्त मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिकवर अवलंबून न राहता महाराष्ट्रभर संघटनात्मक बांधणी करणार आहेत. याचसाठी राज ठाकरे येत्या ४ ऑगस्टपासून १३ ऑगस्टपर्यंत मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या सत्तेतील महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच राज्यभरातून आपल्या ताकदीचा अंदाज घेण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला होता. त्यानंतर ठाकरे परदेशात गेले होते. १५ दिवसांनी

आल्यानंतर त्यांनी या अहवालाचा अभ्यास केला. पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली आणि महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणाही केली. येत्या विधानसभा निवडणुकीत २००पेक्षा जास्त जागा लढविण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या या दौऱ्याला महत्त्व आहे.

एरव्ही राज ठाकरे किंवा त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे मुंबईबाहेर पडल्यास मुणे आणि नाशिकपर्यंतच जाता. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीनंतर मनसेचे कार्यकर्ते व या हल्लाप्रकरणातील आरोपी जय मालोकर यांच्या मृत्त्यूनंतर अमित ठाकरे यांचे अमरावतीला जाणे झाले इतकेच लक्षात राहणारी बाब आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या राजकीय कक्षा आता रुंदावत आहेत, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content