Tuesday, February 4, 2025
Homeटॉप स्टोरीराज ठाकरे आता...

राज ठाकरे आता पुणे, नाशिकही ओलांडणार!

महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता फक्त मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिकवर अवलंबून न राहता महाराष्ट्रभर संघटनात्मक बांधणी करणार आहेत. याचसाठी राज ठाकरे येत्या ४ ऑगस्टपासून १३ ऑगस्टपर्यंत मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या सत्तेतील महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच राज्यभरातून आपल्या ताकदीचा अंदाज घेण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला होता. त्यानंतर ठाकरे परदेशात गेले होते. १५ दिवसांनी

आल्यानंतर त्यांनी या अहवालाचा अभ्यास केला. पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली आणि महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणाही केली. येत्या विधानसभा निवडणुकीत २००पेक्षा जास्त जागा लढविण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या या दौऱ्याला महत्त्व आहे.

एरव्ही राज ठाकरे किंवा त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे मुंबईबाहेर पडल्यास मुणे आणि नाशिकपर्यंतच जाता. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीनंतर मनसेचे कार्यकर्ते व या हल्लाप्रकरणातील आरोपी जय मालोकर यांच्या मृत्त्यूनंतर अमित ठाकरे यांचे अमरावतीला जाणे झाले इतकेच लक्षात राहणारी बाब आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या राजकीय कक्षा आता रुंदावत आहेत, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

Continue reading

श्री मावळी मंडळाच्या खो-खो स्पर्धेत ज्ञानविकास,विहंग विजयी

ठाण्यातील श्री मावळी मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित प्रथम विभागीय खो-खो स्पर्धेच्या महिला गटात ज्ञानविकास फाउंडेशन संघ (ठाणे) व पुरुष गटात विहंग क्रीडा केंद्र (ठाणे) या संघांनी विजेतेपद पटकावले. महिला गटातील अंतिम सामन्यात ठाण्याच्या ज्ञानविकास फाउंडेशन संघाने ठाण्याच्या रा....

महाराष्ट्रात सुरू होणार देशातले पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ

महाराष्ट्रात देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, असे राज्याचे तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. नवे विद्यापीठ AI आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला...

शेअर बाजारात पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी पाण्यात!

बजेटनंतरच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराच्या व्यवहारात पहिल्या अवघ्या पाच मिनिटांत सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला. त्यामुळे या पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे तब्बल 5 लाख कोटींचे नुकसान झाले. कार्पोरेट क्षेत्राची बजेटने निराशा केल्याचे मानले जात आहे. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात अपेक्षित गुंतवणूक न...
Skip to content